शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

दोन वेच्यातच पहाडावरील कापूस गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

मागील पाच वर्षात कपाशी उत्पादनाचा इतिहास पाहता व यंदा हिरवेगार कापसाचे चित्र पाहून शेतकऱ्यांनी विविध स्वप्न रंगविली होती. मात्र परतीच्या पावसाने स्वपन्नाचा चुराडा केल्याने यावषीर्ही शेतकरी कर्जाच्या छायेतून बाहेर निघेल की नाही, ही शंका आहे. पूर्वीही दुष्काळाचे चटके बसत गेले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची झोळी रिकामी : आता तुरीवरही अळी आल्याने शेतकरी हैराण

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती (चंद्रपूर) : पांढर सोनं असे संबोधले जाणाºया कापसाने यंदा शेतकऱ्यांच्या हाती कवडया दिल्या आहेत. कुठे दोन वेच्यात तर कुठे तीन वेच्यातच कापूस झाडावरून गायब झाला असून आता तुरीवरही अळ्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले. मात्र अजूनही दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नसल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.मागील पाच वर्षात कपाशी उत्पादनाचा इतिहास पाहता व यंदा हिरवेगार कापसाचे चित्र पाहून शेतकऱ्यांनी विविध स्वप्न रंगविली होती. मात्र परतीच्या पावसाने स्वपन्नाचा चुराडा केल्याने यावषीर्ही शेतकरी कर्जाच्या छायेतून बाहेर निघेल की नाही, ही शंका आहे. पूर्वीही दुष्काळाचे चटके बसत गेले. परंतु यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांना कमालीचा अडचणीत आणणारा ठरला आहे. शेतीतून आर्थिक घडी मजबूत करणारे कपाशी हेच मुख्य पीक आहे. याच उत्पादनाने दगा दिल्याने आता पहाडावरील शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. बि-बियाणासाठी घेतलेले बँक कर्ज व सावकारी कर्ज फेडायचे कसे व मुला-बाळाचा सांभाळ करायचा कसा, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.मागील वर्षी बोंडअळीने तर यंदा निसर्गाने शेतकºयांना उद्ध्वस्त केले आहे. कपाशी पिक शेतकºयांच्या व्यवहाराचा कणा आहे. मात्र अल्पावधीतच हा कणा मोडला गेला. सुरूवातीला पिकांना गरजेनुसार पाऊस पडत गेल्याने पिके जोमात दिसत होती. यंदा तरी आपल्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी होईल, अशी आशा बाळगलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर परतीच्या पावसाने पाणी फेरले. हिरवागार दिसणाऱ्या कापसाचा आठवडाभरातच धिंगाना झाला. फुल चाफ्यांची गळती होत बोंडही सडले गेले आणि झाडावर फुटलेल्या कापसाला झाडावरच कोंब निघाले. काहींनी कशीबशी कापसाची वेचणी केली.मात्र कापूस पाण्यात भिजल्याने कवडीमोल दरात विकावे लागले. नंतरच्या वेच्याला निघालेला कापूस भाववाढीच्या अपेक्षेने घरातच दाबून ठेवला आहे. परंतु बि-बियाणाच्या लागवडीसाठी घेतलेले बँक कर्ज व सावकारी कर्जासाठी शेतकऱ्यांना तंबी मिळत असल्याने कमी दरातच शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. यात शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस