शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
2
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
3
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
4
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
5
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
6
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
7
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
8
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
9
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
10
साखरपुडा झाल्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, म्हणाली "खूप वर्षांपासून"
11
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी
12
"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला?
13
Sangli Murder: तिसंगी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
14
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
15
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
16
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
17
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
18
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
19
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
20
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 

भेजगाव परिसरात धानपिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: October 7, 2015 02:12 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत, कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

शेतकरी त्रस्त: कृषी विभाग उदासीन, उत्पादनात घट येण्याची शक्यताभेजगाव: निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत, कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यावर्षी तर पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने पाठ फिरविली. कमी अधिक झालेल्या पावसाने रोवणी उशिरा झाली. १५ दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या उष्ण- दमट वातावरणाने भेजगाव परिसरातील धानपिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाल्याने शेतकरी पीक वाचविण्याकरिता केविलवाणी धडपड करीत आहेत.गतवर्षी झालेली उत्पन्नातील घट आणि धानाला अत्यल्प भाव यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. मात्र यातून सावरत शेती आज ना उद्या पिकेल या आशेवर शेतकऱ्यांनी कर्जासाठी बँकेच्या चकरा मारल्या. पैशाची जुळवाजुळव केली. बि-बियाणे खरेदी केले. मजुरांना मागेल ती मजुरी देऊन रोवणी आटोपली, मात्र धानपिक ऐन गर्भात असतानाच धानपिकांवर तुळतुळा, करपा, पांढरा रोग, लष्करी अळी आदी रोगांनी आक्रमण केल्याने बळीराजावर किटकनाशक फवारणीचा आर्थिक भुर्दंड बसला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीवर औषध फवारणीचा डब्बा अन् डोळ्यात अश्रुच्या धारा अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.भेजगाव परिसरातील शेकडो हेक्टर शेती आसोलामेंढा तलावाच्या पाण्याच्या भरोशावर अवलंबून आहे. यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने या तलावाची स्थिती चिंताजनक आहे. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आसोलामेंढा तलावात नाममात्र टाकून दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जलपूजनाच्या केलेल्या स्पर्धेत शेतकरी सुखावला असला तरी या दोन्ही नेत्यांनी पुजलेले पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर वेळेवर पोहचेल काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या परिसरात पाण्याची दुसरी सोय नसल्याने राब-राब राबुनही शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागणार आहे. आर्थिक गुंतवणूक करुनही शेतकऱ्यांची शेती पिकेल अशी शाश्वती राहिली नसल्याने शेतकरी हतबल झालेला दिसत आहे. शासन शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवत असला तरी शेतकरी संकटात सापडला असताना प्रशानाने औषध उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाला शेतकऱ्यांशी काही देणे- घेणे नसून शासनाचे उदासिन धोरणच शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. (वार्ताहर)