शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

जिल्हा परिषदांच्या कल्याणकारी योजनांवर गदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST

चंद्रपूर : पंचायतराज धोरणामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्याने जिल्हा परिषदांकडे २९ पेक्षा जास्त विषय होते. परंतु, राज्य शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार ...

चंद्रपूर : पंचायतराज धोरणामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्याने जिल्हा परिषदांकडे २९ पेक्षा जास्त विषय होते. परंतु, राज्य शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार जलजीवन मिशन अंमलबजावणीे अधिकारही जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीकडून जिल्हाधिका-यांकडे हस्तांतरीत केले. त्यामुळे जि. प. पदाधिकाºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

पंचायतराज व्यवस्थेमुळे जिल्हा परिषदांना योजना राबविण्यासाठी स्वायतत्ता मिळाली. त्यानंतर मात्र योजनांना कात्री लावून काम सुरू झाले. राज्यातील आघाडी सरकारकडून असाच प्रकार होत असल्याचे अधिकारांच्या हस्तांतरणातून पुढे आले आहे. या अधिसुचेनुसार जलजीवन मशिन अंतर्गत योजनांची अंमलबजावणी व निर्णय घेण्याचे अधिकार आता जि. प. च्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीऐवजी जिल्हाधिकाºयांकडे देण्यात आले. परिणामी, राज्यभरातील जिल्हा परिषदांचे अध्यक्ष व पदाधिका-यांनी ही अधिसूचना रद्द करण्यासाठी संघटनात्मक हालचाली सुरू केल्या आहेत.

सिंचन प्रकल्पांवरील अधिकार गोठविले

१०० हेक्टरखालील सिंचनाची कामे करण्यासाठी अन्य यंत्रणांना जि. प. कडून नाहरकत प्रमाणपत्र घेण्याची तरतूद होती. त्यामुळे जि. प. अंतर्गत प्रकल्पांची उपायोगिता तपासण्याचे अधिकार होते. मात्र हे अधिकारही गोठविण्यात आले.

सीईओंऐवजी जिल्हाधिकाºयांकडे अधिकार

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य योजनांसाठी कोट्यवधींचा निधी मिळतो. या निधीचा विनियोग करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे होते. आता जिल्हाधिकारी प्रमुख आहेत. नियोजन समितीकडून जि. प. ला औषध खरेदीसाठी लागणारा निधी मंजूर केला जातो. परंतु, हा निधी आरोग्य विभागाच्या संचालकांकडे आधी पाठवावा लागतो. या प्रक्रियेमुळे जि. प. च्या स्वायतत्तेला अर्थच उरला नाही, अशी टीका पदाधिकारी करीत आहेत.

कोट

जि. प. च्या योजना कमी झाल्या. यातून विकासकामांवर अनिष्ट परिणाम होण्याचा धोका आहे. स्वराज्य संस्थांचे लोकनियुक्त पदाधिकारी विविध समस्यांवर साधक-बाधक चर्चा करून निर्णय घेतात. मात्र, या संस्थांच्या स्वायतत्तेवर गदा आणण्याचे निर्णय घेतले जात आहेत.

-संध्या गुरनुले, अध्यक्ष जि. प. चंद्रपूर