शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कापसाच्या चुकाऱ्यांअभावी कर्जदार शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:01 IST

कापूस विक्रीसाठी ताटकळत राहावे लागत आहे. राजुरा येथे ७ हजार ५०० शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली. पण, खरेदीचा वेग न वाढविल्याने शेतकऱ्यांना खरीप हृंगामाची कामे सोडून चकरा माराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिकट स्थिती आहे. त्यामुळे सीसीआय शेतकऱ्यांकडून कापूस कधी खरेदी करेल, याची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देपीककर्ज भरण्याची मुदत संपणार : कापूस विक्रीसाठी होतोय विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : लॉकडाऊनमुळे बहुतांश शेतकऱ्यांचा शेतमाल अजूनही विकला नाही. शेतकºयांना खरीपासाठी पैशाची गरज आहे. पण कापसाचे चुकारे मिळत नसल्याने जुने पीककर्ज परत करून नवीन कर्ज कसे घेणार, याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.कोरोनाचे संकट आल्याने लॉकडाऊन सुरू आहे. शेतकऱ्यांनी कसाबसा शेतातील शेतमाल काढून घरी आणला. मात्र लॉकडाऊनमुळे शेतमालाच्या बाजारपेठावर बंधने आली. नगदी पीक समजला जाणारा कापूस शेतकऱ्यांनी घरीच भरून ठेवला. ३१ मे २०२० पर्यंत पीककर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी सीसीआयकडे नोंदणी केली आहे. परंतु कापूस विक्रीसाठी ताटकळत राहावे लागत आहे. राजुरा येथे ७ हजार ५०० शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली. पण, खरेदीचा वेग न वाढविल्याने शेतकऱ्यांना खरीप हृंगामाची कामे सोडून चकरा माराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिकट स्थिती आहे. त्यामुळे सीसीआय शेतकऱ्यांकडून कापूस कधी खरेदी करेल, याची प्रतीक्षा आहे. एक महिन्याचा कालावधी उलटला पण ५०० हून जास्त शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली नाही. त्यामुळे राजुरा येथे साडेसात हजार शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी किती दिवसाचा कालावधी लागेल, याचे उत्तर कुणाकडेही नाही. शेतमाल विकला नसल्याने शेतकऱ्यांकडे पीककर्ज भरायला पैसे नाही. बँकांचे पीककर्ज भरण्याची तारीख जवळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.व्याज भरून द्यावे लागणारयावर्षी प्रथमच शेतकऱ्यांना शेतमाल मे महिन्यापर्यंत विक्रीच्या प्रतीक्षेत ठेवावा लागला. त्यामुळे शेतकºयांना पैशाची अडचण निर्माण झाली आहे. शासनाने पीककर्ज भरण्याची मुदत वाढवून द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना वर्षभराचे व्याज बँकांना भरावा लागण्याचा धोका आहे.पीककर्जाला मुदतवाढ द्यासीसीआयला कापूस विक्री केल्यानंतर महिनाभरानंतर शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे बँक खात्यात वळते केले जाते. ३१ मे २०२० पीककर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना जुने कर्ज भरण्यासाठी शेतकºयांनी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने बँकांचे पीककर्ज भरण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२० पर्यंत करण्याची मागणी आहे.

टॅग्स :cottonकापूस