शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

उदासीनतेत अडकले सिंचन

By admin | Updated: May 28, 2016 01:01 IST

शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन नवनवीन योजना राबविताना दिसत आहे.

खर्च कोट्यवधीने वाढला : उद्दिष्टाच्या निम्म्या हेक्टरवरही सिंचन नाहीरत्नाकर चटप नांदाफाटाशेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन नवनवीन योजना राबविताना दिसत आहे. कोरपना जिवती तालुक्यातही १९९० पासून विविध सिंचन प्रकल्पासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात अनेक प्रकल्प पुर्णत्वास न आल्याने शेतजमिनी अद्यापही सिंचनापासून वंचित असल्याचे दिसते. शासनाने याआधी विविध समित्या नेमून अहवाल तयार केला. यात विदर्भ सिंचन मंडळ, अवर्षण प्रवण सेल, जलसंधारण असे अनेक उपक्रम या दोनही तालुक्यात राबविले. परंतु सिंचन क्षेत्र वाढण्याऐवजी सिंचन प्रकल्पावरचा खर्च मात्र कोट्यवधी रुपयांचा झाला आहे. कोरपना तालुक्यात ३० वर्षांपूर्वी अमलनाला व पकडीगुड्डम ही धरणे पूर्णत्वास आली. या दोन्ही प्रकल्पाची सिंचन क्षमता ७ हजार हेक्टर इतकी असताना पाटबंधारे विभागाचे उद्दिष्ट साध्य करता आले नाही. या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना न मिळता तालुक्यातील सिमेंट कंपन्यांच्या घशात गेले. त्यामुळे ५० टक्केही शेतकऱ्यांना याचा फायदा झाला नाही. हे विदारक सत्य पुढे आहे. या प्रकल्पांना ३० वर्ष पूर्ण होऊनसुद्धा लघुकेची कामे अपूर्ण असल्याचे दिसते. मुख्य कालवा वगळता इतर छोट्या कालव्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे तालुक्यातील लखमापूर, थुटरा, कुकुडसाथ, पिंपळगाव, वनसडी, पिपर्डा, बिबी, धामणगाव, लोणी, खिर्डी, वडगाव, इंजापूर, देवघाट, कुसड, आसन आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर अजूनही पाणी पोहोचले नाही. यामुळे अवर्षण व विदर्भातील सिंचनाचा अनुशेष जैसे थे आहे. मात्र उद्योगांकडून पाण्याचा मोठा उपसा आजही करण्यात येत असल्याने कंपन्याच याचा फायदा अधिक घेत आहे. याबरोबरच जिवती तालुक्यातही सिंचनाच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी मोठा गाजावाजा करीत शासनाने जलसंधारण सिंचन निर्मिती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. २०१० मध्ये या कामाची सुरुवातही करण्यात आली. मात्र पाच वर्ष उलटूनसुद्धा शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले नाही आणि दुसरीकडे शेतजमिनीचा मोबदलाही मिळाला नसल्याची ओरड शेतकऱ्यांमध्ये आहे. जमिनीवर खोदकाम झाल्याने आता शेतकऱ्यांना शेतीही करता येत नाही.