शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

पर्यावरणस्रेही विकासाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:10 IST

महानिर्मितीच्या वतीने राज्यात मोठ्या प्रमाणात वीज उत्पादन केले जात आहे. मात्र, पर्यावरणाचीही काळजी घेतली असून पर्यावरणस्रेही विकास आज काळाची गरज आहे, असे मत महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देबिपीन श्रीमाळी : पर्यावरणदिनी सीटीपीएसतर्फे जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानिर्मितीच्या वतीने राज्यात मोठ्या प्रमाणात वीज उत्पादन केले जात आहे. मात्र, पर्यावरणाचीही काळजी घेतली असून पर्यावरणस्रेही विकास आज काळाची गरज आहे, असे मत महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी व्यक्त केले. महाऔष्णिक विद्युत केंद्राने आयोजित जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने पार पडलेल्या दोन दिवसीय जागृती कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी मुख्य अभियंता जयंत बोबडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. व्यवस्थापकीय संचालक श्रीमाळी यांनी महानिर्मितीच्या पर्यावरणस्नेही विकासासोबतच पर्यावरण धोरणांची मांडणी केली. पर्यावरणाच्या संरक्षण व सुधारणेसाठी तीन कलमीय कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने विद्युत केंद्रातून वापरलेल्या पाण्याचे शुन्य विसर्ग, एमओईएफ व सीसीप्रती युनिट पाणी वापरण्याचा मानक साध्य करणे, एमपीसीबी, एमओईएफ, सीसी मानकानुसार एसपीएम पातळी मर्यादित करण्यासाठी सर्व ईएसपी फिल्ड ९५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त ठेवणे गरजेचे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. चंद्रकांत थोटवे यांनी महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञानात्मक सुधारण करून स्वच्छ व सुंदर पर्यावरण कायम ठेवण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमाची माहिती दिली. वीज निर्मितीसाठी प्रती युनिट कोळसा वापर कमी करणे, सयंत्र उर्जा वापर कमी करणे, कोळसा वाघिणी रेल्वे विलंबशुल्क शून्य करणे, कार्यस्थळ स्वच्छता, प्रसन्नता, नवकल्पना आदींचा या कार्यक्रमात समावेश आहे. मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत केंद्राच्या पर्यावरण संबंधी सद्यस्थितीचे सादरीकरण आणि पाठपुरावा दर महिन्याला केला जातो. महानिर्मितीचे वरिष्ठ व्यवस्थापन हे पर्यावरण दूताची भूमिका पार पाडत आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे खुशाल अवचरमल, सुरेंद्र कारणकर, बाळकृष्ण सांगळे जलबिरादरीचे संजय वैद्य, डॉ. टी. डी. कोसे उपस्थित होते. संचालन तेजस्विता तवाडे, कीर्ती चन्ने व वैशाली चौधरी यांनी केले. विजय येऊल यांनी आभार मानले.