शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

भूविकास बॅंकेच्या कर्मचार्‍यांचे पुन्हा किती जीव घेणार ?

By admin | Updated: May 19, 2014 23:22 IST

यापूर्वी भूविकास बँकेच्या अनेक कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या. आर्थिक अडचणी व भविष्याची शास्वती नसल्यामुळे चिंताग्रस्त होवून अनेक कर्मचार्‍यांना हृदयविकाराचा

चंद्रपूर : यापूर्वी भूविकास बँकेच्या अनेक कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या. आर्थिक अडचणी व भविष्याची शास्वती नसल्यामुळे चिंताग्रस्त होवून अनेक कर्मचार्‍यांना हृदयविकाराचा धक्का बसून त्यात त्यांचा बळी गेला. ३0 एप्रिलला अमरावती येथील कर्मचारी राजेंद्र काळबांधे यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्र सरकार आणखी किती कर्मचार्‍यांचे जीव घेणार, असा प्रश्न भूविकास बँक कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष गणपत सत्रे यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मागील १७ वर्षांपासून बँकेचा व्यवसाय, कर्जवाटप बंद आहे. आठ वर्षांपासून कर्मचार्‍यांचे पगार अनियमित आहे. आजघडीला २४ महिन्यांचा पगार थकित असून नवृत्त कर्मचार्‍यांची देणी सहा वर्षांपासून मिळालेली नाही. कधी मिळणार याची निश्‍चिती नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या मुलांचे शिक्षण, लग्न, व्यवसाय, धंदा, नोकरीत अडचण निर्माण झाली आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने कर्मचार्‍यांच्या दोन पिढय़ांचा उद्ध्वस्त केले आहे. यापूर्वी कर्मचारी संघटना, शेतकरी, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्व प्रकारची आंदोलने केली. आठ वर्षांपासून सतत मागणी आंदोलने विधानसभेत प्रश्न मांडून पाठपुरावा केलेला आहे. नागपूर अधिवेशनामध्ये आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सहकार मंत्र्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला. मात्र तरीही बॅंक कर्मचार्‍यांच्या मागण्या मंजूर झाल्या नाहीत. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक वेळी आश्‍वासने दिली. परंतु आश्‍वासनाची पूर्तता आजवर झाली नसल्याचा आरोप सत्रे यांनी केला आहे. २४ महिन्यांपासून थकित असलेले पगार त्वरित देण्यात यावे, सहा वर्षांपासून न मिळालेली देणी नवृत्त कर्मचार्‍यांना त्वरित देण्यात यावी, बँक तोट्यात असताना राज्यस्तरीय बँकेचे सन २00१ ला जिल्हावार विभाजन करण्यात आले हे चुकीचे असून विभाजन रद्द करण्यात यावे, अशा मागण्या आहेत. (प्रतिनिधी)