शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतनासाठी एफडीसीएम कर्मचारी करणार अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST

चंद्रपूर : राज्यातील इतर महामंडळ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. असे असले ...

चंद्रपूर : राज्यातील इतर महामंडळ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. असे असले तरी आर्थिक फायद्यात असतानाही वनविकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी या वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे आता कर्मचारी टोकाची भूमिका घेणार असून त्याची सुरुवात १ मार्चपासून अन्नत्याग आंदोलनाने करणार आहेत. यासंदर्भात वनविभागाच्या प्रधान सचिवांना निवेदनही देण्यात आले आहे.

महाराष्ट्र वनविकास महामंडळात राज्यभरात दोन हजारावर अधिकारी, कर्मचारी आहेत. या माध्यमातून वनाचे जतन तसेच विविध वृक्ष लावून त्या माध्यमातून जमिनीचा विकास, वृक्षांची देखभाल, संरक्षण आणि विक्री करून नफा मिळविण्यासोबतच पर्यावरण संतुलनासाठी प्रयत्न आणि वन्यजीवाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. यासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन मिळत असतानाही राज्यभरातील दोन हजारावर कर्मचाऱ्यांना महामंडळाने अद्यापही सातवा वेतन आयोग सुरू केला नाही. विशेष म्हणजे, महामंडळ आर्थिक फायद्यात आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागाही भरत नसल्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडला आहे. इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग सुरू करण्यात आला आहे. मात्र वनविकास महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवरच अन्याय का, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी, कर्मचारी संघटनेने उपस्थित केला असून, आता संघटना १ मार्चपासून व्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक, विभागीय व्यवस्थापक यांच्या कार्यालयासमोर धरणे तसेच अन्नत्याग आंदोलन करणार आहे.

कोट

राज्य सरकारमधील इतर कर्मचाऱ्यांना तसेच वनविभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र एफडीसीएममधील कर्मचाऱ्यांना अद्यापही सातवा वेतन लागू करण्यात आला नाही. आजपर्यंत विभागाला निवेदन देऊन मागणी करण्यात आली. मात्र दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता १ मार्चपासून आंदोलनाचे हत्यार उपसले जाणार आहे.

-बी.बी. पाटील

कार्याध्यक्ष

महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी, कर्मचारी संघटना