शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

रेल्वेफाटकाखालून जीवघेणा प्रवास

By admin | Updated: June 16, 2017 19:36 IST

नांदुरा येथील प्रकार : नागरिकांचा स्वत:च्याच जीवाशी खेळ

सुहास वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: येथील रेल्वेफाटकाचे अंतर हे जमिनीपासून जास्त आहे. त्यामुळे येथून वाहने काढणे नागरिकांना सोपे जात आहे. परिणामी कुठलाही विचार न करता नागरिक दुचाकी काढून मोकळे होतात. हा प्रकार नागरिकांच्या स्वत:च्या जिवाशी खेळ करण्यासारखाच असल्याचे बोलल्या जात आहे. नांदुरा शहरातून मलकापूर-जळगाव जामोदकडे पोच मार्ग जातो. त्यामुळे या मार्गावर प्रवाश्यांची नेहमीच गर्दी असते. विशेष म्हणजे यात दुचाकी चालकांची संख्या ही जास्त आहे. पण येथील नागपूर लाईनवरील रेल्वेफाटक प्रवाश्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. उल्लेखनिय म्हणजे, रेल्वे येत आहे की नाही किंवा रेल्वे जवळ आली आहे याचा कुठलाही विचार न करता नागरिक वरूड येथे फाटकाखालून सरळ आपली दुचाकी काढून मोकळे होतात. या फाटकावर अंतर जास्त असल्याने अगदी थोडीशी दुचाकी झुकविली तरी ती बाहेर पडते. यामुळे रेल्वे फाटकाखालून वाहने काढण्याचा सपाटाच सुरू झाला आहे. रेल्वे फाटकावर सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या ठळक अक्षरात थांबा असे लिहिलेला फलक लावलेला आहे. असे असतानाही त्याचा कुठलाही विचार न करता नियमांना तिलांजली देण्याचे काम दुचाकीचालक करीत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण होत आहे.