शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
2
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
3
Shantanu Naidu : रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
4
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
5
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
6
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
7
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
8
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
9
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
10
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
11
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
12
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
13
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
14
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
15
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
16
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
17
चार मुलं जन्माला घाला आणि टॅक्स वाचवा; सरकारकडून १६,५६३ कोटी रुपये पॅकेजची घोषणा!
18
तेजस्वी यादव यांची सरकारवर १२ प्रश्नांची सरबत्ती; बेरोजगारीवर मागितली थेट उत्तरे
19
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
20
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली

तीन पिढ्यांच्या अटीमुळे जबरानजोतदार अडचणीत

By admin | Updated: March 1, 2017 00:46 IST

मागील अनेक वर्षापासून शेती कसत असलेल्या जबरानजोतदार शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मागच्या महिन्यात नोटीस जारी करण्यात आले.

वर्षानुवर्षे पिळवणूक : पट्टेवाटपाचा दावा पूर्ण करावातोहोगाव : मागील अनेक वर्षापासून शेती कसत असलेल्या जबरानजोतदार शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मागच्या महिन्यात नोटीस जारी करण्यात आले. त्यामध्ये तीन पिढ्यांपासून जमीन कसत असल्याचा दाखला सादर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे आता त्यांना पट्टे देण्याची कार्यवाही स्थगित करण्यात आली आहे.गेल्या ५० - ६० वर्षांपासून जबरानजोतधारक शेती कसत कुटुंबाचे पालनपोषण करीत आहेत. या जबरानजोतधारकांच्या काही जमिनी वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्या असून त्यांना कच्चे पट्टे देण्यात आले. या जबरानजोतधारकांना कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी कोणाला ग्रामसभेचा ठराव, कोणाला वंशवाढ जमिनीचा नकाशा आणि विशेष म्हणजे तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा अशा त्रुटी दाखविल्या आहेत. तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा अतिशय गंभर विषय बनला आहे. कारण प्रत्येक जबरानजोतधारकांचे पूर्वज सुशिक्षित नव्हते. त्या काळात त्यांना पुरेसे ज्ञान अवगत नव्हते. त्या काळात त्यांना स्वत:च्या मालकी हक्काची जमीन नव्हती. हे पूर्वज अज्ञानी असल्यामुळे शाळेत प्रवेश तर सोडाच त्यांच्या जन्माची नोंद केली नाही. ज्यांनी जन्माची नोंद केली, त्यांची चौकशी केली असता ४० ते ५० वर्षापूर्वीची कागदपत्रे ही तहसील कार्यालयात उपस्थित असतात. पण आता ५० ते ६० वर्र्षांचा कालखंड ओलांडून गेला असल्यामुळे ते कागदपत्रे जीर्ण होऊन तुकडे तुकडे पडण्याच्या तयारीत आहेत. जबरानजोतधारकांचे १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून घेताच संबंधित कर्मचाऱ्यांकडून अशी माहिती देण्यात आली की, १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ८०-९० वर्षे वयाच्या व्यक्तीकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले. पण हा पुरावा गृहीत धरला जाणार नाही. असे ऐकताच जबरानजोतधारकांच्या डोळ्यात अश्रू यायला वेळ लागला नाही. जबरान जोतधारकाला तीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा म्हणून प्रतिज्ञापत्रासाठी गावपातळीवरुन तहसील पातळीवर जाण्यासाठी जबरानजोतधारक वसोबत ८०-९० वर्षे वयाच्या व्यक्तीचा येण्या-जाण्याचा वाहतूक खर्च किमान २०० रुपये सोबत स्टॅम्प पेपर १०० रुपये आणि इतर किरकोळ खर्च १०० रुपये म्हणजेच एक जबरानजोतधारकाला तीन पिढ्याचा रहिवासी पुरवा काढण्यासाठी ४०० ते ४५० रुपयांचा खर्च येतो. संबंधीत कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे एका व्यक्तीचे जवळपास ४०० ते ४५० रुपये खर्च झाले. समजा तालुक्यात पाचशे जबरान जोतधारक असतील तर त्यांचा किती खर्च झाला असेल, याचा अंदाज लावला जाऊ शकतो.ज्या जबरानजोतधारकांना कच्चे पट्टे देण्यात आले, त्यांना पक्के पट्टे देण्यात यावे. अनेक जबरानजोतधारक पक्क्या पट्ट्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची मागणी पूर्ण करून तीन पिढ्यांचा रहिवाशी पुराव्याची अट रद्द करण्यात यावी. शासकीय कायद्यानुसार पात्र असणाऱ्यांना पट्ट्याचे वितरण लवकरात लवकर करण्यात यावे, अशी जबरानजोतधारक मागणी करीत आहेत. (वार्ताहर)स्टँप पेपरवर प्रतिज्ञापत्राचा पर्यायतीन पिढ्यांचा रहिवासी पुरावा पूर्वजांच्या जन्मांच्या नोंदीपासून प्राप्त करता येतो. त्यात काही जबरानजोतधारकांच्या पूर्वजांनी जन्माच्या नोंदी केल्या नाहीत. काही जबरानजोतधारकांना पूर्वजांच्या जन्माचे ठिकाण नेमके कोठे आहे, हेसुद्धा माहिती नाही. त्यामुळे त्यांचे वारस कोणत्या आधारावर तीन पिढ्यांंचा रहिवासी पुरावा प्राप्त करावा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता त्यांनी शालेय प्रमाणपत्र, जन्मनोंद, कोतवालपंजी आदी माध्यमातून पुरावा प्राप्त करण्यास सांगितले. या कागदपत्रांपैकी कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसलेल्या जबरानजोतधारकाने गावातील ८० ते ९० वर्षांच्या व्यक्तीकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जबरानजोतधारकाला तीन पिढ्यांपासून चांगल्या प्रकारे ओळखतो, असे प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायचे आहे.