शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक परिवर्तन करणारा किमयागार शिक्षक

By admin | Updated: September 5, 2016 00:57 IST

शिक्षक हा ज्याप्रमाणे शिक्षण प्रक्रियेतील कर्णधार असतो; त्याचप्रमाणे तो सामाजिक परिवर्तन करणारा किमयागारही असतो.

भूृमिका महत्त्वाची : सरकारने विचार करण्याची गरजमंगल जीवने बल्लारपूरशिक्षक हा ज्याप्रमाणे शिक्षण प्रक्रियेतील कर्णधार असतो; त्याचप्रमाणे तो सामाजिक परिवर्तन करणारा किमयागारही असतो. म्हणून भारताला महासत्ता बनायचे असेल तर, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार आहे. गुरुपरंपरेचा थोर वारसा प्राचीन काळापासूनच देशाला लाभला आहे. समाजसुधारकांनी शिक्षणाचे महत्त्व समाजातील सर्वच स्तरापर्यंत पोहोचविण्याचा अथक प्रयत्न केला. त्यामध्ये महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य या पार्श्वभूमीवर अद्वितीय स्वरुपाचे ठरले. आपल्या प्रकांड बुद्धिमत्तेचा ठसा परदेशातील शिक्षण संस्थावर उमटवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक विद्वत्तेमुळे आधूनिक भारताचे घटनाकार बनले. म्हणून शिक्षण व शिक्षकाचे महत्त्व वाढत चालले आहे. शिक्षक दिन हा तसा शिक्षकांचे कौतुक करण्याचा मानसन्मानाचा दिवस म्हणूनच अलीकडच्या काळात ओळखला जातो. कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांपासून तर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणांनाही प्रभावीत करण्याचे कौशल्य शिक्षकांमध्ये असते. सर्वच वयोगटातील मुलांना सुयोग्य आकार देण्यासाठी तो सातत्याने धडपडतो. बरेच विद्यार्थी एकवेळ आपल्या पालकांचे ऐकत नाहीत; पण आपल्या शिक्षकांचे ऐकतात. ऐवढा विश्वास शिक्षकी पेशात असतो. एवढे असूनही शिक्षकांच्या प्रश्नावर सातत्याने चालढकल करण्याची मानसिकता असणारे प्रशासन या शिक्षकदिनी शिक्षकांना आवडेल, अशी एखादी घोषणा करण्याची संधी देखील साधत असते. मात्र शिक्षक दिवस संपला की, शिक्षक स्नेही माहोल वर्षभर दिसून येत नाही. कारण टीचर्स एक्सलन्सी सेंटरच्या माहितीनुसार कार्यरत शिक्षकांपैकी ७३.३ टक्के शिक्षक दबावाखाली काम करीत असल्याचा विषय राष्ट्रात चिंतेचा बनला आहे. जर असे असेल तर त्यांच्याकडून सर्वोकृष्ठ कामगिरीची अपेक्षा ठेवायची का? असा प्रश्न पडतो आहे. दबावरहित वातावरणातून शिक्षक मुक्त झाला तर विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना अधिक विकसीत करण्याची संधी यानिमीत्याने शिक्षकांना मिळेल व शिक्षक दिनी असणारे शिक्षकस्नेही वातावरण सदैव राहण्यासाठी विचार करणे आवश्यक आहे.