शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

राज्य शासनाच्या कृषी योजनांच्या तुलनेत जिल्हा परिषद कृषी विभागाकडील योजनांची संख्या कमी आहे. बऱ्याच महत्त्वपूर्ण योजना राज्य कृषी विभागाच्या ताब्यात गेल्याने जिल्हा परिषद कृषी विभागातील पदाधिकाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र, राज्य शासनाने जि. प. कृषी विभागाकडे नाविण्यापूर्ण योजनांचे हस्तांतरण केले नाही.

ठळक मुद्देबजेट अर्ध्यावरच : २५० कोटीमधून ५० टक्क्यांची कपात

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्यामुळे पैशाची जुळवाजुळवा करताना त्यांचे हाल होत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब व अल्पभूधारक शेतकºयांना तर पीक कर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँका दारावर उभ्याच करत नसल्याचे चित्र आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कृषी विभागाने यंदा एकही नाविण्यपूर्ण योजना राबविण्याचे धाडस दाखविले नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या निधी कपात धोरणामागे लपण्यातच कृषी विभाग धन्यता मानणार काय, असा प्रश्न समस्याग्रस्त शेतकरी विचारत आहेत.राज्य शासनाच्या कृषी योजनांच्या तुलनेत जिल्हा परिषद कृषी विभागाकडील योजनांची संख्या कमी आहे. बऱ्याच महत्त्वपूर्ण योजना राज्य कृषी विभागाच्या ताब्यात गेल्याने जिल्हा परिषद कृषी विभागातील पदाधिकाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र, राज्य शासनाने जि. प. कृषी विभागाकडे नाविण्यापूर्ण योजनांचे हस्तांतरण केले नाही. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांनी केवळ राज्य सरकारच्या कृषी विभागावर भिस्त न ठेवता स्वत:च्या उत्पन्नातून आणि सेस फंडातून नाविण्यपूर्ण योजनांसाठी निधी राखून ठेवला. या निधीतून विविध योजना राबविल्या जात आहे. विशेषत: अल्पभूधारक व अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना कसा लाभ होईल, याचे नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.त्या तुलनेत चंद्रपूर जिल्हा परिषदेचा कृषी विभाग पिछाडीवर आहे. त्यामुळे दरवर्षी खरीप व खरीप हंगामात रासायनिक खत व बियाणे पुरविणे या दोन योजनांमध्येच कृषी विभाग अडकल्याची नाराजी शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केली.व्यक्तिगत योजना गुंडाळाव्या लागणारसेस फंडातून कीड नियंत्रणासाठी ५० टक्के अनुदानावर किटकनाशक, ऑईल इंजिन, विद्युत पंप, पेट्रोडिझेल इंजिन, पीक संरक्षण अंतर्गत ७५ टक्के अनुदानावर ताडपत्री व सिंचन पाईप पुरविणे, शेडनेट, कुंपणासाठी तार व खांब सौर कंदील, तुषार सिंचनावर अनुदान यापलिकडे जावून शेतकऱ्यांना बळ देण्याची ही वेळ आहे. मात्र, निधीमध्ये कपात केल्यामुळे शेतकरीहितकारक व व्यक्तिगत लाभांच्या योजनांना याचा फटका बसणार आहे.आदिवासी उपयोजनेवर प्रश्नचिन्हअनुसूचित जमातीसाठी आदिवासी उपयोजना व मागासवर्गीय शेतकºयांना दारिद्रयरेषेवर आणण्यासाठी जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पीक संरक्षण, शेतीची अवजारे, बैलजोडी, बैलगाडी, इनवेल बोरींग, जुनी विहीर दुरूस्ती, पाईप लाईन, पंपसेट, तुषारसंच, ठिंबक संच, नवीन विहिरीसाठी अनुदान दिले जाते. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरही काही योजना आहेत. मात्र, यंदा निधी कपातीमुळे या योजनांचे काही खरे नाही.बियाणे, खत पुरवठ्यात आघाडीयंदाच्या खरीप हंगामासाठी १ लाख ३३ हजार ११० मेट्रीक टन रासायनिक खत मंजूर करून घेण्यास जि. प. कृषी विभागाने तत्परता दाखविली. ही जमेची बाजू असून जिल्ह्यात आतापर्यंत ६७ हजार ८१९ मेट्रीक टन खताचा पुरवठा झाला. सोयाबीन २९ हजार ६३६ कापूस २ हजार ३५३, भात ६ हजार ६१८, तूर १ हजार २२४ असे एकूण ३९ हजार ८३६ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रzpजिल्हा परिषद