शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

चारा, पाण्याअभावी दूध उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:36 IST

समाधानकारक पाऊस न पडल्याने पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली. परिणामी, दुधाचे उत्पादन घटले असून शासकीय दुग्ध शाळेत केवळ पाच हजार लिटर दुधाचे संकलन करून तेवढेच वितरण करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांकडून मागणी असूनही पुरेसे दूध मिळत नसल्याने आधीच हतबल झालेल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देपशुधनपालक शेतकरी संकटात : दुग्धशाळेत दररोज केवळ पाच हजार लिटर दूध संकलन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : समाधानकारक पाऊस न पडल्याने पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली. परिणामी, दुधाचे उत्पादन घटले असून शासकीय दुग्ध शाळेत केवळ पाच हजार लिटर दुधाचे संकलन करून तेवढेच वितरण करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांकडून मागणी असूनही पुरेसे दूध मिळत नसल्याने आधीच हतबल झालेल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.विदर्भातून सर्वाधिक कमी दुध उत्पादन करणारा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. सिंचनाचे क्षेत्र समाधानकारक नसल्याने हजारो शेतकरी केवळ भातशेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पारंपरिक भातशेतीमधून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. पण, नाईलाजास्तव शेतकºयांना दिवस ढकलण्याशिवाय दूसरा पर्यायच नाही. शेतीला पूरक व्यवसाय करण्याच्या केवळ घोषणा झाल्या. मात्र, लोकप्रतिनिधींनी यादृष्टीने परिणामकारक प्रयत्न केले नाही. त्यामुळे हजारो शेतकरी पारंपरिक शेतीच्या दुष्टचक्रात अडकले आहेत. लागवडीचा खर्चही मिळत नाही. सिंचनाची व्याप्ती वाढविण्यासाठी उपलब्ध असणारे जलस्त्रोत व त्यावर आधारीत कृषीपूरक दुग्ध उत्पादनाच्या योजना जिल्ह्यात आल्या असत्या तर शेतकºयांची दैनावस्था संपली असती. पण, सरकारच्या उदासिन धोरणामुळे चंद्रपूर जिल्हा दूध उत्पादनात मागे पडला आहे.चार जिल्ह्यांतून दुधाची आयातशेतीसोबत दुधाळी जनावरांचे पालन करून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. मात्र, जिल्ह्यात मोठी योजना न आल्याने मागणीच्या तुलनेत पुरेसे दुग्ध उत्पादन होत नाही. भंडारा, गोंदिया, वर्धा व नागपूर जिल्ह्यातून दूधाची आयात करून जिल्ह्याची गरज पूर्ण करावी लागत आहे.आश्वासने कागदावरचशासकीय दुग्धशाळेत अद्ययावत संयंत्र सोयीसुविधा आहेत. पण, दुग्धोत्पादन क्षमतेपेक्षा कमी आहे. ते पुन्हा वाढू शकते. उपलब्ध संसाधनांचा वापर करून दुग्ध प्रक्रीया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याचे आश्वासन राज्याचे दूग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिले होते. परंतु तेही कागदावरच राहिले आहे.संस्थात्मक केंद्रांची उपेक्षाचंद्रपुरातील दूध डेअरीमध्ये नागभीड व उमरेड येथील शित केंद्रातून दूध आणले जाते. सद्यस्थितीत तीन संकलन केंद्रे बंद आहेत. खासगी दूध कंपन्यांपेक्षा जनतेचा शासकीय दूध खरेदीवर विश्वास आहे. केंद्रातील दुधाची गुणवत्ता उत्तम असली तरी उत्पादन व संकलनासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही. संबंधित यंत्रणा कार्य करते. पण, आर्थिक बळ नाही. संस्थांत्मक केंद्रांची उच्च पातळीवरूनच उपेक्षा केली जात जात आहे. याकरिता संकलन व खरेदी थेट शितकरण संयंत्रातून सोसायटी, जिल्हा संस्था अथवा वैयक्तिक दूध उत्पादकांकडून घेण्यासाठी परवानगी देण्याचा विचारही गुंडाळून ठेवण्यात आला. सरकारकडून दूग्ध उत्पादनासाठी विशेष प्रयत्न होत नसल्याची नाराजी शेतकºयांनी व्यक्त केली आहे.