शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

खंजेरीने चेतविले स्वातंत्र्याचे स्पुल्लिंग..!

By admin | Updated: August 15, 2016 00:34 IST

इंग्रजांची जुलमी राजवट भारतातून उलथवून टाकण्यासाठी गांधीजीच्या नेतृत्वात ‘चलेजाव’चा नारा देण्यात आला होता.

ब्रिटिशांचा राष्ट्रसंतांना प्रतिबंध : दोन वर्षे नऊ महिने होती जिल्हाबंदीराजकुमार चुनारकर चिमूरइंग्रजांची जुलमी राजवट भारतातून उलथवून टाकण्यासाठी गांधीजीच्या नेतृत्वात ‘चलेजाव’चा नारा देण्यात आला होता. गांधीजीच्या या नाऱ्यामुळे पूर्ण भारतात ब्रिटिश सत्तेविरूद्ध जनआक्रोश उफाळलेला होता. त्याच सुमारास चिमूर परिसरात वास्तव्यास असलेल्या राष्ट्रसंताच्या खंजेरीच्या खणखणटाने प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्याचे स्पुल्लिंग चेतविले. राष्ट्रसंतांच्या भजनाने प्रेरीत होवून चिमूर येथील क्रांतीकारकानी इंग्रजी सत्ता उलथवून लावण्यासाठी जनआंदोलन उभारले. या आंदोलनामध्ये १६ आॅगस्ट १९४२ ला अनेक इंग्रज जुलमी अधिकाऱ्याचे मुडदे पाडून चिमूरला सलग तीन दिवस इंग्रजाच्या गुलामीतून मुक्त करण्यात आले होते. ही सर्व क्रांती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या खंजेरीच्या खणखणाटात व भजनाच्या प्रेरणेने आल्याचा ठपका राष्ट्रसंतावर ठेवून ब्रिटिश सरकारने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना चांदा जिल्हा प्रवेशावर बंदी घातली होती.‘जाग उठो बालविरों, अब तुम्हारी बारी है.... झाड झडुले शस्त्र बनेंगे, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे...’ या खंजेरीच्या खणखणाटासह क्रांतिकारी भजनाने चिमूरातील युवकामध्ये इंग्रज सत्तेविरूद्ध रणशिंग फुंकले होते. याच भजनाने प्रेरित होऊन १६ आॅगस्ट १९४२ रोजी नागपंचमीच्या दिवशी गावात प्रभातफेरी काढली. या प्रभात फेरीविरूद्ध इंग्रजांनी संचार बंदी लागू केली. मात्र संचार बंदीला न जुमानता क्रांतीकारकांनी जुलमी इंग्रज अधिकारी जरासंध, एसडीओ डुगाजी व इंग्रज अधिकारी सोनवाने यांचा वध करून चिमूरच्या पोलीस ठाण्यात ब्रिटिशांचा ध्वज उतरवून तिरंगा फडकाविला. चिमूरकरांनी सलग १६, १७ व १८ आॅगस्ट असे तीन दिवस देशात प्रथम स्वातंत्र्य उपभोगले. या स्वातंत्र्याची घोषणा बर्लिन रेडिओवरून सुभाषचंद्र बोस यांनी केली होती.१६ आॅगस्ट १९४२ च्या चिमूर क्रांतीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना कारणीभूत ठरवून ब्रिटिश सरकारने राष्ट्रसंतांना २८ आॅगस्टच्या पहाटे बाबुपेठ, चंद्रपूर येथील चार्तुमास शिबिरात असतांना डी.सी. सुब्रम्हण्यम् व डी.एस.पी. सर्कल इन्स्पेक्टर शर्मा यांनी राष्ट्रसंतांना अटक केली होती. राष्ट्रसंतांना चंद्रपूरच्या जेलमध्ये ठेवल्यास गडबड होऊ शकते म्हणून ब्रिटिशांनी राष्ट्रसंतांना नागपूरच्या सेन्ट्रल जेलमध्ये नेण्यात आले. तिथून त्यांना रायपूरला हलविण्यात आले. रायपूरच्या कारागृहामध्ये राष्ट्रसंतांना रूम क्रमांक ४९७ वर्ग १ मध्ये बंदिस्त करण्यात आले होते. महाराजांच्या सुटकेसाठी क्रांतिवीराची खटपट सुरू झाली होती. जनतेची मागणी तथा महाराजांचे धार्मिक कार्य व शुध्दता लक्षात घेऊन ब्रिटिशांनी २ डिसेंबर १९४२ रोजी राष्ट्रसंताची कारागृहातून सुटका केली.चिमूर क्रांती लढ्यासाठी महाराजांनी चिमूर तालुक्यातील गावागावात युवकांना जागवून तलवार, लाठीकाठीचे प्रशिक्षण देवून जागृती केली. तसेच क्रांतीकारी भजनाने व खंजेरीच्या खणखणाटाने चिमूर नगरीत क्रांती झाली होती. चिमूरची क्रांती आजही देशात अजरामर आहे. या क्रांतीसाठी कारणीभूत ठरवून इंग्रज सरकारने राष्ट्रसंतांना चंद्रपूर जिल्हा बंदी केली होती. ही जिल्हा बंदी २ वर्षे ९ महिने ठेवण्यात आली होती. आजही चिमूर परिसराला राष्ट्रसंताची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाते. तर प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रम राष्ट्रसंतांच्या जयघोषाशिवाय पूर्ण होत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आजही चिमूरकरांच्या हृदयामध्ये वास करीत आहे. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ च्या चिमूर क्रांतीतील राष्ट्रसंताच्या योगदानाची कल्पना येते.