शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

तीन पिढ्यांच्या पुराव्याची अट रद्द करा

By admin | Updated: June 20, 2017 00:30 IST

जबरानजोत शेतकरी व अदिवासी शेतकऱ्यांना अशक्यप्राय असणारा ८५ वर्षांचा पुरावा मागणे हा त्यांचे न्याय हक्क नाकारण्याचा प्रकार असून...

वन जमिनीवरील अतिक्रमण : वामनराव चटप यांची केंद्र सरकारकडे मागणीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जबरानजोत शेतकरी व अदिवासी शेतकऱ्यांना अशक्यप्राय असणारा ८५ वर्षांचा पुरावा मागणे हा त्यांचे न्याय हक्क नाकारण्याचा प्रकार असून केंद्र सरकारने वनजमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी २००६ च्या कायद्यातील तीन पिढ्यांच्या पुराव्याची अट रद्द करण्यासाठी या कायद्यात सुधारणा करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय आदिवासी व समाजकल्याण मंत्री आणि केंद्रीय वने, पर्यावरण व ग्रामविकास मंत्री आदींकडे केली आहे.२००६ मध्ये केंद्र सरकारने अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वनहक्क मान्यता अधिनियम पारित केला. या अधिनियमातील कलम २ (ण) मधील ‘इतर पारंपरिक वननिवासी’ या शब्दाच्या व्याख्येत तीन पिढ्यांच्या पुराव्याची अट सामील करण्यात आली आहे. तसेच ‘पिढी’ या शब्दाचा अर्थ २५ वर्षांचा कालखंड असे नमूद आहे. या व्याख्येत १३ डिसेंबर २००५ पूर्वी तीन पिढ्यांपासून मुख्यत्वे करून वनात राहणारा आणि उपजिविकेच्या खऱ्या गरजांसाठी वनावर किंवा वन जमिनीवर अवलंबून असणारा कोणताही सदस्य अथवा समाज, असा आहे. प्रत्यक्षात भारतीय वन कायदा १९२७ हा गोऱ्या इंग्रजांचे काळातील आहे. भारत सरकारने १९८० साली वनसंरक्षण कायदा पारित केला. त्याचे नोटिफिकेशन २७ डिसेंबर १९८० रोजी होऊन आता जवळपास ३५ वर्षे झाली आहेत. १३ डिसेंबर २००५ पासून मोजल्यास तीन पिढ्या म्हणजे ७५ वर्षे आणि २००५ ते २०१५ हा आजमितीचा काळ म्हणजे १२ वर्षे धरला तर ८७ वर्षांचा पुरावा द्यावा लागणार आहे. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची स्थापना १९५९ च्या कायद्यानंतर अथवा त्याचे आसपासच्या कालावधीत झाली आहे. आपल्या देशाचे संविधान लागू होऊन केवळ ६७ वर्षे झाली आहेत. त्यामुळे ७५ वर्षांच्या ३ पिढ्यांच्या पुराव्यावर आग्रही राहणे म्हणजे वनजमिनीवरील जबरानजोत शेतकऱ्यांना एकप्रकारे पट्टे नाकारण्याचाच प्रकार आहे.महाराष्ट्र राज्याने शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा नुकतीच केली आहे तसेच त्यांना दहा हजार रुपयाच्या तात्काळ मदत देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, हे शेतकरी या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अयशस्वी ठरत आहेत. त्यामुळे तीन पिढ्यांची अट काढून टाकण्यात यावी आणि त्याखालील स्पष्टीकरणातील ‘पिढी’ याचा अर्थ २५ वर्षांचा कालखंड हेही वगळणे गरजेचे आहे. हा बदल तातडीने करावा आणि जबरानजोत शेतकऱ्यांना जमिनीचे मालक करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. चटप यांनी केली आहे.