शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

नोकरी नाही; तर शेतजमीनही देणार नाही

By admin | Updated: May 12, 2017 02:12 IST

वेकोलि वणी क्षेत्राच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणीच्या विस्ताराकरिता भूमी संपादन प्रक्रियेमध्ये प्रकल्पग्रस्त व बाधित लोकांना

अन्यायकारक धोरण : खाण प्रकल्पग्रस्तांचा वेकोलिला इशारा लोकमत न्यूज नेटवर्क घुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्राच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणीच्या विस्ताराकरिता भूमी संपादन प्रक्रियेमध्ये प्रकल्पग्रस्त व बाधित लोकांना नोकरी न देण्याचा निर्णय वेकोलिने घेतला. त्यामुळे पिढीजात शेती उद्योगापासून शेतकऱ्यांना मुकावे लागणार आहे. वेकोलिकडून अन्यायकारक धोरणाचा अवलंब केला जात असल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. वेकोलि नोकरी देणार नसेल तर आम्ही कोळसा खाणीसाठी शेतजमीन देणार नाही, असा निर्णय मुंगोली, माथुली, साखरा, कोलगाव, शिवणी (जाह) तथा बाधित शेतकऱ्यांनी घेतला आहे. सदर कोळसा खाणीचा विस्तार मुंगोली निर्गुडा डीप ओ.सी. च्या नावाने केला जात आहे. या वाढीव प्रकल्पाकरिता सुमारे ३८२.७२ हेक्टर (८१२.२७ एकर) जमीन संपादित केली जाणार असून ३९० नोकऱ्या प्रस्तावित आहेत. त्या जमिनीवर एक ते दीड हजार कुटुंबीय पिढ्यानपिढ्या जीवनयापन करीत असून त्यावर शेत मजुराचे जीवन अवलंबून आहे. भूसंपादन कायदा २०१३ हा शेतकऱ्यांना गळफास लावणारा कायदा ठरणार असल्याचे संघर्ष समितीने म्हटले आहे. वेकोलिने कोणतीही पूर्वसुचना न देता २३ एप्रिलला सभा घेतली. त्या सभेत मुंगोली निर्गुडा कोळसा खाण प्रकल्पामध्ये रोजगार निर्माण होत नाही. त्यामुळे रोजगार देता येत नाही, असे अहवालातून सांगण्यात आले.मात्र हे धोरण प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मान्य नाही. दोन एकरामागे एक नोकरी व योग्य मोबदला देत असेल तरच या प्रकल्पाला मुंगोली, साखरा, कोलगाव, शिवणी व माथुलीच्या शेतकऱ्यांनी जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वेकोलि अडचणीत येणार आहे, हे निश्चित. कोळसा खाण प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे संयोजक अनिल तेलंग, बाबाराव ठाकरे, मुंगोलीचे सरपंच रूपेश ठाकरे, माथोलीचे सरपंच प्रवीण पिंपळकर, साखराचे सरपंच ललिता उपासे, कोलगावचे सरपंच त्रिवेणी उपरे यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वेकोलिच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणीकरिता १५ वर्षापूर्वी शेतजमिनी संपादित केल्या. आणि कोळसा उत्पादन सुरू झाले. कोळसा खाणीपासून प्रदूषण झाल्याने तेथील लोकांना त्रास होऊ लागला. गावाचे पुनर्वसन करण्याकडे गावकऱ्यांनी वारंवार वेकोलिचे लक्ष वेधले. रस्ता रोको, धरणे, जनाक्रोश आंदोलन केले. मात्र वेकोलिने वेळकाढू धोरण अवलंबिले. गावकऱ्यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात तीव्र आंदोलन करून कोळसा उत्पादनात महत्वाची भूमिका वठविणाऱ्या कोट्यवधीच्या ड्रगलँड मशीनला थांबविले. मागील एक वर्षांपासून सदर मशीन आजही वर्धा नदीच्या काठावर उभी आहे. मशीनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम न करता वेतन दिले जात आहे. तरीही अजून मुंगोलीचे पुनर्वसन करण्यात आले नाही. आधी पुनर्वसन मगच प्रकल्प या आधारावर ग्रामसभेने ठराव घेतला. कमीत कमी तीन हजार चौ. फुट भूखंड देण्यात यावे. मुंगोली निर्गुडा डीप खुल्या कोळसा खाणीकरिता बेकायदेशीर आणलेले ड्रग लॅन्ड २४९५ मशीन सुरू करू नये, दोन एकरा मागे शिक्षण पात्रतेनुसार एक नोकरी देण्यात यावी, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. या संदर्भात कोळसा खाण मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांना निवेदन दिले आहे.