शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

घोडाझरी ते गडबोरी नहराच्या दुरुस्तीची गरज

By admin | Updated: March 19, 2016 00:45 IST

घोडाझरी सिंचाई विभागाचे पाणी नवरगाव परिसराला मिळत असले, तरी अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे,...

नवरगाव : घोडाझरी सिंचाई विभागाचे पाणी नवरगाव परिसराला मिळत असले, तरी अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे, कधी नियोजनाच्या अभावामुळे, कधी कालवा फुटल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक धोक्यात येते. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी घोडाझरी ते गडबोरी नहराच्या दुरुस्तीची गरज असून काही नागरिकांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.घोडाझरी तलाव इंग्रजांच्या काळात तयार करण्यात आला. त्यातील पाणी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कालवे (कॅनल) तयार करण्यात आले. तेव्हा घोडाझरी तलावावर अवलंबून असणारे शेतकरीही कमी असल्याने सर्वांना पाणी मुबलक मिळत होते आणि धान पिकही हमखास येत होते. या तलावावर दिवसेंदिवस अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. शेतीची आराजी वाढली. आता जवळजवळ सात हजार हेक्टर शेतजमीन अवलंबून आहे. तलाव तेवढाच आहे. कालवेही तेच आहेत. मात्र जे-जे कालवे तयार केले होते, ते जीर्ण झाले असून विविध ठिकाणी फुटलेले आहेत. बऱ्याच ठिकाणाची माती वाहून गेली आहे. काही ठिकाणची माती नहरात (कालव्यात) पडलेली असल्याने ते बुडालेले आहे. बऱ्याच वर्षापासून नहराचे काम हातात घेण्यात आले नाही. काही भागात नहराचे काँक्रीटीकरण केले. मात्र दोन-अडीच इंचचा थर असल्याने त्यालाही भेगा जावून मोठमोठे खड्डे पडले. एकूण कामच निकृष्ट दर्जाचे करण्यात आले.बऱ्याच ठिकाणी नहराची उंची कमी असल्याने जास्त पाणी सोडायचे म्हटले तर वरुन पाणी वाहून नहर फुटण्याची भीेती असते. म्हणूृन संबंधित विभाग आहे, त्या परिस्थितीत पाण्याचे वितरण करीत असल्याने शेवटपर्यंत पाणीच पोहचत नाही. आणि पर्यायाने घोडाझरी नहराच्या पाण्यावर अवलंबून असलेली धान शेती पाण्याअभावी नष्ट होत आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे.ही सर्व समस्या लक्षात घेवून नवरगाव येथील शेतकरी बांधवांनी सदर नहराच्या दुरस्तीच्या कामाच्या संदर्भात सिंचाई शाखा सिंदेवाहीचे सहायक अभियंता डी.जी. रिजवी यांची भेट घेऊन, त्यांना शिष्टमंडळाच्या वतीने १७ मार्चला विविध मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये नवरगाव येथील माजी सरपंच दीपक चहान्दे, दादाजी चनघनवार, बासीद शेख, संजय बोडणे, नामदेव बोरकर, मनोहर सहारे, संजय गभने, जानकीराम कामडी, भोला इदूलवार, उपासराव बोरकर यांचा समावेश होता.अधिकारी व शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली असून घोडाझरी तलावापासून ते गडबोरी-वानेरीपर्यंत नहराच्या दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बनवून शासनाकडे पाठविले आहे. ते मंजूर होण्यासाठी एक-दोन वर्षाचा कालावधी लागू शकतो. परंतु २०१६ मध्ये दीड ते दोन कोटी रुपयांची कामे हाती घेतली असून काही भागातून दुरुस्तीची कामे होणार आहेत.मात्र अधिकचा निधी नसल्याने शासनाने त्या-त्या भागातील ग्रामपंचायतीला पत्र दिल्यास रोजगार हमीच्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत काम केल्यास नागरिकांना काम मिळेल