शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

भेजगाव परिसरात धानपिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: October 7, 2015 02:12 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत, कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

शेतकरी त्रस्त: कृषी विभाग उदासीन, उत्पादनात घट येण्याची शक्यताभेजगाव: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत, कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यावर्षी तर पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पाठ फिरविली. कमी अधिक झालेल्या पावसाने रोवणी उशिरा झाली. १५ दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या उष्ण- दमट वातावरणाने भेजगाव परिसरातील धानपिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाल्याने शेतकरी पीक वाचविण्याकरिता केविलवाणी धडपड करीत आहेत.गतवर्षी झालेली उत्पन्नातील घट आणि धानाला अत्यल्प भाव यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. मात्र यातून सावरत शेती आज ना उद्या पिकेल या आशेवर शेतकऱ्यांनी कर्जासाठी बँकेच्या चकरा मारल्या. पैशाची जुळवाजुळव केली. बि-बियाणे खरेदी केले. मजुरांना मागेल ती मजुरी देऊन रोवणी आटोपली, मात्र धानपिक ऐन गर्भात असतानाच धानपिकांवर तुळतुळा, करपा, पांढरा रोग, लष्करी अळी आदी रोगांनी आक्रमण केल्याने बळीराजावर किटकनाशक फवारणीचा आर्थिक भुर्दंड बसला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीवर औषध फवारणीचा डब्बा अन् डोळ्यात अश्रुच्या धारा अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.भेजगाव परिसरातील शेकडो हेक्टर शेती आसोलामेंढा तलावाच्या पाण्याच्या भरोशावर अवलंबून आहे. यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने या तलावाची स्थिती चिंताजनक आहे. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावात नाममात्र टाकून दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जलपूजनाच्या केलेल्या स्पर्धेत शेतकरी सुखावला असला तरी या दोन्ही नेत्यांनी पुजलेले पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर वेळेवर पोहचेल काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या परिसरात पाण्याची दुसरी सोय नसल्याने राब-राब राबुनही शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागणार आहे. आर्थिक गुंतवणूक करुनही शेतकऱ्यांची शेती पिकेल अशी शाश्वती राहिली नसल्याने शेतकरी हतबल झालेला दिसत आहे. शासन शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवत असला तरी शेतकरी संकटात सापडला असताना प्रशानाने औषध उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाला शेतकऱ्यांशी काही देणे- घेणे नसून शासनाचे उदासिन धोरणच शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. (वार्ताहर)