शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी वनविभागात सर्वाधिक वाघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:59 IST

सध्या जंगलातील वन्यप्राण्यांचा अधिवास झपाट्याने कमी होत आहे. शहरीकरण आणि जंगलातील वृक्षतोड यामुळे जंगलाचे क्षेत्रही विरळ आणि कमी होऊ लागले आहे. याशिवाय वातावरण बदलामुळे जंगलातील पाण्याचे स्रोत अनेकदा आटत असल्याने पाणी आणि शिकारीच्या शोधात वाघ, बिबट व इतर वन्यप्राणी गावशिवाराकडे कूच करीत आहेत. यामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत आहे.

ठळक मुद्देआठ वर्षातील आकडेवारी : विविध कारणांनी २२ वाघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या जंगलातील वन्यप्राण्यांचा अधिवास झपाट्याने कमी होत आहे. शहरीकरण आणि जंगलातील वृक्षतोड यामुळे जंगलाचे क्षेत्रही विरळ आणि कमी होऊ लागले आहे. याशिवाय वातावरण बदलामुळे जंगलातील पाण्याचे स्रोत अनेकदा आटत असल्याने पाणी आणि शिकारीच्या शोधात वाघ, बिबट व इतर वन्यप्राणी गावशिवाराकडे कूच करीत आहेत. यामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत आहे. मागील आठ वर्षांचा अभ्यास केला तर चंद्रपूर, मध्यचांदा वनविभागाच्या तुलनेत ब्रह्मपुरी वनविभागात हा संघर्ष शिगेला पोहचल्याचे दिसते. या क्षेत्रात आठ वर्षात सुमारे ३० जणांचा बळी गेला आहे. एवढेच नाही तर २२ वाघ आणि २७ बिबट्यांचाही या क्षेत्रात मृत्यू झाला आहे.चंद्रपूर हा जिल्हा खनिज संपत्तीने नटलेला आहे. कोळसा, सिमेंट खाणी, आयुधनिर्माणी कारखाना व आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे वीज निर्मिती केंद्र या जिल्ह्यात असल्याने चंद्रपूर जिल्हा देशात सुपरिचित आहे. असे असले तरी अलिकडच्या काळात चंद्रपूर वाघांचा जिल्हा म्हणून देशभर ओळखला जातो. त्याचे कारणही तसेच आहे. अलिकडच्या काळात जिल्ह्यात वाघांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यासोबतच बिबट्यांचीही संख्या वाढली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांच्या प्रजनानासाठी पोषक असल्याने हे शक्य होत आहे. असे असले तरी जंगल मात्र तेवढेच; किंबहुना त्यापेक्षा कमी होत असल्याने वाघासाठी जंगलातील अधिवास कमी होत आहे. प्रत्येक वाघाचे एक वेगळे क्षेत्र असते. या क्षेत्रात दुसºया वाघाचा वावर तो खपवून घेत नाही. या प्रकारामुळे वाघाचा मागील काही वर्षात मानवी वस्तीकडे वावर वाढू लागला आहे. गावशिवारात वाघाचे दर्शन होत आहे. पाळीव प्राणी आणि वन्यप्राण्यांवरही हल्ले होत आहे. चंद्रपूर वनविभाग, मध्यचांदा वनविभाग व ब्रह्मपुरी वनविभागात मोठ्या प्रमाणावर वाघ, बिबट्यांचे मानवांवर हल्ले झाले आहेत. यातील ब्रह्मपुरी वनविभागात सर्वाधिक व्याघ्र हल्ले घडून आले आहेत. या क्षेत्रात मागील आठ वर्षात ३० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. याशिवाय शेकडो पाळीव प्राण्यांनाही वाघ व बिबट्याने ठार केले आहेत. विशेष म्हणजे, एकट्या ब्रह्मपुरी वनविभागात मागील आठ वर्षात तब्बल २२ वाघांचा मृत्यू झाला आहे. यात २०१० मध्ये एक, २०११ मध्ये तीन, २०१२ मध्ये एक, २०१३ मध्ये एक, २०१५ मध्ये तीन, २०१६ मध्ये चार, २०१७ मध्ये तीन, २०१८ मध्ये सहा वाघांचा मृत्यू झाला आहे.२७ बिबट्यांचाही मृत्यूब्रह्मपुरी वनविभागात वाघांसोबत बिबट्यांचीही संख्या अलिकडे वाढली आहे. मात्र जंगल परिसर कमी होत असल्याने व गावशिवारात झुडुपी जंगल वाढत असल्याने बिबट्याचाही मानवी हद्दीत वावर वाढला आहे. ब्रह्मपुरी वनविभागात मागील आठ वर्षात तब्बल २७ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यात २०१० मध्ये दोन, २०११ मध्ये चार, २०१२ मध्ये चार, २०१३ मध्ये एक, २०१४ मध्ये दोन, २०१५ मध्ये एक, २०१६ मध्ये पाच, २०१७ मध्ये तीन, २०१८ मध्ये पाच बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.