शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेच्यातच पहाडावरील कापूस गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

मागील पाच वर्षात कपाशी उत्पादनाचा इतिहास पाहता व यंदा हिरवेगार कापसाचे चित्र पाहून शेतकऱ्यांनी विविध स्वप्न रंगविली होती. मात्र परतीच्या पावसाने स्वपन्नाचा चुराडा केल्याने यावषीर्ही शेतकरी कर्जाच्या छायेतून बाहेर निघेल की नाही, ही शंका आहे. पूर्वीही दुष्काळाचे चटके बसत गेले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची झोळी रिकामी : आता तुरीवरही अळी आल्याने शेतकरी हैराण

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती (चंद्रपूर) : पांढर सोनं असे संबोधले जाणाºया कापसाने यंदा शेतकऱ्यांच्या हाती कवडया दिल्या आहेत. कुठे दोन वेच्यात तर कुठे तीन वेच्यातच कापूस झाडावरून गायब झाला असून आता तुरीवरही अळ्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले. मात्र अजूनही दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नसल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.मागील पाच वर्षात कपाशी उत्पादनाचा इतिहास पाहता व यंदा हिरवेगार कापसाचे चित्र पाहून शेतकऱ्यांनी विविध स्वप्न रंगविली होती. मात्र परतीच्या पावसाने स्वपन्नाचा चुराडा केल्याने यावषीर्ही शेतकरी कर्जाच्या छायेतून बाहेर निघेल की नाही, ही शंका आहे. पूर्वीही दुष्काळाचे चटके बसत गेले. परंतु यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांना कमालीचा अडचणीत आणणारा ठरला आहे. शेतीतून आर्थिक घडी मजबूत करणारे कपाशी हेच मुख्य पीक आहे. याच उत्पादनाने दगा दिल्याने आता पहाडावरील शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. बि-बियाणासाठी घेतलेले बँक कर्ज व सावकारी कर्ज फेडायचे कसे व मुला-बाळाचा सांभाळ करायचा कसा, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.मागील वर्षी बोंडअळीने तर यंदा निसर्गाने शेतकºयांना उद्ध्वस्त केले आहे. कपाशी पिक शेतकºयांच्या व्यवहाराचा कणा आहे. मात्र अल्पावधीतच हा कणा मोडला गेला. सुरूवातीला पिकांना गरजेनुसार पाऊस पडत गेल्याने पिके जोमात दिसत होती. यंदा तरी आपल्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी होईल, अशी आशा बाळगलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर परतीच्या पावसाने पाणी फेरले. हिरवागार दिसणाऱ्या कापसाचा आठवडाभरातच धिंगाना झाला. फुल चाफ्यांची गळती होत बोंडही सडले गेले आणि झाडावर फुटलेल्या कापसाला झाडावरच कोंब निघाले. काहींनी कशीबशी कापसाची वेचणी केली.मात्र कापूस पाण्यात भिजल्याने कवडीमोल दरात विकावे लागले. नंतरच्या वेच्याला निघालेला कापूस भाववाढीच्या अपेक्षेने घरातच दाबून ठेवला आहे. परंतु बि-बियाणाच्या लागवडीसाठी घेतलेले बँक कर्ज व सावकारी कर्जासाठी शेतकऱ्यांना तंबी मिळत असल्याने कमी दरातच शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. यात शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस