शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

बाजाराला परवानगी मात्र, ग्रामसभा ""लाॅकडाऊन""

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:25 IST

नागभीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या विविध उपक्रमांना व बाजारांना शासनाने परवानगी दिली. मात्र ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांवर अद्याप स्थगितीच ...

नागभीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या विविध उपक्रमांना व बाजारांना शासनाने परवानगी दिली. मात्र ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांवर अद्याप स्थगितीच आहे. या ग्रामसभा आठ महिन्यांपासून ''''लाॅकडाऊन'''' आहेत. यावरून गावखेड्यात आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध शासकीय उपक्रमांसह ग्रामसभांच्या आयोजनासही स्थगिती देण्यात आली होती. ग्रामसभा स्थगितीसंबंधीचा आदेश राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने १२ मे २०२० रोजी निर्गमित केला होता. ग्रामसभांवरील ही स्थगिती आजही कायम आहे.

मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ७ नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामपंचायतींच्या चार ग्रामसभा घेणे प्रत्येक ग्रामपंचायतींना बंधनकारक आहे. या ग्रामसभांचे आयोजन न केल्यास संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना जबाबदार धरून त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची तरतूद या अधिनियमात आहे. शासन निर्णय झाला तेव्हा कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता ही स्थगिती आवश्यकही होती. मात्र आता परिस्थिती हळूहळू निवळत आहे. निवळत असलेली ही परिस्थिती लक्षात घेऊनच शासनाने निर्बंध घातलेल्या अनेक बाबींना परवानगी दिली आहे. यात आठवडी बाजारांचाही समावेश आहे. हाच नियम ग्रामसभांना का लागू करण्यात येऊ नये, असा सवाल ग्रामीण भागात विचारल्या जात आहे.

सध्या राज्यभरात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धडाका सुरू आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने ग्रा.पं.क्षेत्रात आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे निवडणूक प्रभावित ग्रा.पं.क्षेत्रात आचारसंहिता लागू असली तरी अनेक ग्रामपंचायती निवडणुकीपासून दूर आहेत. अशा निवडणूक नसलेल्या ग्रामपंचायतींमधून ग्रामसभेचा प्रयोग करण्यास काय हरकत आहे, असाही सवाल व्यक्त होत आहे.

बॉक्स

कार्योत्तर परवागी ?

सध्या ग्रामसभांवर स्थगिती असल्यामुळे २०२१ - २२ या आर्थिक वर्षासाठीच्या विविध आराखड्यांना मासिक सभेतच मंजुरी प्रदान करण्यात येत आहे. वैयक्तिक लाभाच्या योजना, मंजूर आराखडा, सुटलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या योजना आदी विविध योजनांचाही यात समावेश आहे.या योजनांना किंवा मासिक सभेची परवानगी घेऊन करण्यात आलेल्या विविध कामांना जेव्हा ग्रामसभांवरील स्थगिती उठविल्या जाईल, तेव्हा होणाऱ्या ग्रामसभेतून कार्योत्तर परवानगी घेतल्या जाईल,अशी विश्वसनीय माहिती आहे.