शहरं
Join us  
Trending Stories
1
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
2
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
3
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
4
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
5
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
6
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
7
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
8
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
9
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
10
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
11
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
12
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
13
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
14
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
15
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
16
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
17
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
18
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
19
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
20
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?

कर्ज माफीबद्दल शेतकऱ्यांत संभ्रम

By admin | Updated: June 21, 2017 00:46 IST

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

कुणाला मिळणार लाभ? : अनेक शंकानी शेतकरी हैराणलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कर्जमाफीची सवलत फक्त पीक कर्जापुरतीच ठेवण्यात आली, तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाण्याची शक्यता आहे.चिमूर तालुक्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जिल्हा बँकेनेही तालुक्यात लाखो रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. परंतु, शासनाने घातलेल्या जाचक अटीमुळे सामान्य शेतकरी कर्जापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दहा हजार रुपये कर्ज तातडीने देण्याच्या सूचना जिल्हा बँकांना देण्यात आल्या असल्या तरीही तालुक्यात एकाही शेतकऱ्याला याचा लाभ मिळालेला नाही. चिमूर तालुक्यात धान, कापूस, सोयाबीन असे संमिश्र पिकाचे उत्पादन घेतल्या जाते. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी कपासीची व सोयाबीनची पेरणीही केली. परंतु, बी-बियाणे, खत औषधे आणि मजुरांना पैसे उपलब्ध झाले नाहीत तर शेतकऱ्यांना याचा फायदा काय, असा सवाल विचारला जात आहे.शासनाची कर्जमाफी आणि दहा हजाराची तातडीची कर्ज स्वरूपी मदत ही निकषात अडकली तर संपासारखे तीव्र आंदोलन करूनही हाती काय लागले, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. शासनाचे शेती निकष हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बाबतीत अडचणीचे ठरणारे असून त्यामुळे शेतकरी अजूनच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.दुसरीकडे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा शेतकऱ्यांनी स्वत:हून कर्जमाफी नाकारण्याची गरज आहे. परंतु, चिमूर तालुक्यात अद्याप, असा एकही शेतकरी पुढे आलेला नाही. तालुक्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, मोठे क्षेत्र असणारे शेतकरीही कमी नाहीत. ते प्रत्येक वर्षी लाखो रुपयांचा कापूस, सोयाबीनचे उत्पन्न मिळवितात. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला कर्जमाफीचा फायदा मिळणे आवश्यक असेल तर धनदांडग्या शेतकऱ्यांनी स्वत:हून पुढे येत शासनाची कर्जमाफी नाकारणे गरजेचे आहे. मात्र सध्या शेतकरी संभ्रमात आहेत. निकषांकडे लक्षशेतकऱ्यांच्या संपाचा धसका घेत शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे शेतकरी आनंदी झाला तर या कर्ज माफीसाठी वेळ लागला म्हणून खरीपाच्या पेरणीसाठी दहा हजार रूपये कर्जरूपी रक्कम देण्याची घोषणा शासनाने केली. त्यासाठी शासनाचे निकष, अटी काय आहेत, याची माहिती शेतकऱ्यांना अजुनही नाही. तर जिल्हा सहकारी बँकाही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देण्यास नकार देत असल्याचा प्रकार सुरू आहे. यासाठी काही शेतकऱ्यांनी अटी व शर्ती आणि निकष कशाला, असे मत व्यक्त करीत आहेत. तरी पण शेतकऱ्यांनी कर्जमाफी व दहा हजार रुपये मदतीसाठी निकषाकडे लक्ष ठेवून आहेत.