शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

भूविकास बॅंकेच्या कर्मचार्‍यांचे पुन्हा किती जीव घेणार ?

By admin | Updated: May 19, 2014 23:22 IST

यापूर्वी भूविकास बँकेच्या अनेक कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या. आर्थिक अडचणी व भविष्याची शास्वती नसल्यामुळे चिंताग्रस्त होवून अनेक कर्मचार्‍यांना हृदयविकाराचा

चंद्रपूर : यापूर्वी भूविकास बँकेच्या अनेक कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या. आर्थिक अडचणी व भविष्याची शास्वती नसल्यामुळे चिंताग्रस्त होवून अनेक कर्मचार्‍यांना हृदयविकाराचा धक्का बसून त्यात त्यांचा बळी गेला. ३0 एप्रिलला अमरावती येथील कर्मचारी राजेंद्र काळबांधे यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्र सरकार आणखी किती कर्मचार्‍यांचे जीव घेणार, असा प्रश्न भूविकास बँक कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष गणपत सत्रे यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मागील १७ वर्षांपासून बँकेचा व्यवसाय, कर्जवाटप बंद आहे. आठ वर्षांपासून कर्मचार्‍यांचे पगार अनियमित आहे. आजघडीला २४ महिन्यांचा पगार थकित असून नवृत्त कर्मचार्‍यांची देणी सहा वर्षांपासून मिळालेली नाही. कधी मिळणार याची निश्‍चिती नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या मुलांचे शिक्षण, लग्न, व्यवसाय, धंदा, नोकरीत अडचण निर्माण झाली आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने कर्मचार्‍यांच्या दोन पिढय़ांचा उद्ध्वस्त केले आहे. यापूर्वी कर्मचारी संघटना, शेतकरी, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्व प्रकारची आंदोलने केली. आठ वर्षांपासून सतत मागणी आंदोलने विधानसभेत प्रश्न मांडून पाठपुरावा केलेला आहे. नागपूर अधिवेशनामध्ये आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सहकार मंत्र्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला. मात्र तरीही बॅंक कर्मचार्‍यांच्या मागण्या मंजूर झाल्या नाहीत. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक वेळी आश्‍वासने दिली. परंतु आश्‍वासनाची पूर्तता आजवर झाली नसल्याचा आरोप सत्रे यांनी केला आहे. २४ महिन्यांपासून थकित असलेले पगार त्वरित देण्यात यावे, सहा वर्षांपासून न मिळालेली देणी नवृत्त कर्मचार्‍यांना त्वरित देण्यात यावी, बँक तोट्यात असताना राज्यस्तरीय बँकेचे सन २00१ ला जिल्हावार विभाजन करण्यात आले हे चुकीचे असून विभाजन रद्द करण्यात यावे, अशा मागण्या आहेत. (प्रतिनिधी)