शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
2
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
3
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
4
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
5
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
7
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
8
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
9
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
10
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
11
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
12
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
13
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
14
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
15
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
16
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
17
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
18
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
19
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
20
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!

कापसाच्या चुकाऱ्यांअभावी कर्जदार शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:01 IST

कापूस विक्रीसाठी ताटकळत राहावे लागत आहे. राजुरा येथे ७ हजार ५०० शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली. पण, खरेदीचा वेग न वाढविल्याने शेतकऱ्यांना खरीप हृंगामाची कामे सोडून चकरा माराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिकट स्थिती आहे. त्यामुळे सीसीआय शेतकऱ्यांकडून कापूस कधी खरेदी करेल, याची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देपीककर्ज भरण्याची मुदत संपणार : कापूस विक्रीसाठी होतोय विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : लॉकडाऊनमुळे बहुतांश शेतकऱ्यांचा शेतमाल अजूनही विकला नाही. शेतकºयांना खरीपासाठी पैशाची गरज आहे. पण कापसाचे चुकारे मिळत नसल्याने जुने पीककर्ज परत करून नवीन कर्ज कसे घेणार, याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.कोरोनाचे संकट आल्याने लॉकडाऊन सुरू आहे. शेतकऱ्यांनी कसाबसा शेतातील शेतमाल काढून घरी आणला. मात्र लॉकडाऊनमुळे शेतमालाच्या बाजारपेठावर बंधने आली. नगदी पीक समजला जाणारा कापूस शेतकऱ्यांनी घरीच भरून ठेवला. ३१ मे २०२० पर्यंत पीककर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी सीसीआयकडे नोंदणी केली आहे. परंतु कापूस विक्रीसाठी ताटकळत राहावे लागत आहे. राजुरा येथे ७ हजार ५०० शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली. पण, खरेदीचा वेग न वाढविल्याने शेतकऱ्यांना खरीप हृंगामाची कामे सोडून चकरा माराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिकट स्थिती आहे. त्यामुळे सीसीआय शेतकऱ्यांकडून कापूस कधी खरेदी करेल, याची प्रतीक्षा आहे. एक महिन्याचा कालावधी उलटला पण ५०० हून जास्त शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली नाही. त्यामुळे राजुरा येथे साडेसात हजार शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी किती दिवसाचा कालावधी लागेल, याचे उत्तर कुणाकडेही नाही. शेतमाल विकला नसल्याने शेतकऱ्यांकडे पीककर्ज भरायला पैसे नाही. बँकांचे पीककर्ज भरण्याची तारीख जवळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.व्याज भरून द्यावे लागणारयावर्षी प्रथमच शेतकऱ्यांना शेतमाल मे महिन्यापर्यंत विक्रीच्या प्रतीक्षेत ठेवावा लागला. त्यामुळे शेतकºयांना पैशाची अडचण निर्माण झाली आहे. शासनाने पीककर्ज भरण्याची मुदत वाढवून द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना वर्षभराचे व्याज बँकांना भरावा लागण्याचा धोका आहे.पीककर्जाला मुदतवाढ द्यासीसीआयला कापूस विक्री केल्यानंतर महिनाभरानंतर शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे बँक खात्यात वळते केले जाते. ३१ मे २०२० पीककर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना जुने कर्ज भरण्यासाठी शेतकºयांनी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने बँकांचे पीककर्ज भरण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२० पर्यंत करण्याची मागणी आहे.

टॅग्स :cottonकापूस