शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

चारा, पाण्याअभावी दूध उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:36 IST

समाधानकारक पाऊस न पडल्याने पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली. परिणामी, दुधाचे उत्पादन घटले असून शासकीय दुग्ध शाळेत केवळ पाच हजार लिटर दुधाचे संकलन करून तेवढेच वितरण करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांकडून मागणी असूनही पुरेसे दूध मिळत नसल्याने आधीच हतबल झालेल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देपशुधनपालक शेतकरी संकटात : दुग्धशाळेत दररोज केवळ पाच हजार लिटर दूध संकलन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : समाधानकारक पाऊस न पडल्याने पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली. परिणामी, दुधाचे उत्पादन घटले असून शासकीय दुग्ध शाळेत केवळ पाच हजार लिटर दुधाचे संकलन करून तेवढेच वितरण करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांकडून मागणी असूनही पुरेसे दूध मिळत नसल्याने आधीच हतबल झालेल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.विदर्भातून सर्वाधिक कमी दुध उत्पादन करणारा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. सिंचनाचे क्षेत्र समाधानकारक नसल्याने हजारो शेतकरी केवळ भातशेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पारंपरिक भातशेतीमधून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. पण, नाईलाजास्तव शेतकºयांना दिवस ढकलण्याशिवाय दूसरा पर्यायच नाही. शेतीला पूरक व्यवसाय करण्याच्या केवळ घोषणा झाल्या. मात्र, लोकप्रतिनिधींनी यादृष्टीने परिणामकारक प्रयत्न केले नाही. त्यामुळे हजारो शेतकरी पारंपरिक शेतीच्या दुष्टचक्रात अडकले आहेत. लागवडीचा खर्चही मिळत नाही. सिंचनाची व्याप्ती वाढविण्यासाठी उपलब्ध असणारे जलस्त्रोत व त्यावर आधारीत कृषीपूरक दुग्ध उत्पादनाच्या योजना जिल्ह्यात आल्या असत्या तर शेतकºयांची दैनावस्था संपली असती. पण, सरकारच्या उदासिन धोरणामुळे चंद्रपूर जिल्हा दूध उत्पादनात मागे पडला आहे.चार जिल्ह्यांतून दुधाची आयातशेतीसोबत दुधाळी जनावरांचे पालन करून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. मात्र, जिल्ह्यात मोठी योजना न आल्याने मागणीच्या तुलनेत पुरेसे दुग्ध उत्पादन होत नाही. भंडारा, गोंदिया, वर्धा व नागपूर जिल्ह्यातून दूधाची आयात करून जिल्ह्याची गरज पूर्ण करावी लागत आहे.आश्वासने कागदावरचशासकीय दुग्धशाळेत अद्ययावत संयंत्र सोयीसुविधा आहेत. पण, दुग्धोत्पादन क्षमतेपेक्षा कमी आहे. ते पुन्हा वाढू शकते. उपलब्ध संसाधनांचा वापर करून दुग्ध प्रक्रीया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याचे आश्वासन राज्याचे दूग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिले होते. परंतु तेही कागदावरच राहिले आहे.संस्थात्मक केंद्रांची उपेक्षाचंद्रपुरातील दूध डेअरीमध्ये नागभीड व उमरेड येथील शित केंद्रातून दूध आणले जाते. सद्यस्थितीत तीन संकलन केंद्रे बंद आहेत. खासगी दूध कंपन्यांपेक्षा जनतेचा शासकीय दूध खरेदीवर विश्वास आहे. केंद्रातील दुधाची गुणवत्ता उत्तम असली तरी उत्पादन व संकलनासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही. संबंधित यंत्रणा कार्य करते. पण, आर्थिक बळ नाही. संस्थांत्मक केंद्रांची उच्च पातळीवरूनच उपेक्षा केली जात जात आहे. याकरिता संकलन व खरेदी थेट शितकरण संयंत्रातून सोसायटी, जिल्हा संस्था अथवा वैयक्तिक दूध उत्पादकांकडून घेण्यासाठी परवानगी देण्याचा विचारही गुंडाळून ठेवण्यात आला. सरकारकडून दूग्ध उत्पादनासाठी विशेष प्रयत्न होत नसल्याची नाराजी शेतकºयांनी व्यक्त केली आहे.