शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या दडीमुळे धान पीक संकटात

By admin | Updated: August 30, 2016 00:39 IST

तालुक्यात पावसाचे उशिरा आगमन झाले. सरासरी पावसाच्या ५५ टक्के पाऊस तालुक्यात पडला.

बळीराजा चिंतातूर : तीन आठवड्यापासून पाऊस गायबरवी रणदिवे ब्रह्मपुरीतालुक्यात पावसाचे उशिरा आगमन झाले. सरासरी पावसाच्या ५५ टक्के पाऊस तालुक्यात पडला. उशिरा रोवणी झाल्याने धान पीक सध्या गर्भात आहे. मात्र आता पावसाने तब्बल तीन आठवड्यापासून दडी मारल्याने धान पीक संकटात सापडले आहे. त्यामुळे आता एका दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात बहुतांश शेती ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सुजलाम सुफलाम करण्यासाठी १९८१ ला गोसीखुर्द धरणाचे भूमिपूजन करुन शेतकऱ्यांच्या आनंदात थोडीसी भर घातली होती. पण ३५ वर्षाचा काळ लोटूनही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचले नाही. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्याच्या डोळ्यात आसवं दाटून आली आहे. या पाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग पत्कारावा लागला होता. रणमोचन, खरकाडा, पिंपळगाव, रुई, निलज, पाचगाव व किन्ही या भागातील शेतकरी एका पाण्यासाठी मागील दोन वर्षापासून अनेकांचे दार ठोठावत आहेत. पण कुणीही दार उघडून त्यांची समस्या समजून घेतली नाही. प्रत्येकांनी हात वर करुन एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. दुसरीकडे एका पाण्यासाठी उभ्या शेतातील पीक मरताना दिसत आहे. यामुळे हतबल होऊन संतापलेल्या शेतकऱ्यांनी नागपूर- गडचिरोली राज्य मार्ग रोखून तीन तास वाहतूक अडवून धरली व आपली पाण्याची मागणी रेटून धरली होती. रस्ता रोको सुरु असताना आभाळातून पाऊस सुरु झाला. पण कुणीही मागे हटले नाही. पावसात ओले होऊनही मागणीसाठी रस्ता रोको सुरु होता. या प्रकारावरुन शेतकऱ्यांच्या मनातील पाण्याची निकड व प्रशासकीय यंत्रणेवरील उद्रेक लक्षात येतो आहे. केवळ ४५ मीटरच्या मागे पाणी पोहचते व पुढे पाणी पोहचत नाही, हे विभागाचे दुर्दैवच असल्याचे बोलले जात आहे. केवळ ही बाब या भागापुरतीच मर्यादित नाही तर अन्य भागातसुद्धा गोसीखुर्दच्या पाण्याविषयी हीच स्थिती आहे. हा जनक्षोभ आज किन्ही येथे दिसला उद्या कुठे तरी तालुक्याच्या अन्य भागात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून संबंधित विभागाने हा मुद्दा समजून रखडलेली कामे तातडीने करावी. जेणेकरुन डोळ्यासमोरचे पीक मरताना शेतकऱ्यांना बघावे लागणार नाही. तालुक्यात उशिरा रोवणी झाली. त्यातही २० दिवसांपासून पाण्याने दडी मारली आहे. दरम्यान दररोज वातावरण ढगाळलेले होते. मात्र पाऊस पडत नाही. त्यामुळे पुन्हा शेतकरी चिंतेत आहे. या प्रकारामुळे पिकांवर लष्करी अळी, तुळतुळा आदी रोगाने धान पिके ग्रासलेली होती. एकीकडे पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे धानावर रोग अशा द्विधा मनस्थितीमध्ये या तालुक्यातील शेतकरीवर्ग सापडलेला आहे. अशा वेळी शासनाने मदतीचा हात म्हणून किटकनाशके औषधी विनामूल्य देऊन शेतकरी अश्रू पुसण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. परंतु याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संपूर्ण शेतकरीवर्ग संतापलेला आहे. सध्या उन्हाळ्यासारखे ऊन तापायला लागले आहे. त्यामुळे तालुक्याचे तापमान वाढले आहे. वाढत्या तापमानामुळे शेतातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाच्या सोयी आहेत, अशा शेतकऱ्यांवर विजेचे संकट उभे ठाकले आहे. २४ तासातून बारा ते सोळा तास भारनियमनामुळे ग्रामीण भागातील वीज गायब राहते. शेतीला पाणी केव्हा द्यायचे आणि जेवायचे, झोपायचे केव्हा, हेच शेतकऱ्यांना कळेनासे झाले आहे. एकूणच तिहेरी संकट सध्या या भागातील शेतकऱ्यासमोर उभे आहे. या महिन्यात भारनियमन केले नाही तर किमान जलसिंचन चांगले होईल व पिकाला पाणी मिळेल, अशी आशा बाळगणारा बळीराजा आशेवरच आहे. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन भारनियमन बंद करावे अशीही मागणी केली जात आहे.गोसीखुर्दचे पाणी न मिळणे, वेळेवर पाऊस न येणे, भारनियमन मोठ्या प्रमाणात होणे व रोगांचा पादुर्भाव पसरणे आदी कारणांनी शेतकरीवर्गात चिंता पसरली आहे. याकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.