शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईने होरपळतोय जिवती तालुका

By admin | Updated: March 21, 2016 00:40 IST

चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुका म्हटले तर पाणीटंचाई पुजलेलीच. असा एकही वर्ष नाही की, या तालुक्यात पाणी टंचार्ई नाही.

पाण्यासाठी पायपीट : गढूळ पाण्यावर जगतात जनावरेसंघरक्षीत तावाडे  जिवती चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुका म्हटले तर पाणीटंचाई पुजलेलीच. असा एकही वर्ष नाही की, या तालुक्यात पाणी टंचार्ई नाही. दरवर्षी पाऊस पडत असला तरी हा तालुका उंच अशा पहाडावर वसला असल्याने पावसाचे पाणी पडते तसाच पहाडावरून घसरून निघून जाते. पाणी अडावे यासाठी नाल्यावर बांध नाहीत किंवा तलावही नाहीत. परिणामी उन्हाळ्यात महिलांना पायपीट करावी लागत आहे.जिवती तालुक्यातील अनेक गावात पाण्याचे स्रोत जरी असले तरी त्यात पाण्याचा साठा नसल्याने गावकऱ्यांना विशेष करून महिलांना गावाबाहेरील एखाद्या शेतातील विहिरीतून किंवा नाल्यातील पाणी डोक्यावर वाहून आणावे लागते. नाले किंवा तलावातील पाणी सध्या कमी झाल्यामुळे जनावरांना मिळेल तेथील गढूळ पाणी पिऊन आपली तहाण भागवावी लागत आहे.लोकप्रतिनिधी असो वा प्रशासन, यांचे नेहमीच जिवती तालुक्याकडे दुर्लक्ष राहिले आहे. नेहमी पाण्याची बोंब असताना तालुक्यातील जनतेला पाण्याची सोय करून देऊन पाणी पाजणारा खंबीर वाली मिळालेला नाही. नेहमी टँकरमुक्त तालुका करू असे म्हणणारे लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी हे पाणीटंचाईमुक्त तर सोडाच, पण मंजूर टँकरसुद्धा पाठवत नाहीत, ही येथील जनतेसाठी शोकांतिका आहे. तालुक्यात गावाची संख्या ८३ आहे. त्यापैकी आजच्या घडीला १७ गावे ही पाणीटंचाईने होरपळत आहेत. अनेक आदिवासी गावात पाण्याची साधने नसल्याने एक ते दोन किमी अंतरावरून डोक्यावर किंवा बैलबंडीवरून पाणी आणावे लागते आहे. हातपंपाच्या बाबतीत ३५ ग्रामपंचायतीपैकी २८ ग्रा. प. कडे पाणी कराचे ८ लाख ४५ हजार रूपये थकबाकी होते. आतापर्यंत ३ लाख ४२ हजार रूपये ग्रा.पं. ने भरले आहे. अजूनही ५ लाख रुपये बाकी असल्याने ही रक्कम आल्यावर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे पाणी पुरवठा विभागाचे म्हणणे आहे.जलस्वराज्य योजना कुचकामीतालुक्यात जलस्वराज्य योजनेतंर्गत गावांना पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने शासनाने अनेक गावात योजना राबविली. पण गेल्या काही वर्षांपासून ही योजनाच बंद आहे. जिवती, लोलडोह, पुडियाल, मोहदा किंवा अन्य दोन-चार गावे सोडली तर ही योजना बाकी गावात फेल ठरली आहे. या योजनेतंर्गत कुठे टाकी तर कुठे विहीर तर कुठे केवळ पाईपलाईन टाकून अर्धवट कामे ठेवल्याचे दिसत आहे.२८ गावातील हातपंप नादुरूस्ततालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी वसुलीकडे कानाडोळा केला आहे. परिणामी थकबाकीचा आकड्याचा डोंगर वाढत चालला आहे. पाणीपट्टीची वसुली होत नसल्याने वसुली न देणाऱ्या गावांचा पाणीपुरवठा खंडीत करायचा, सोबतच बंद असलेली हातपंप दुरूस्त करायचा नाही. टंचाईच्या काळात घेतलेल्या या निर्णयाने पाणी टंचाईला आणखी ग्रहण लागलेले आहे.अधिकाऱ्यांकडून टंचाईग्रस्त गावांना भेटीपंचायत समितीचे उपसभापती सुग्रीव गोतावळे व संवर्ग विकास अधिकारी उमेश नंदागवळी यांनी तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना गेल्या महिनाभरापासून भेटी देत आहेत. पाणीटंचाई वाढत असताना यांच्या भेटीने गावकऱ्यात आपुलकी निर्माण होत असून पाणी समस्या सोडविण्यासाठी ते काय उपाययोजना करतात, याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.