शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

ब्रह्मपुरी वनविभागात सर्वाधिक वाघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:59 IST

सध्या जंगलातील वन्यप्राण्यांचा अधिवास झपाट्याने कमी होत आहे. शहरीकरण आणि जंगलातील वृक्षतोड यामुळे जंगलाचे क्षेत्रही विरळ आणि कमी होऊ लागले आहे. याशिवाय वातावरण बदलामुळे जंगलातील पाण्याचे स्रोत अनेकदा आटत असल्याने पाणी आणि शिकारीच्या शोधात वाघ, बिबट व इतर वन्यप्राणी गावशिवाराकडे कूच करीत आहेत. यामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत आहे.

ठळक मुद्देआठ वर्षातील आकडेवारी : विविध कारणांनी २२ वाघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या जंगलातील वन्यप्राण्यांचा अधिवास झपाट्याने कमी होत आहे. शहरीकरण आणि जंगलातील वृक्षतोड यामुळे जंगलाचे क्षेत्रही विरळ आणि कमी होऊ लागले आहे. याशिवाय वातावरण बदलामुळे जंगलातील पाण्याचे स्रोत अनेकदा आटत असल्याने पाणी आणि शिकारीच्या शोधात वाघ, बिबट व इतर वन्यप्राणी गावशिवाराकडे कूच करीत आहेत. यामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत आहे. मागील आठ वर्षांचा अभ्यास केला तर चंद्रपूर, मध्यचांदा वनविभागाच्या तुलनेत ब्रह्मपुरी वनविभागात हा संघर्ष शिगेला पोहचल्याचे दिसते. या क्षेत्रात आठ वर्षात सुमारे ३० जणांचा बळी गेला आहे. एवढेच नाही तर २२ वाघ आणि २७ बिबट्यांचाही या क्षेत्रात मृत्यू झाला आहे.चंद्रपूर हा जिल्हा खनिज संपत्तीने नटलेला आहे. कोळसा, सिमेंट खाणी, आयुधनिर्माणी कारखाना व आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे वीज निर्मिती केंद्र या जिल्ह्यात असल्याने चंद्रपूर जिल्हा देशात सुपरिचित आहे. असे असले तरी अलिकडच्या काळात चंद्रपूर वाघांचा जिल्हा म्हणून देशभर ओळखला जातो. त्याचे कारणही तसेच आहे. अलिकडच्या काळात जिल्ह्यात वाघांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यासोबतच बिबट्यांचीही संख्या वाढली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांच्या प्रजनानासाठी पोषक असल्याने हे शक्य होत आहे. असे असले तरी जंगल मात्र तेवढेच; किंबहुना त्यापेक्षा कमी होत असल्याने वाघासाठी जंगलातील अधिवास कमी होत आहे. प्रत्येक वाघाचे एक वेगळे क्षेत्र असते. या क्षेत्रात दुसºया वाघाचा वावर तो खपवून घेत नाही. या प्रकारामुळे वाघाचा मागील काही वर्षात मानवी वस्तीकडे वावर वाढू लागला आहे. गावशिवारात वाघाचे दर्शन होत आहे. पाळीव प्राणी आणि वन्यप्राण्यांवरही हल्ले होत आहे. चंद्रपूर वनविभाग, मध्यचांदा वनविभाग व ब्रह्मपुरी वनविभागात मोठ्या प्रमाणावर वाघ, बिबट्यांचे मानवांवर हल्ले झाले आहेत. यातील ब्रह्मपुरी वनविभागात सर्वाधिक व्याघ्र हल्ले घडून आले आहेत. या क्षेत्रात मागील आठ वर्षात ३० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. याशिवाय शेकडो पाळीव प्राण्यांनाही वाघ व बिबट्याने ठार केले आहेत. विशेष म्हणजे, एकट्या ब्रह्मपुरी वनविभागात मागील आठ वर्षात तब्बल २२ वाघांचा मृत्यू झाला आहे. यात २०१० मध्ये एक, २०११ मध्ये तीन, २०१२ मध्ये एक, २०१३ मध्ये एक, २०१५ मध्ये तीन, २०१६ मध्ये चार, २०१७ मध्ये तीन, २०१८ मध्ये सहा वाघांचा मृत्यू झाला आहे.२७ बिबट्यांचाही मृत्यूब्रह्मपुरी वनविभागात वाघांसोबत बिबट्यांचीही संख्या अलिकडे वाढली आहे. मात्र जंगल परिसर कमी होत असल्याने व गावशिवारात झुडुपी जंगल वाढत असल्याने बिबट्याचाही मानवी हद्दीत वावर वाढला आहे. ब्रह्मपुरी वनविभागात मागील आठ वर्षात तब्बल २७ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यात २०१० मध्ये दोन, २०११ मध्ये चार, २०१२ मध्ये चार, २०१३ मध्ये एक, २०१४ मध्ये दोन, २०१५ मध्ये एक, २०१६ मध्ये पाच, २०१७ मध्ये तीन, २०१८ मध्ये पाच बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.