शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या प्रवेशाचे ‘नो टेन्शन’

By admin | Updated: June 22, 2017 00:35 IST

आठ दिवसांपूर्वी दहावीचा निकाल लागला. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा जागा जास्त : शहरातील महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची अधिक पसंतीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आठ दिवसांपूर्वी दहावीचा निकाल लागला. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. विद्यार्थी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहेत. मोठ्या शहरांमध्ये अकरावीसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्याने आपल्याला हवे त्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार की नाही, याबाबत विद्यार्थ्यांत चिंता पसरली आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात उलट स्थिती असून महाविद्यालयस्तरावर अकरावीला थेट प्रवेश दिला जात आहे. तर दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा प्रवेश क्षमता जास्त असल्याने अकरावीला प्रवेशाचे ‘नो टेन्शन’ असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. ४४४सध्या सर्वच अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे सर्वच शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अकराव्या वर्गाचा प्रवेश महत्त्वाचा माणला जातो. त्यामुळे अनेक विद्यार्थी अकरावीत प्रवेश घेताना कला, वाणिज्य, कामर्स, विज्ञान अशा शाखांची निवड करतो. तर काही विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षणाला महत्त्व देतात. येथूनच विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवे वळण मिळत असते. आठ दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या दहावीच्या शालांत परीक्षेत जिल्ह्यातून २६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर जिल्हाभरात अकरावीचे २३४ कनिष्ठ महाविद्यालये असून २७० तुकड्या कला शाखेच्या, विज्ञान शाखेच्या १३८ तुकड्या, तर वाणिज्य शाखेच्या ३० तुकड्या आहेत. या तुकड्यांची प्रत्येकी ८० अशी प्रवेश क्षमता असून ३५ हजार २८० विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांची शहरी भागाकडे धाव दहावीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ग्रामीण भागात जास्त आहे. शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांनी गुण मिळविले असून अकरावीच्या प्रवेशासाठी ते आता शहरातील महाविद्यालयांना पसंती देत आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी काहीसी अडचण निर्माण होत असून गुणानुक्रमे प्रवेश दिला जात असल्याचा प्रकार काही कनिष्ठ महाविद्यालयात सुरू आहे. प्रसिद्ध व चांगल्या महाविद्यालयात आपल्याला प्रवेश मिळावा, असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असले तरी त्या महाविद्यालयात क्षमते इतक्याच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळते. तेव्हा अनेकांची हिरमोड होत आहे. ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयात मात्र वेगळी स्थिती आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचा विविध क्षेत्राकडे कल२० दिवसांपूर्वी बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. यामध्ये अनेकांनी अभियांत्रिकी, कला, विज्ञान, आयटीआय, पॉलीटेक्नीक अभ्यासक्रमाची निवड केली असून प्रवेशासाठी तशी तयारी चालवली आहे. अनेकांचे प्रवेश निश्चीत झाले आहेत. दहावीत उत्तीर्ण झालेल्यांपेक्षा अकराव्या वर्गाची जिल्ह्याची प्रवेश क्षमता जास्त आहे. मोठ्या शहरांमध्ये आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात महाविद्यालयस्तरावर थेट प्रवेश मिळत असल्याने प्रवेशासंबधी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण नाही. - संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)जिल्हा परिषद, चंद्रपूर.