शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
4
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
5
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
6
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
7
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
8
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
9
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
10
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
11
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
12
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
13
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
14
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
15
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
16
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
17
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
19
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
20
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान

कापूस उत्पादक पर्यायी पिकाच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

मागील काही वर्षांमध्ये कपाशीच्या लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच यावर्षी कापसाच्या पिकावर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाला. परतीच्या पावसामुळे कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळेनासे झाले आहे. परिणामी यावर्र्षी कापसाची शेती तोट्याची ठरत आहे.

ठळक मुद्देखर्च जास्त, नफा कमी : वरोरा, कोरपना, राजुरा व भद्रावती तालुक्यात कपाशीचा सर्वाधिक पेरा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील शेतकरी कपाशीची लागवड करीत होते. मात्र दिवसेंदिवस ही शेती तोट्याची ठरत असल्याने आता शेतकरी पर्यायी पिकांच्या शोधात आहे. विशेष म्हणजे, काही वर्षांपासून कापसाला सोयाबीन हे पर्यायी पीक होते. मात्र यावर्षी अवकाळी पावसामुळे होत्याचे नव्हते झाले आणि कापूस, सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता करायचे तरी काय, असा प्रश्न कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.मागील काही वर्षांमध्ये कपाशीच्या लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच यावर्षी कापसाच्या पिकावर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाला. परतीच्या पावसामुळे कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळेनासे झाले आहे. परिणामी यावर्र्षी कापसाची शेती तोट्याची ठरत आहे.खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, कापूस पिकाला सततच्या पावसाचा फटका बसला. शेतीला यावर्षी मोठा खर्च लागला असून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लावलेला खर्च वसूल होण्याची शक्यता नाही. कापसाची बोंडे सततच्या पावसामुळे काळवंडली आहेत. यामुळे चांगल्या दर्जाचा कापूस येण्याची शास्वती नाही. झाडांवर लागणाºया फुले, पाल्यांची गळतीही होत आहे. सद्या कपाशी पीक पिवळे पडून पाने लाल होत आहेत. कीड रोगांपासून बचावासाठी शेतकºयांनी कपाशीवर पिकावर वेळोवेळी महागडी फवारणी केली. शेती मशागत, खते, फवारणी आणि वेचणीसाठी हजारो रुपये खर्च करण्यात आला. कापसाला योग्य भाव नसल्याने लावलेला खर्चही निघणे यावर्षी कठीण झाले आहे.जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती राजुरा, कोरपना या तालुक्यासोबतच चंद्रपूर तालुक्यातील काही भागातील शेतकरी कापसाची लागवड करतात. विशेष म्हणजे, मागील दोन ते तीन वर्षांपासून पोंभूर्णा, गोंडपिपरी या धान उत्पादक तालुक्यातील शेतकºयांनीही कापसाची लागवड सुरु केली आहे. मात्र त्यांना अद्यापही या पिकामध्ये पाहिजे तसे यश आले नाही. यावर्षी मात्र सर्व शेतकºयांची अवकाळी पावसाने दैना केली आहे. त्यातच कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याने मजूरी करू, पण कापसाची शेती करायची नाही, असा विचार काही शेतकरी करीत आहेत.उत्पादनापेक्षा खर्च अधिकउत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकºयांना शेती व्यवसाय करण्यासाठी शासनाने विविध योजनांचा लाभ करून द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात सोयाबीनची कामे पूर्ण झाली असून गहू आणि हरभरा पेरणीची कामे सुरू आहे. त्यातच कापूस निघण्याचे दिवस सुरू आहे. मात्र मजुरांची मजुरी दिवसेंदिवस वाढता असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सोयाबीन पिकविण्याकरिता शेतकºयाला एका एकराला आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो. उत्पादनाकरिता जेवढा खर्च होतो, तेवढ्या खर्चाचे पीक सुद्धा येत नाही. पाऊस शेतीपूरक पडला तर ठिक अन्यथा शेतकºयाला तोट्यात जावे लागते. त्यामुळे शेती करायचे कुणी धाडस करीत नाही. जिल्ह्यात बºयाच ठिकाणी महागाईमुळे काही शेतमालकाची शेती ओसाड पडली आहे.मशागतीपासून कापूस वेचणीपर्यंत सारखा खर्च करावा लागतो. त्यातच योग्य भाग नसल्याने कपाशीची शेती करणे परवडत नाही. मात्र दुसरा इलाज नसल्याने नफा होईल, या आशेवर कपाशीची शेती करणे सुरु आहे.- शेतकरी,कपाशीची पेरणी करणे परवडत नाही. परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. लावलेला खर्च वसूल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. यावर्षी कापसाची शेती तोट्याची ठरली आहे.- मारोती डोंगे, शेतकरी, कोरपना

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती