शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

खंजेरीने चेतविले स्वातंत्र्याचे स्पुल्लिंग..!

By admin | Updated: August 15, 2016 00:34 IST

इंग्रजांची जुलमी राजवट भारतातून उलथवून टाकण्यासाठी गांधीजीच्या नेतृत्वात ‘चलेजाव’चा नारा देण्यात आला होता.

ब्रिटिशांचा राष्ट्रसंतांना प्रतिबंध : दोन वर्षे नऊ महिने होती जिल्हाबंदीराजकुमार चुनारकर चिमूरइंग्रजांची जुलमी राजवट भारतातून उलथवून टाकण्यासाठी गांधीजीच्या नेतृत्वात ‘चलेजाव’चा नारा देण्यात आला होता. गांधीजीच्या या नाऱ्यामुळे पूर्ण भारतात ब्रिटिश सत्तेविरूद्ध जनआक्रोश उफाळलेला होता. त्याच सुमारास चिमूर परिसरात वास्तव्यास असलेल्या राष्ट्रसंताच्या खंजेरीच्या खणखणटाने प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्याचे स्पुल्लिंग चेतविले. राष्ट्रसंतांच्या भजनाने प्रेरीत होवून चिमूर येथील क्रांतीकारकानी इंग्रजी सत्ता उलथवून लावण्यासाठी जनआंदोलन उभारले. या आंदोलनामध्ये १६ आॅगस्ट १९४२ ला अनेक इंग्रज जुलमी अधिकाऱ्याचे मुडदे पाडून चिमूरला सलग तीन दिवस इंग्रजाच्या गुलामीतून मुक्त करण्यात आले होते. ही सर्व क्रांती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या खंजेरीच्या खणखणाटात व भजनाच्या प्रेरणेने आल्याचा ठपका राष्ट्रसंतावर ठेवून ब्रिटिश सरकारने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना चांदा जिल्हा प्रवेशावर बंदी घातली होती.‘जाग उठो बालविरों, अब तुम्हारी बारी है.... झाड झडुले शस्त्र बनेंगे, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे...’ या खंजेरीच्या खणखणाटासह क्रांतिकारी भजनाने चिमूरातील युवकामध्ये इंग्रज सत्तेविरूद्ध रणशिंग फुंकले होते. याच भजनाने प्रेरित होऊन १६ आॅगस्ट १९४२ रोजी नागपंचमीच्या दिवशी गावात प्रभातफेरी काढली. या प्रभात फेरीविरूद्ध इंग्रजांनी संचार बंदी लागू केली. मात्र संचार बंदीला न जुमानता क्रांतीकारकांनी जुलमी इंग्रज अधिकारी जरासंध, एसडीओ डुगाजी व इंग्रज अधिकारी सोनवाने यांचा वध करून चिमूरच्या पोलीस ठाण्यात ब्रिटिशांचा ध्वज उतरवून तिरंगा फडकाविला. चिमूरकरांनी सलग १६, १७ व १८ आॅगस्ट असे तीन दिवस देशात प्रथम स्वातंत्र्य उपभोगले. या स्वातंत्र्याची घोषणा बर्लिन रेडिओवरून सुभाषचंद्र बोस यांनी केली होती.१६ आॅगस्ट १९४२ च्या चिमूर क्रांतीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना कारणीभूत ठरवून ब्रिटिश सरकारने राष्ट्रसंतांना २८ आॅगस्टच्या पहाटे बाबुपेठ, चंद्रपूर येथील चार्तुमास शिबिरात असतांना डी.सी. सुब्रम्हण्यम् व डी.एस.पी. सर्कल इन्स्पेक्टर शर्मा यांनी राष्ट्रसंतांना अटक केली होती. राष्ट्रसंतांना चंद्रपूरच्या जेलमध्ये ठेवल्यास गडबड होऊ शकते म्हणून ब्रिटिशांनी राष्ट्रसंतांना नागपूरच्या सेन्ट्रल जेलमध्ये नेण्यात आले. तिथून त्यांना रायपूरला हलविण्यात आले. रायपूरच्या कारागृहामध्ये राष्ट्रसंतांना रूम क्रमांक ४९७ वर्ग १ मध्ये बंदिस्त करण्यात आले होते. महाराजांच्या सुटकेसाठी क्रांतिवीराची खटपट सुरू झाली होती. जनतेची मागणी तथा महाराजांचे धार्मिक कार्य व शुध्दता लक्षात घेऊन ब्रिटिशांनी २ डिसेंबर १९४२ रोजी राष्ट्रसंताची कारागृहातून सुटका केली.चिमूर क्रांती लढ्यासाठी महाराजांनी चिमूर तालुक्यातील गावागावात युवकांना जागवून तलवार, लाठीकाठीचे प्रशिक्षण देवून जागृती केली. तसेच क्रांतीकारी भजनाने व खंजेरीच्या खणखणाटाने चिमूर नगरीत क्रांती झाली होती. चिमूरची क्रांती आजही देशात अजरामर आहे. या क्रांतीसाठी कारणीभूत ठरवून इंग्रज सरकारने राष्ट्रसंतांना चंद्रपूर जिल्हा बंदी केली होती. ही जिल्हा बंदी २ वर्षे ९ महिने ठेवण्यात आली होती. आजही चिमूर परिसराला राष्ट्रसंताची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाते. तर प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रम राष्ट्रसंतांच्या जयघोषाशिवाय पूर्ण होत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आजही चिमूरकरांच्या हृदयामध्ये वास करीत आहे. त्यामुळे १६ आॅगस्ट १९४२ च्या चिमूर क्रांतीतील राष्ट्रसंताच्या योगदानाची कल्पना येते.