शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

२० हजारांवर शेतकऱ्यांना कापूस विक्रीची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

संचारबंदीत काही प्रमाणात सुट दिल्यानंतर कापूस विक्रीसाठी गर्दी होवू नये यासाठी बाजार समितीर्त्यांमार्फत नोंदणी करावी, अशी अट घालण्यात आली होती. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी घरात पडून असलेला कापूस विकण्यासाठी नोंदणीसुद्धा केली. मात्र, एकादिवशी ठरवून दिलेल्या संख्येइतकीच वाहनातील कापसाची खरेदी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत आपला कापूस विकता आला नाही.

ठळक मुद्देआर्थिक ताण : पावसाळा आला तरीही विक्री नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांकडील कापूसही घरातच लॉकडाऊन झाला आहे. सीसीआयची खरेदी लॉकडाऊनच्या काळात बंद केल्यामुळे पावसाच्या तोंडावर आजघडीला जिल्ह्यातील २० हजारांवर शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना खरीप हंगामाची चिंता सतावत आहे.चंद्रपूर, कोरपना, राजुरा, भद्रावती, वरोरा, गोंडपिपरी, चिमूर या तालुक्यांमध्ये कापसाचे उत्पन्न घेतले जाते. कापूस विकून आलेल्या पैशातून शेतकरी खरीप हंगामाची जुळवाजुळव करतात. यावर्षी मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने मार्च महिन्यापासून सर्व व्यवहार बंद पडले. दोन ते अडीच महिन्याननतर संचारबंदी काही प्रमाणात शिथील झाल्यानंतर काही जिनिंगमध्ये सीसीआयची खरेदी सुरु केली. परंतु सीसीआयमध्ये कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणीची अट घातली. कापूस उत्पादक तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नोंदणी केली. त्यापैकी आतापर्यंत केवळ ८ हजार ४२१ शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयने खरेदी केला. तर १९ हजारांवर शेतकऱ्यांचा कापूस आजही घरातच पडून आहे. काही सीसीआयच्या केंद्रांवरील शेतकऱ्यांचा कापूस पूर्ण खरेदी केला असून, काही बाजार समित्यांमार्फत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस अजूनही खरेदी करण्यात आलेला नाही. त्यामुळे वर्षभर कष्ट करुन पिकविलेला कापूस घरातच पडून असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत.संचारबंदीत काही प्रमाणात सुट दिल्यानंतर कापूस विक्रीसाठी गर्दी होवू नये यासाठी बाजार समितीर्त्यांमार्फत नोंदणी करावी, अशी अट घालण्यात आली होती. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी घरात पडून असलेला कापूस विकण्यासाठी नोंदणीसुद्धा केली. मात्र, एकादिवशी ठरवून दिलेल्या संख्येइतकीच वाहनातील कापसाची खरेदी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत आपला कापूस विकता आला नाही. आता पावसाळा सुरू झाला आहे. पेरणीची लगबग सुरू झाली असताना शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे.चंद्रपूर कृउबाकडे चार हजारांवर नोंदणीजिल्ह्यातील इतर बाजार समित्यांप्रमाणे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चार हजार २१ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. आतापर्यंत यापैकी केवळ २२६ शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयने खरेदी केला आहे. अजूनही चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील ३ हजार ७९५ शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र सर्व शेतकऱ्यांना विक्रीसाठी खुले करण्यासंदर्भातील पत्र चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांला दिले आहे. जिल्ह्यातील सीसीआयचे सर्व केंद्र कापूस विक्रीसाठी खुले केल्यास शेतकऱ्यांचा कापूस सीसीआय केंद्रामार्फत खरेदी केला जावू शकेल, असेही या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी या पत्रावर काय निर्णय घेतात, यावर शेतकºयांकडील कापसाचे भवितव्य अवलंबू आहे.

टॅग्स :cottonकापूस