शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भाव मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय डबघाईस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:15 IST

तालुक्यातील नांदाफाटा, बिबी, गडचांदूर, बाखर्डी, वनसडी, लखमापूर, कोरपना व अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध उत्पादन सुरू केले आहे. मात्र दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली असून दुग्ध व्यवसाय डबघाईला आला आहे.

ठळक मुद्देपायाभूत सुविधांचा अभाव : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

आशिष देरकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील नांदाफाटा, बिबी, गडचांदूर, बाखर्डी, वनसडी, लखमापूर, कोरपना व अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध उत्पादन सुरू केले आहे. मात्र दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली असून दुग्ध व्यवसाय डबघाईला आला आहे.मदर डेअरीच्या माध्यमातून नांदाफाटा, गडचांदूर व कोरपना येथे दूध संकलन केंद्र उभारण्यात आले. संकलन केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. किरकोळ पद्धतीने दूध विकण्यापेक्षा एकाच ठिकाणी संकलन केंद्रावर विक्री होत असल्यामुळे शेतकºयांचा त्रास कमी झाला. मात्र दूध संकलन केंद्रावर कवडीमोल भावात दुधाची खरेदी करीत असल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बºयाच शेतकºयांनी लाखो रुपये खर्च करून हरियाणा, राजस्थान, गुजरात व अन्य राज्यांमधून गाई व म्हशींची खरेदी केली.दुधाला भाव नसल्याने हा व्यवसाय डबघाईला आला आहे. विशेष म्हणजे, शेतामध्ये जनावरांसाठी चारा लावणे, दूध वाढण्यासाठी पोषक ठरणारे खाद्य खरेदी करणे, मजुरांना लागणारा खर्च, जनावरांसाठी शेड, पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, दूध काढणी यंत्र खरेदीसाठी गुंतवणूक करावी लागली. त्यामुळे शेतकरी हा व्यवसाय बंद करू शकत नाही. मिळेल त्या किमतीमध्ये दूध विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.शासनाने घ्यावी दखलशेतकऱ्यांनी पर्यायी व्यवसाय करावा किंवा जोडधंदा करावा, यासाठी शासनाकडून प्रोत्साहन देण्याची घोषणा केली जाते. पण ज्या शेतकऱ्यांनी धोका पत्करून जोड व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला त्यांना पायाभूत सुविधा पुरवित नाही. शेतकऱ्यांना पाठबळ मिळाल्यास शेतकरी दुग्ध व्यवसाय उत्तम पद्धतीने करू शकतात. यातून त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल. शासनाने तालुक्यातील दूध उत्पादकांच्या समस्या निकाली काढून दुधाला अधिकाधिक भाव देण्याची मागणी केली जात आहे.वैयक्तिक विक्री जास्त किमतीततालुक्यातील बरेच शेतकरी मदर डेअरीऐवजी वैयक्तिकरित्या घरोघरी फिरून दुधाची विक्री करतात. त्या ठिकाणी शेतकºयांना म्हशीच्या दुधाला ६० ते ७० रुपये प्रति लिटर तर गाईच्या दुधाला ४० ते ५० रुपयापर्यंत प्रति लिटर दर मिळतो. तेच दूध मदर डेअरीमध्ये विक्रीकरिता नेल्यास कमीत कमी किंमत २३ रुपये मिळतात. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडते.खाद्याच्या किंमती वधारल्यादूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांच्या खाद्यावर विशेष लक्ष ठेवावे लागते. मात्र हे खाद्य महाग आहे. यामध्ये जनावरांना लागणारी ढेप २ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल, मका चुरी १६०० रुपये व तुरीची चुरी १७०० रुपये क्विंटल दराने विकत घ्यावे लागते.