शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
3
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
4
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
5
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
6
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
7
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
8
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
9
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
10
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
11
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
12
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
13
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
14
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
15
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
16
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
17
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
18
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
19
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
20
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू

अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले

By admin | Updated: March 8, 2017 00:40 IST

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक शहर व गावांना अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला.

शेतपिकांचे अतोनात नुकसान : वादळामुळे झाडे कोसळली, अनेक गावांतील बत्ती गूलचंद्रपूर : मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक शहर व गावांना अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. कोठारी, बल्लारपूर, राजुरा येथे गारांच खच पाहायला मिळाले. राजुरा, कोरपना, जिवती, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा आदी तालुक्यात अर्धा ते एक तास झालेल्या वादळी पावसाने हरभरा, तूर, लाखोरी, मिरची, मुंग आदी रबी शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले असून वीज तारांवर झाडे कोसळल्याने अनेक गावांतील बत्ती गूल झाली. बल्लारपूरला दोनदा झोडपलेमंगळवारला दुपारी ३ वाजता वादळी पावसाने गारांसह हजेरी लावल्याने बल्लारपूरकरांची चांगलेच तारांबळ उडाली. वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आणि विद्युत तारा तुटल्या. पहिल्या वादळी व गारपीटीच्या तीव्र पावसानंतर परत एक तासाने गारांसह पाऊस बरसला. येथे सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पण, दुपारी ११ वाजता प्रखर उन्ह असताना अडीच-तीन वाजताचय सुमारास वातावरणात बदल होऊन ३ वाजता तुरळक पाऊस सुरू झाला. बघता बघता वादळ सुटले आणि पाऊस झाला व गाराही पडल्या. हा वादळी पाऊस व गारांचा मारा बंद झाल्याच्या एक तासानंतर परत ढगांनी गडगडाट सुरु केला व पाऊस सुरु झाला. सोबत गाराही पडू लागल्या. पण, यावेळेला तीव्रता कमी होती. या वादळी पावसामुळे वीज खंडीत झाली. उशीरापर्यंत विद्युत पुरवठा खंडीत होता. पावसामुळे तालुक्यात मिरची तसेच कापस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. (तालुका प्रतिनिधी) घुग्घुस परिसरात पाऊसघुग्घुस : मंगळवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेतीन वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. शहरात विजेचा लंपडाव सुरू असून मंगळवारी साडेअकरा वाजतापासून तीन वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद होता.कोठारी परिसरात गारांचा पाऊसकोठारी : बल्लारपूर तालुक्यातील कोठारी परिसरात मंगळवारी दुपारी ३.३० वाजतापासून ५ वाजेपर्यंत गारांसह वादळी पावसाचा तडाखा बसला. त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुपारी ३ वाजताच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले. ३.३० वाजता वादळासह ५ वाजेपर्यंत गाराचा पाऊस सुरु होता. वादळाने अनेकांच्या घरांचे छप्पर उडाले. कोठारी परिसरात सध्या ज्वारी, गहू, हरभरा, मुंग, उदड,, मिरची पिकासह अनेक पिकांची लागवड झाली असून काहीनी कापनी सुरु केली तर काही कापणीवर येवून आहेत. अशात अवकाळी पाऊस गारासह बरसल्याने शेतपिकाची प्रचंड नासाडी झाली आहे. या नुकसानीची चौकशी करुन शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी जि.प. सदस्य वैशाली बुद्धलवार यांनी केली आहे. (वार्ताहर)