शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

सामाजिक परिवर्तन करणारा किमयागार शिक्षक

By admin | Updated: September 5, 2016 00:57 IST

शिक्षक हा ज्याप्रमाणे शिक्षण प्रक्रियेतील कर्णधार असतो; त्याचप्रमाणे तो सामाजिक परिवर्तन करणारा किमयागारही असतो.

भूृमिका महत्त्वाची : सरकारने विचार करण्याची गरजमंगल जीवने बल्लारपूरशिक्षक हा ज्याप्रमाणे शिक्षण प्रक्रियेतील कर्णधार असतो; त्याचप्रमाणे तो सामाजिक परिवर्तन करणारा किमयागारही असतो. म्हणून भारताला महासत्ता बनायचे असेल तर, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार आहे. गुरुपरंपरेचा थोर वारसा प्राचीन काळापासूनच देशाला लाभला आहे. समाजसुधारकांनी शिक्षणाचे महत्त्व समाजातील सर्वच स्तरापर्यंत पोहोचविण्याचा अथक प्रयत्न केला. त्यामध्ये महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य या पार्श्वभूमीवर अद्वितीय स्वरुपाचे ठरले. आपल्या प्रकांड बुद्धिमत्तेचा ठसा परदेशातील शिक्षण संस्थावर उमटवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक विद्वत्तेमुळे आधूनिक भारताचे घटनाकार बनले. म्हणून शिक्षण व शिक्षकाचे महत्त्व वाढत चालले आहे. शिक्षक दिन हा तसा शिक्षकांचे कौतुक करण्याचा मानसन्मानाचा दिवस म्हणूनच अलीकडच्या काळात ओळखला जातो. कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांपासून तर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणांनाही प्रभावीत करण्याचे कौशल्य शिक्षकांमध्ये असते. सर्वच वयोगटातील मुलांना सुयोग्य आकार देण्यासाठी तो सातत्याने धडपडतो. बरेच विद्यार्थी एकवेळ आपल्या पालकांचे ऐकत नाहीत; पण आपल्या शिक्षकांचे ऐकतात. ऐवढा विश्वास शिक्षकी पेशात असतो. एवढे असूनही शिक्षकांच्या प्रश्नावर सातत्याने चालढकल करण्याची मानसिकता असणारे प्रशासन या शिक्षकदिनी शिक्षकांना आवडेल, अशी एखादी घोषणा करण्याची संधी देखील साधत असते. मात्र शिक्षक दिवस संपला की, शिक्षक स्नेही माहोल वर्षभर दिसून येत नाही. कारण टीचर्स एक्सलन्सी सेंटरच्या माहितीनुसार कार्यरत शिक्षकांपैकी ७३.३ टक्के शिक्षक दबावाखाली काम करीत असल्याचा विषय राष्ट्रात चिंतेचा बनला आहे. जर असे असेल तर त्यांच्याकडून सर्वोकृष्ठ कामगिरीची अपेक्षा ठेवायची का? असा प्रश्न पडतो आहे. दबावरहित वातावरणातून शिक्षक मुक्त झाला तर विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना अधिक विकसीत करण्याची संधी यानिमीत्याने शिक्षकांना मिळेल व शिक्षक दिनी असणारे शिक्षकस्नेही वातावरण सदैव राहण्यासाठी विचार करणे आवश्यक आहे.