शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
5
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
6
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
7
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
8
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
9
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
10
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
11
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
12
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
13
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
14
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
15
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
16
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
17
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
18
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
19
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
20
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?

तीन पिढ्यांच्या पुराव्याची अट रद्द करा

By admin | Updated: June 20, 2017 00:30 IST

जबरानजोत शेतकरी व अदिवासी शेतकऱ्यांना अशक्यप्राय असणारा ८५ वर्षांचा पुरावा मागणे हा त्यांचे न्याय हक्क नाकारण्याचा प्रकार असून...

वन जमिनीवरील अतिक्रमण : वामनराव चटप यांची केंद्र सरकारकडे मागणीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जबरानजोत शेतकरी व अदिवासी शेतकऱ्यांना अशक्यप्राय असणारा ८५ वर्षांचा पुरावा मागणे हा त्यांचे न्याय हक्क नाकारण्याचा प्रकार असून केंद्र सरकारने वनजमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी २००६ च्या कायद्यातील तीन पिढ्यांच्या पुराव्याची अट रद्द करण्यासाठी या कायद्यात सुधारणा करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय आदिवासी व समाजकल्याण मंत्री आणि केंद्रीय वने, पर्यावरण व ग्रामविकास मंत्री आदींकडे केली आहे.२००६ मध्ये केंद्र सरकारने अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वनहक्क मान्यता अधिनियम पारित केला. या अधिनियमातील कलम २ (ण) मधील ‘इतर पारंपरिक वननिवासी’ या शब्दाच्या व्याख्येत तीन पिढ्यांच्या पुराव्याची अट सामील करण्यात आली आहे. तसेच ‘पिढी’ या शब्दाचा अर्थ २५ वर्षांचा कालखंड असे नमूद आहे. या व्याख्येत १३ डिसेंबर २००५ पूर्वी तीन पिढ्यांपासून मुख्यत्वे करून वनात राहणारा आणि उपजिविकेच्या खऱ्या गरजांसाठी वनावर किंवा वन जमिनीवर अवलंबून असणारा कोणताही सदस्य अथवा समाज, असा आहे. प्रत्यक्षात भारतीय वन कायदा १९२७ हा गोऱ्या इंग्रजांचे काळातील आहे. भारत सरकारने १९८० साली वनसंरक्षण कायदा पारित केला. त्याचे नोटिफिकेशन २७ डिसेंबर १९८० रोजी होऊन आता जवळपास ३५ वर्षे झाली आहेत. १३ डिसेंबर २००५ पासून मोजल्यास तीन पिढ्या म्हणजे ७५ वर्षे आणि २००५ ते २०१५ हा आजमितीचा काळ म्हणजे १२ वर्षे धरला तर ८७ वर्षांचा पुरावा द्यावा लागणार आहे. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची स्थापना १९५९ च्या कायद्यानंतर अथवा त्याचे आसपासच्या कालावधीत झाली आहे. आपल्या देशाचे संविधान लागू होऊन केवळ ६७ वर्षे झाली आहेत. त्यामुळे ७५ वर्षांच्या ३ पिढ्यांच्या पुराव्यावर आग्रही राहणे म्हणजे वनजमिनीवरील जबरानजोत शेतकऱ्यांना एकप्रकारे पट्टे नाकारण्याचाच प्रकार आहे.महाराष्ट्र राज्याने शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा नुकतीच केली आहे तसेच त्यांना दहा हजार रुपयाच्या तात्काळ मदत देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, हे शेतकरी या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अयशस्वी ठरत आहेत. त्यामुळे तीन पिढ्यांची अट काढून टाकण्यात यावी आणि त्याखालील स्पष्टीकरणातील ‘पिढी’ याचा अर्थ २५ वर्षांचा कालखंड हेही वगळणे गरजेचे आहे. हा बदल तातडीने करावा आणि जबरानजोत शेतकऱ्यांना जमिनीचे मालक करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. चटप यांनी केली आहे.