शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

चारा, पाण्याअभावी दूध उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:36 IST

समाधानकारक पाऊस न पडल्याने पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली. परिणामी, दुधाचे उत्पादन घटले असून शासकीय दुग्ध शाळेत केवळ पाच हजार लिटर दुधाचे संकलन करून तेवढेच वितरण करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांकडून मागणी असूनही पुरेसे दूध मिळत नसल्याने आधीच हतबल झालेल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देपशुधनपालक शेतकरी संकटात : दुग्धशाळेत दररोज केवळ पाच हजार लिटर दूध संकलन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : समाधानकारक पाऊस न पडल्याने पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली. परिणामी, दुधाचे उत्पादन घटले असून शासकीय दुग्ध शाळेत केवळ पाच हजार लिटर दुधाचे संकलन करून तेवढेच वितरण करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांकडून मागणी असूनही पुरेसे दूध मिळत नसल्याने आधीच हतबल झालेल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.विदर्भातून सर्वाधिक कमी दुध उत्पादन करणारा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. सिंचनाचे क्षेत्र समाधानकारक नसल्याने हजारो शेतकरी केवळ भातशेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पारंपरिक भातशेतीमधून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. पण, नाईलाजास्तव शेतकºयांना दिवस ढकलण्याशिवाय दूसरा पर्यायच नाही. शेतीला पूरक व्यवसाय करण्याच्या केवळ घोषणा झाल्या. मात्र, लोकप्रतिनिधींनी यादृष्टीने परिणामकारक प्रयत्न केले नाही. त्यामुळे हजारो शेतकरी पारंपरिक शेतीच्या दुष्टचक्रात अडकले आहेत. लागवडीचा खर्चही मिळत नाही. सिंचनाची व्याप्ती वाढविण्यासाठी उपलब्ध असणारे जलस्त्रोत व त्यावर आधारीत कृषीपूरक दुग्ध उत्पादनाच्या योजना जिल्ह्यात आल्या असत्या तर शेतकºयांची दैनावस्था संपली असती. पण, सरकारच्या उदासिन धोरणामुळे चंद्रपूर जिल्हा दूध उत्पादनात मागे पडला आहे.चार जिल्ह्यांतून दुधाची आयातशेतीसोबत दुधाळी जनावरांचे पालन करून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. मात्र, जिल्ह्यात मोठी योजना न आल्याने मागणीच्या तुलनेत पुरेसे दुग्ध उत्पादन होत नाही. भंडारा, गोंदिया, वर्धा व नागपूर जिल्ह्यातून दूधाची आयात करून जिल्ह्याची गरज पूर्ण करावी लागत आहे.आश्वासने कागदावरचशासकीय दुग्धशाळेत अद्ययावत संयंत्र सोयीसुविधा आहेत. पण, दुग्धोत्पादन क्षमतेपेक्षा कमी आहे. ते पुन्हा वाढू शकते. उपलब्ध संसाधनांचा वापर करून दुग्ध प्रक्रीया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याचे आश्वासन राज्याचे दूग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिले होते. परंतु तेही कागदावरच राहिले आहे.संस्थात्मक केंद्रांची उपेक्षाचंद्रपुरातील दूध डेअरीमध्ये नागभीड व उमरेड येथील शित केंद्रातून दूध आणले जाते. सद्यस्थितीत तीन संकलन केंद्रे बंद आहेत. खासगी दूध कंपन्यांपेक्षा जनतेचा शासकीय दूध खरेदीवर विश्वास आहे. केंद्रातील दुधाची गुणवत्ता उत्तम असली तरी उत्पादन व संकलनासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही. संबंधित यंत्रणा कार्य करते. पण, आर्थिक बळ नाही. संस्थांत्मक केंद्रांची उच्च पातळीवरूनच उपेक्षा केली जात जात आहे. याकरिता संकलन व खरेदी थेट शितकरण संयंत्रातून सोसायटी, जिल्हा संस्था अथवा वैयक्तिक दूध उत्पादकांकडून घेण्यासाठी परवानगी देण्याचा विचारही गुंडाळून ठेवण्यात आला. सरकारकडून दूग्ध उत्पादनासाठी विशेष प्रयत्न होत नसल्याची नाराजी शेतकºयांनी व्यक्त केली आहे.