शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
3
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
4
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
5
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
6
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
7
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
8
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
9
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
10
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
11
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
12
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
13
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
14
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
15
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
16
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
17
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
18
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
19
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
20
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत

पाणी टंचाईने होरपळतोय जिवती तालुका

By admin | Updated: March 21, 2016 00:40 IST

चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुका म्हटले तर पाणीटंचाई पुजलेलीच. असा एकही वर्ष नाही की, या तालुक्यात पाणी टंचार्ई नाही.

पाण्यासाठी पायपीट : गढूळ पाण्यावर जगतात जनावरेसंघरक्षीत तावाडे  जिवती चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुका म्हटले तर पाणीटंचाई पुजलेलीच. असा एकही वर्ष नाही की, या तालुक्यात पाणी टंचार्ई नाही. दरवर्षी पाऊस पडत असला तरी हा तालुका उंच अशा पहाडावर वसला असल्याने पावसाचे पाणी पडते तसाच पहाडावरून घसरून निघून जाते. पाणी अडावे यासाठी नाल्यावर बांध नाहीत किंवा तलावही नाहीत. परिणामी उन्हाळ्यात महिलांना पायपीट करावी लागत आहे.जिवती तालुक्यातील अनेक गावात पाण्याचे स्रोत जरी असले तरी त्यात पाण्याचा साठा नसल्याने गावकऱ्यांना विशेष करून महिलांना गावाबाहेरील एखाद्या शेतातील विहिरीतून किंवा नाल्यातील पाणी डोक्यावर वाहून आणावे लागते. नाले किंवा तलावातील पाणी सध्या कमी झाल्यामुळे जनावरांना मिळेल तेथील गढूळ पाणी पिऊन आपली तहाण भागवावी लागत आहे.लोकप्रतिनिधी असो वा प्रशासन, यांचे नेहमीच जिवती तालुक्याकडे दुर्लक्ष राहिले आहे. नेहमी पाण्याची बोंब असताना तालुक्यातील जनतेला पाण्याची सोय करून देऊन पाणी पाजणारा खंबीर वाली मिळालेला नाही. नेहमी टँकरमुक्त तालुका करू असे म्हणणारे लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी हे पाणीटंचाईमुक्त तर सोडाच, पण मंजूर टँकरसुद्धा पाठवत नाहीत, ही येथील जनतेसाठी शोकांतिका आहे. तालुक्यात गावाची संख्या ८३ आहे. त्यापैकी आजच्या घडीला १७ गावे ही पाणीटंचाईने होरपळत आहेत. अनेक आदिवासी गावात पाण्याची साधने नसल्याने एक ते दोन किमी अंतरावरून डोक्यावर किंवा बैलबंडीवरून पाणी आणावे लागते आहे. हातपंपाच्या बाबतीत ३५ ग्रामपंचायतीपैकी २८ ग्रा. प. कडे पाणी कराचे ८ लाख ४५ हजार रूपये थकबाकी होते. आतापर्यंत ३ लाख ४२ हजार रूपये ग्रा.पं. ने भरले आहे. अजूनही ५ लाख रुपये बाकी असल्याने ही रक्कम आल्यावर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे पाणी पुरवठा विभागाचे म्हणणे आहे.जलस्वराज्य योजना कुचकामीतालुक्यात जलस्वराज्य योजनेतंर्गत गावांना पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने शासनाने अनेक गावात योजना राबविली. पण गेल्या काही वर्षांपासून ही योजनाच बंद आहे. जिवती, लोलडोह, पुडियाल, मोहदा किंवा अन्य दोन-चार गावे सोडली तर ही योजना बाकी गावात फेल ठरली आहे. या योजनेतंर्गत कुठे टाकी तर कुठे विहीर तर कुठे केवळ पाईपलाईन टाकून अर्धवट कामे ठेवल्याचे दिसत आहे.२८ गावातील हातपंप नादुरूस्ततालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी वसुलीकडे कानाडोळा केला आहे. परिणामी थकबाकीचा आकड्याचा डोंगर वाढत चालला आहे. पाणीपट्टीची वसुली होत नसल्याने वसुली न देणाऱ्या गावांचा पाणीपुरवठा खंडीत करायचा, सोबतच बंद असलेली हातपंप दुरूस्त करायचा नाही. टंचाईच्या काळात घेतलेल्या या निर्णयाने पाणी टंचाईला आणखी ग्रहण लागलेले आहे.अधिकाऱ्यांकडून टंचाईग्रस्त गावांना भेटीपंचायत समितीचे उपसभापती सुग्रीव गोतावळे व संवर्ग विकास अधिकारी उमेश नंदागवळी यांनी तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना गेल्या महिनाभरापासून भेटी देत आहेत. पाणीटंचाई वाढत असताना यांच्या भेटीने गावकऱ्यात आपुलकी निर्माण होत असून पाणी समस्या सोडविण्यासाठी ते काय उपाययोजना करतात, याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.