शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती; युद्धविरामानंतर शरद पवारांचं भाष्य
6
कडक सॅल्यूट! "डॅडी... मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

दुधासाठी नागपूर, वर्धा गोंदियावर अवलंबून

By admin | Updated: June 21, 2017 00:40 IST

या जिल्ह्यात दररोज ४५ हजार लिटर दुधाची गरज आहे. त्याच वेळी उत्पादन मात्र केवळ ८ हजार ५०० लिटर होत असते.

४५ हजार लिटर दुधाची गरज : खासगी कंपन्यांचे वर्चस्वलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : या जिल्ह्यात दररोज ४५ हजार लिटर दुधाची गरज आहे. त्याच वेळी उत्पादन मात्र केवळ ८ हजार ५०० लिटर होत असते. परिणामी दुधाच्या बाजारपेठेतील बहुसंख्य भाग खासगी कंपन्यांनी व्यापला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा, गोंदिया, नागपूर, भंडारा आदी जिल्ह्यांमधील दूध दररोज सकाळी येत आहे.राज्याच्या दुग्धविकास विभागाने शेतकऱ्यांच्या दूध खरेदीवर तीन रुपयांची वाढ केली आहे. त्याचा आर्थिक भार ग्राहकांवर टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांना जुन्याच दराने दूध मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही दुग्धविकास खात्याच्या नवीन निर्णयाचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात सध्या नागभीड आणि ब्रह्मपुरी या दोन तालुक्यामध्येच मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होत असते. सध्या शासकीय योजनेच्या ३७ वितरकांना एजन्सी देण्यात आल्या आहेत. या एजन्सी दूध वितरण करीत आहेत.चंद्रपूर येथील शासकीय दूध योजनेत २० जून रोजी ७ हजार ६०० लिटर दूध आले. त्या सर्व दुधाचे वितरण जिल्ह्यात करण्यात आले आहे. जिल्ह्यात नागभीड येथे दूध थंड करण्याचे संयत्र सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथेही असेच संयत्र सुरू आहे. उमरेडमधील दूध नागभीड येथे येते. दोन्ही ठिकाणचे दूध चंद्रपूरला पाठविण्यात येते. नागभीड व उमरेड येथील मिळून ३ हजार ७५५ लिटर दूध चंद्रपूरच्या शासकीय दूध योजनेत येत आहे. याशिवाय वर्धा येथून २ हजार २५७ लिटर आणि गोंदिया जिल्ह्यातील कोमारा येथून २ हजार ५४० लिटर असे एकत्रित ८ हजार ५५२ लिटर शासकीय दुधाचे जिल्ह्यात वितरण करण्यात येते. या सर्व शासकीय योजनेला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वाढीव दराचा लाभ मिळणार आहे.केवळ आठ दूध संघ जिवंतचंद्रपूर जिल्ह्यात २४७ सहकारी दूध संघ स्थापन झाले आहेत. मात्र, त्यापैकी अनेक दूध संघ अवसानात गेले किंवा वादामध्ये बंद पडले. चंद्रपूरच्या शासकीय दूध योजनेची स्थापना १९७९मध्ये झाली होती. सध्या केवळ आठ संस्था सुरू आहेत. त्यापैकी नागभीड तालुक्यातील पाच आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील तीन सहकारी संस्था आहेत.खासगी कंपन्यांचे ३५ हजार लिटर दूधजिल्ह्यात सर्वाधिक दूध खासगी कंपन्यांचे विकले जाते. शासकीय दूध योजनेत दूध संकलन कमी प्रमाणात होते. मागणीपेक्षा दूध उत्पादन कमी असल्याने पुरवठादेखील त्याच प्रमाणात होत आहे. नागपूर येथील दिनशॉ, महानंदा, हल्दीराम, भंडारा येथील किसान, पूर्णा-पवनी, क्रीमलाईन जर्सी, गोवर्धन आदी कंपन्या तब्बल ३५ हजार लिटर दुधाचा पुरवठा करीत आहेत.तीन प्रक्रिया केंदे्र बंदचंद्रपूर जिल्ह्यात खडसंगी येथे चिलिंग सेंटर होते. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली व कनेरी येथेही असेच केंद्र होते. परंतु शासकीय दूध योजनेसाठी दूध संकलन कमी होत गेल्याने या तिन्ही केंद्रांना दूध पुरवठा अत्यल्प होत होता. दुधाची वाहतूक करणे परवडत नसल्याने हे तिन्ही केंद्र बंद पडले आहेत.शासनाने न परवडणारे मार्ग बंद करण्यास सांगितले आहे. जिल्ह्यातील वातावरणात दुसऱ्या राज्यातील गाई टिकाव धरत नाहीत. त्यांचे दूध कमी आले आहे. अनेकांनी बाहेरून गायी आणून दूध उत्पादन करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी ठरला. यांत्रिक शेतीमुळे दुधाळ जनावरे कमी झाली आहेत. त्याचाही परिणाम शासकीय दूध संकलनावर झाला आहे.- डी. के. काळे,प्रभारी दुग्ध विकासअधिकारी, चंद्रपूर.