शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

शेतमालाला भाव द्या, नाहीतर मरण...

By admin | Updated: November 12, 2016 00:51 IST

खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच निसर्गाने दगा दिला. हाती पैसा शिल्लक नसताना उसनवारी व कर्ज काढुन कसेतरी शेती पिकविली.

शेतकरी काकुळतीला : हाक शासन दरबारी पोहोचणार काय ?प्रकाश काळे गोवरीखरीप हंगामाच्या सुरूवातीलाच निसर्गाने दगा दिला. हाती पैसा शिल्लक नसताना उसनवारी व कर्ज काढुन कसेतरी शेती पिकविली. मात्र उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. उत्पादनापेक्षा खर्च वाढला. त्या तुलनेत शेतमालाला योग्य दर मिळणे अपेक्षीत होते. मात्र तसे न करता कापूस आणि सोयाबिनची कवडीमोल भावात खरेदी सुरू झाली आहे. हा तोकडा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे शेतमालाला योग्य भाव द्या, नाहीतर मरण... अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांत उमटत असून काकुळतीला आलेल्या शेतकऱ्यांची हाक शासनदरबारी पोहोचेल काय, हा प्रश्न आहे.शेतीला आज वाईट दिवस आले असून शेतकऱ्यांना कुणाचीही साथ उरली नाही. शेतीवर होणारा खर्च बघता शेतमालाला योग्य दर देणे अपेक्षीत आहे. मात्र तोकडा दर शेतकऱ्यांच्या माथी मारून कवडीमोल भावात कापूस व सोयाबीनची खरेदी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळाले पाहिजे, तरच शेतकरी सुखी होईल. शेतकऱ्यांचा हा संघर्ष गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. परंतु, शेतकऱ्यांना त्यांचा हक्कच अजुनपर्यंत मिळालेला नाही. हा शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक केला गेलेला अन्याय आहे. शेतमालाला भाव नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी दिवाळीही साजरी केली नाही. दिव्यांच्या लखलखाटात सारा आसमंत उजळून निघाला असताना शेतकऱ्यांच्या घरी अंधार पसरला होता. गरजेपोटी शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस काढला आहे. परंतु, हा तोकडा दर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे. शासनाने अजुनही कापसाचा दर घोषीत केला नाही. कवडीमोल भावात कापूस सोयाबिनची अक्षरश: लूट केली जात आहे. परंतु, शेतकऱ्यांचा नाईलाज झाला असून याचा पुरेपूर फायदा खासगी व्यापारी घेत आहे.कापसाची ५ रुपये किलोप्रमाणे वेचणी सुरू आहे. दोन हजार रुपये बॅग प्रमाणे शेतकऱ्यांनी सोयाबिनची कापणी केली. परंतु, १ हजार ८०० पासून दोन हजार ७०० पर्यंत सोयाबिन खरेदी करणे सुरू आहे. त्यामुळे निराश होऊन शेतकरी वर्ग आयुष्यच संपवायला निघाला आहे. परंतु, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांचा माल विकल्यावर जर दरवाढ करण्यात येत असेल तर तो जाणीवपूर्वक केला गेलेला अन्याय आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे शेतकरी पुरता काकुळतीला आला आहे. शेतमालाला भाव द्या, नाहीतर मरण... ही शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू म्हणणाऱ्या मोदी सरकारचे वाभाडे काढणारी आहे. त्यामुळे सरकारने शेतमालाला योग्य भाव देणे अपेक्षीत आहे.शेतकऱ्यांचे राजकीय पुढारी गेले कुठे?शेतकरी आज पूर्णत: देशोधडीला लागला आहे. शेतमालाला योग्य भाव नाही तरीही शेतकऱ्यांना गरजेपोटी कवडीमोल भावात आपला माल विकावा लागत आहे. निवडणूक काळात ‘हम तुम्हारे साथ है’ म्हणत शेतकऱ्यांच्या काळजातून बोलणारे राजकीय नेते आज गेले कुठे? शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणताही राजकीय नेता नाही, ही शोकांतिका आहे.शेतकऱ्यांना हवे घामाचे दामदिवस-रात्र ऊन-वारा, पाऊस थंडीची तमा न बाळगता शेतकरी वर्ग शेतात राबतो. मात्र त्याने पिकविलेल्या हक्काच्या चतकोर भाकरीलाही तो पोरका झाला आहे. शेतकऱ्यांना आता हक्काचे घामाचे दाम मिळाले पाहिजे, यासाठी सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे.