शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या चुकाऱ्यांअभावी कर्जदार शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:01 IST

कापूस विक्रीसाठी ताटकळत राहावे लागत आहे. राजुरा येथे ७ हजार ५०० शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली. पण, खरेदीचा वेग न वाढविल्याने शेतकऱ्यांना खरीप हृंगामाची कामे सोडून चकरा माराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिकट स्थिती आहे. त्यामुळे सीसीआय शेतकऱ्यांकडून कापूस कधी खरेदी करेल, याची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देपीककर्ज भरण्याची मुदत संपणार : कापूस विक्रीसाठी होतोय विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : लॉकडाऊनमुळे बहुतांश शेतकऱ्यांचा शेतमाल अजूनही विकला नाही. शेतकºयांना खरीपासाठी पैशाची गरज आहे. पण कापसाचे चुकारे मिळत नसल्याने जुने पीककर्ज परत करून नवीन कर्ज कसे घेणार, याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.कोरोनाचे संकट आल्याने लॉकडाऊन सुरू आहे. शेतकऱ्यांनी कसाबसा शेतातील शेतमाल काढून घरी आणला. मात्र लॉकडाऊनमुळे शेतमालाच्या बाजारपेठावर बंधने आली. नगदी पीक समजला जाणारा कापूस शेतकऱ्यांनी घरीच भरून ठेवला. ३१ मे २०२० पर्यंत पीककर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी सीसीआयकडे नोंदणी केली आहे. परंतु कापूस विक्रीसाठी ताटकळत राहावे लागत आहे. राजुरा येथे ७ हजार ५०० शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली. पण, खरेदीचा वेग न वाढविल्याने शेतकऱ्यांना खरीप हृंगामाची कामे सोडून चकरा माराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिकट स्थिती आहे. त्यामुळे सीसीआय शेतकऱ्यांकडून कापूस कधी खरेदी करेल, याची प्रतीक्षा आहे. एक महिन्याचा कालावधी उलटला पण ५०० हून जास्त शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली नाही. त्यामुळे राजुरा येथे साडेसात हजार शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी किती दिवसाचा कालावधी लागेल, याचे उत्तर कुणाकडेही नाही. शेतमाल विकला नसल्याने शेतकऱ्यांकडे पीककर्ज भरायला पैसे नाही. बँकांचे पीककर्ज भरण्याची तारीख जवळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.व्याज भरून द्यावे लागणारयावर्षी प्रथमच शेतकऱ्यांना शेतमाल मे महिन्यापर्यंत विक्रीच्या प्रतीक्षेत ठेवावा लागला. त्यामुळे शेतकºयांना पैशाची अडचण निर्माण झाली आहे. शासनाने पीककर्ज भरण्याची मुदत वाढवून द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना वर्षभराचे व्याज बँकांना भरावा लागण्याचा धोका आहे.पीककर्जाला मुदतवाढ द्यासीसीआयला कापूस विक्री केल्यानंतर महिनाभरानंतर शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे बँक खात्यात वळते केले जाते. ३१ मे २०२० पीककर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना जुने कर्ज भरण्यासाठी शेतकºयांनी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने बँकांचे पीककर्ज भरण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२० पर्यंत करण्याची मागणी आहे.

टॅग्स :cottonकापूस