शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

जिल्ह्यात दमदार बसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 22:46 IST

एन्ट्री करुन गायब झालेल्या पावसाचे शुक्रवारी पुनरागमन झाले. चंद्रपुरात दुपारी ३.३० वाजता दमदार पावसाला सुरूवात झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. विशेष म्हणजे, संपूर्ण जिल्ह्यातच हा पाऊस झाला. त्यामुळे आतापर्यंत पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला. बहुप्रतीक्षेनंतर आलेल्या गारव्यामुळे नागरिकही सुखावले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये आनंद : पावसाच्या गारव्यामुळे नागरिकही सुखावले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एन्ट्री करुन गायब झालेल्या पावसाचे शुक्रवारी पुनरागमन झाले. चंद्रपुरात दुपारी ३.३० वाजता दमदार पावसाला सुरूवात झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. विशेष म्हणजे, संपूर्ण जिल्ह्यातच हा पाऊस झाला. त्यामुळे आतापर्यंत पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला. बहुप्रतीक्षेनंतर आलेल्या गारव्यामुळे नागरिकही सुखावले.मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्हा पावसाच्या बाबतीत दुर्दैवीच ठरत आला आहे. उन्हाळा नेहमीच त्रस्त करून सोडतो. मात्र पाऊस पाहिजे तसा बरसत नाही. यावर्षीच्या उन्हाळ्याने तर कहरच केला. मार्च महिन्यापासून जूनच्या पंधरवाड्यापर्यंत सूर्याने अविरत आग ओकली. सूर्याचा पारा ४८ अंशापर्यंत पोहचला. दुपारी रस्ते ओस पडू लागले होते. जूनच्या पंधरवाड्यापर्यंतही पाऊस पडला नाही. मान्सूनपूर्व पावसानेही हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकºयांसह जिल्ह्यातील नागरिकही चिंतातूर झाले होते.मागील वर्षीचा हंगाम शेतकºयांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. पावसाने अनेकवेळा शेतकºयांना दगा दिला. परिणामी शेतकºयांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकºयांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकºयांच्या हाती आले नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. शासनाने देऊ केलेली कर्जमाफी अद्याप अनेकांना मिळालेली नाही. आता पुन्हा शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. बँकेचे कर्ज, उसनवारी घेऊन शेतकºयांनी बि-बियाणे, खते खरेदी केले. मात्र दमदार पाऊस झाला नाही. यंदाही पाऊस हिरमोड करेल, असे वाटत असतानाच २० जून रोजी पावसाने हजेरी लावली. मात्र पाऊस पाहिजे तसा दमदार नव्हता. त्यानंतर पाऊस बेपत्ता झाला. पाऊस तर आला नाहीच, उलट तापमान पुन्हा वाढू लागले. पारा पुन्हा ४१, ४२ अंशावर गेला. त्यामुळे शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत असतानाच शुक्रवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. सकाळी ढगाळ वातावरण होते. त्यानंतर ढग जाऊन कडक उन्ह निघाले. दरम्यान, दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अचानक वातावरण बदलले.चहुबाजूंनी ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. एक तास चांगला पाऊस बरसला. विशेष म्हणजे, काही भागाचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्रच हा पाऊस बरसला. त्यामुळे पाणी जमिनीत मुरले. या पावसामुळे शेतकºयांमध्ये आनंद पसरला.दुबार पेरणी टळलीयापूर्वी झालेल्या एका पावसानंतर अनेक शेतकºयांनी पेरणी केली होती. हवामान खात्यानेही २० जूननंतर संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकरी निश्चिंत होते. मात्र पाऊस आलाच नाही. पावसाच्या दडीमुळे शेतकरी चिंतातूर झाले. शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढविले. मात्र आज शुक्रवारी जिल्हाभर झालेल्या पावसामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे.पावसाने सातत्य ठेवले तर पेरण्यांना येईल वेगशुक्रवारचा पाऊस दमदार स्वरुपाचा व सर्वत्र होता. त्यामुळे जमिनीमध्ये बºयापैकी पाणी मुरले आहे. जिल्ह्यात बहुतांश शेतकरी अशाच पावसाच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे त्यांनी पेरणी थांबवून ठेवली होती. मात्र आज झालेल्या पावसामुळे शनिवारी अनेक शेतकरी पेरणीला कामाला लागतील. पावसाने असेच सातत्य ठेवले तर पुढच्या काही दिवसात पेरणीला वेग येण्याची शक्यता आहे.