शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

पहाडावरील शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले

By admin | Updated: December 20, 2015 00:42 IST

राज्याच्या सीमेवर असलेल्या अतिदुर्गम जिवती तालुक्याच्या समस्यांकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे.

सिंचनाची सुविधा व जमिनीचे मालकी हक्क मिळेना : शेतकऱ्यांचा लढा मात्र, शासन व प्रशासन लक्ष देईना शंकर चव्हाण/ संघरक्षित तावाडे  जिवती राज्याच्या सीमेवर असलेल्या अतिदुर्गम जिवती तालुक्याच्या समस्यांकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. पहाडावरील नागरिक गेल्या कित्येक वर्षापासून शेती पट्ट्यासाठी शासनाशी लढा देत आहेत. मात्र लोकप्रतिनिधी येतात, चर्चा करतात आणि आश्वासन देऊन मोकळे होतात. शासनस्तरावरून कुठलीही कार्यवाही होत नसल्याने पहाडावरील कुटुंबांना उपेक्षीत जीवन जगावे लागत आहे. शासनाच्या अशा दुर्लक्षतेमुळे त्यांचे सिंचन व मालकी हक्काचे स्वप्नं पार भंगले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका हा महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्याच्या सीमेवरचा भाग असून या तालुक्यात वसलेले बहुतांशी कुटुंब हे मराठवाड्यातून स्थलांतरीत झालेले आहेत. पण पिढ्यानंपिढ्या राहत असलेल्या या नागरिकांच्या नशिबी उपेक्षीतच जीवन आले आहे. विशेषकरुन मराठवाड्यातून स्थलांतरीत होऊन पहाडावर शेती करणाऱ्या नारिकांच्या अनेक पिढ्या निघून गेल्यात. मात्र अजूनही त्यांना मालकी हक्क व सिंचनाच्या सोई-सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. येथील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून शेती पट्ट्यासाठी शासनाशी लढा देत आहेत. पण याकडे शासनाकडे दुर्लक्षच झाले. तलाव, मातीनाला, बांध, शेततळे, सिमेंट बंधारे यासारख्या सिंचनाच्या सोयी पहाडावरील शेतीसाठी आवश्यक आहेत. पण कोरडवाहू असलेल्या जिवती तालुक्यात सिंचनाच्या सोयी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतीत उत्पन्न पिकत नाही. १९५५-६० मध्ये रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या येथील नागरिकांचे आजही रोजगारासाठी भटकंती होताना दिसते. तालुक्यातील अनेक कुटुंब उस तोडणीसाठी व कापूस वेचणीसाठी स्थलांतरीत होत आहेत. एवढेच नाही तर शहरात जाऊन ठेकेदाराच्या आश्रयाखाली काम करून जगत आहेत. शासनाने वनहक्क समितीमार्फत शेतीला मालकी हक्क देण्याचे काम सुरू केले असले तरी पहाडावरील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना तीन पिढ्याचा पुरावा देण्याची जाचक अट लावल्याने पिढ्यानपिढी शेती करुनही मालकी हक्कापासून वंचीत राहावे लागत आहे. येथील नागरिकांनी तीन पिढ्याची अट रद्द करावी याकरिता अनेकदा निवेदने दिले, तहसील कार्यालयावर मोर्चे काढले. पण आश्वासणाव्यतिरिक्त काहीच मिळले नाही.मंत्री आलेत, आश्वासने देऊन गेलेतपहाडावर यापूर्वी अनेक मंत्री येऊन गेलेत. पण त्यांच्याकडून पोकळ आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. जिवती तालुक्यात जमिन मालकी हक्क आणि सिंचनाची सोय हा प्रश्न गंभीर आहे. मात्र येथे येऊन गेलेले डझनमंत्री शेतकऱ्यांच्या आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसण्यापलिकडे काहीच केले नाही. शेतीचे मालकी हक्क व सिंचनाची सोय या समस्या लक्षात आहेत. त्यासाठी शासनदरबारी आपला पाठपुरावा सुरू आहे. तालुक्यात जवळपास ३८ हजार हेक्टर जमीन वापरात असून यासाठी मालकी हक्क कायमस्वरूपी मिळवून देण्यास आपण प्रयत्नरत आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न असून वनहक्क पट्ट्याबाबात राज्य सरकार व केंद्रस् ारकारशी चर्चा सुरु आहे.- संजय धोटे, आमदार राजुरा शेतकरी म्हणतात...तालुक्यातील शेती ही कोरडवाहू असली तरी त्यात चांगले उत्पन्न होऊ शकते. मात्र सिंचनाची सोय होणे आवश्यक आहे. या सुविधाअभावी शेतीत पाहिजे त्याप्रमाणात पिकाचे उत्पादन होत नाही.- चंद्रमणी नरवाडे, परमडोलीजेव्हापासून मराठवाड्यातून स्थलांतर होऊन पहाडावर वास्तव्याला आलोत तेव्हापासून आमचे वडील येथे शेती करत आहेत. पण आम्हाला अजूनही शेतीचा मालकी हक्क मिळालेले नाही. शेतीच्या पट्टा मिळावा यासाठी अनेक वर्षापासून झगडत आहोत. शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने मालकी हक्क आणि सिंचन सुविधाविना शेती करत आहोत.- प्रकाश राठोड, पाटागुडातालुक्यात जमिनीचे पट्टे नसणे, सिंचनाचा अभाव ही शेतकऱ्यांसाठी गहण समस्या आहे. एखाद्या वेळेस दुष्काळाने पीक होत नाही. त्यावेळी शासनाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागते. पट्टे नसल्याने कर्ज सुद्धा मिळत नाही. - अमर राठोड, सामाजिक कार्यकर्ता, जिवती