शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
3
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
4
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
5
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
6
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
7
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
8
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
9
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
10
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
11
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
12
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
13
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
14
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
15
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
16
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
17
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
18
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
19
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
20
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

२० हजारांवर शेतकऱ्यांना कापूस विक्रीची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

संचारबंदीत काही प्रमाणात सुट दिल्यानंतर कापूस विक्रीसाठी गर्दी होवू नये यासाठी बाजार समितीर्त्यांमार्फत नोंदणी करावी, अशी अट घालण्यात आली होती. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी घरात पडून असलेला कापूस विकण्यासाठी नोंदणीसुद्धा केली. मात्र, एकादिवशी ठरवून दिलेल्या संख्येइतकीच वाहनातील कापसाची खरेदी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत आपला कापूस विकता आला नाही.

ठळक मुद्देआर्थिक ताण : पावसाळा आला तरीही विक्री नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांकडील कापूसही घरातच लॉकडाऊन झाला आहे. सीसीआयची खरेदी लॉकडाऊनच्या काळात बंद केल्यामुळे पावसाच्या तोंडावर आजघडीला जिल्ह्यातील २० हजारांवर शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना खरीप हंगामाची चिंता सतावत आहे.चंद्रपूर, कोरपना, राजुरा, भद्रावती, वरोरा, गोंडपिपरी, चिमूर या तालुक्यांमध्ये कापसाचे उत्पन्न घेतले जाते. कापूस विकून आलेल्या पैशातून शेतकरी खरीप हंगामाची जुळवाजुळव करतात. यावर्षी मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने मार्च महिन्यापासून सर्व व्यवहार बंद पडले. दोन ते अडीच महिन्याननतर संचारबंदी काही प्रमाणात शिथील झाल्यानंतर काही जिनिंगमध्ये सीसीआयची खरेदी सुरु केली. परंतु सीसीआयमध्ये कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणीची अट घातली. कापूस उत्पादक तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नोंदणी केली. त्यापैकी आतापर्यंत केवळ ८ हजार ४२१ शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयने खरेदी केला. तर १९ हजारांवर शेतकऱ्यांचा कापूस आजही घरातच पडून आहे. काही सीसीआयच्या केंद्रांवरील शेतकऱ्यांचा कापूस पूर्ण खरेदी केला असून, काही बाजार समित्यांमार्फत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस अजूनही खरेदी करण्यात आलेला नाही. त्यामुळे वर्षभर कष्ट करुन पिकविलेला कापूस घरातच पडून असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत.संचारबंदीत काही प्रमाणात सुट दिल्यानंतर कापूस विक्रीसाठी गर्दी होवू नये यासाठी बाजार समितीर्त्यांमार्फत नोंदणी करावी, अशी अट घालण्यात आली होती. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी घरात पडून असलेला कापूस विकण्यासाठी नोंदणीसुद्धा केली. मात्र, एकादिवशी ठरवून दिलेल्या संख्येइतकीच वाहनातील कापसाची खरेदी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत आपला कापूस विकता आला नाही. आता पावसाळा सुरू झाला आहे. पेरणीची लगबग सुरू झाली असताना शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे.चंद्रपूर कृउबाकडे चार हजारांवर नोंदणीजिल्ह्यातील इतर बाजार समित्यांप्रमाणे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चार हजार २१ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. आतापर्यंत यापैकी केवळ २२६ शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयने खरेदी केला आहे. अजूनही चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील ३ हजार ७९५ शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र सर्व शेतकऱ्यांना विक्रीसाठी खुले करण्यासंदर्भातील पत्र चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांला दिले आहे. जिल्ह्यातील सीसीआयचे सर्व केंद्र कापूस विक्रीसाठी खुले केल्यास शेतकऱ्यांचा कापूस सीसीआय केंद्रामार्फत खरेदी केला जावू शकेल, असेही या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी या पत्रावर काय निर्णय घेतात, यावर शेतकºयांकडील कापसाचे भवितव्य अवलंबू आहे.

टॅग्स :cottonकापूस