शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

बाबा आमटेंनी २५ वर्षांपूर्वीच साकारले जलशिवार

By admin | Updated: October 9, 2015 01:43 IST

घोषणाच्या दगडावर ठेचाळत जाणाऱ्या देशाला विकासाच्या राजरस्त्यावर आणायचे असेल तर तेथे नवा आचार-विचार रूजवला पाहिजे,...

१ हजार २१९ एकर शेतीचे केले नंदनवन : ८ बंधारे, २४ तलाव, १९ विहिरीराजू गेडाम मूलघोषणाच्या दगडावर ठेचाळत जाणाऱ्या देशाला विकासाच्या राजरस्त्यावर आणायचे असेल तर तेथे नवा आचार-विचार रूजवला पाहिजे, असे मत व्यक्त करणारे कुष्ठरोग्यांचे मसिहा बाबा आमटे यांनी सोमनाथ येथे नवनवीन कल्पना साकारून बारमाही शेतीचे ज्वलंत उदाहरण निर्माण केले आहे. वरूणराजाच्या अवकृपेने कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट ओढविण्याआधीच आवश्यक तेथे बंधारे बांधुन पावसाचे पाणी अडविण्याचा व तलावात बारमाही शेती करता येईल, अशी सिंचन व्यवस्था निर्माण केल्याचे सोमनाथ येथे बघायला मिळते. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जल शिवार योजना बाबा आमटे यांनी २५ वर्षापूर्वी सोमनाथ येथे साकारल्याने १ हजार २१९ एकर जमिनीत धानासोबत विविध पालेभाज्या, फळभाज्या, पशुपालन, दुग्ध व्यवसाय आदींनी परिपूर्ण झाल्याचे दिसून येते. बाबा आमटे हे सन १९६७ ला सोमनाथला आल्यानंतर शासनाने ताडोबा जंगलातील १९२४ एकर जमीन महारोगी सेवा समितीला दिली. परिसरातील शेतकऱ्यांना ५५३ एकर शेती दिल्यानंतर समितीकडे १ हजार २१९ एकर खडतर जमीन शिल्लक राहिली. जंगलातील खळतर जमीन असताना या जमिनीत परिश्रमातून नंदनवन फुलवू शकतो, हा आत्मविश्वास बाबा आमटे यांना असल्याने त्यांनी प्रयत्नातुन जे हवयं ते साकारलं. जंगलात बंधारा बांधुन पाणी अडविण्याचे व पाण्याचा स्त्रोत वाढविण्याचे काम त्यावेळी करण्यात आले. जमिनीला मृत स्वरूप देण्यासाठी आपल्या सहकार्याच्या माध्यमातून त्यांनी शेती योग्य जमीन तयार केली. त्यावेळी सोमनाथ जंगलात विविध हिरण श्वापदांचा वावर असताना देखील त्याकडे लक्ष न देता आपले अविरत काम सुरू केले. त्यामुळे खळताड जमिनीत ‘अंकुर’ फुटायला लागले. ही कल्पना बाबा आमटेनी आपल्या कल्पनेतून साकारली. पावसाचे पाणी योग्य पद्धतीने अडवले तर शेतीला बारमाही पाणी मिळू शकते हा आत्मविश्वास त्यांचा होता. सन २००९-१० मध्ये दुष्काळाचे सावट असल्याने या वर्षात ताडोबा जंगलातील मोठ्या नटराजवळ ‘स्वरानंद’ हा रंजनी कार्यक्रम मुंबई येथे आयोजित करून मिळालेल्या १७ लाख रुपयातुन टायर व सिमेंटनी पक्का बंधारा बांधला. या बंधाऱ्यातील पाणी अडल्याने खालचा तलाव, विहीरी यांचे जलस्त्रोत वाढले. या सिमेंट बंधाऱ्यामुळे पुन्हा ६ लहान बंधारे, १६ मोठे तलाव, ६ लहान तलाव, ६ पिण्याच्या पाण्याच्या विहीरी, १३ शेतीच्या विहीरी भरगच्छ भरल्या. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्याने आज सोमनाथ येथे ९०० ते १००० एकर शेतीत धान पीक घेतले जाते. जवळपास ४ हजार ५०० क्विंटल धानाचे उत्पादन घेतले जात असून बाजार भावाप्रमाणे दीड कोटीचे धानाचे उत्पादन होते. तर जवळपास २० लाखाचे भाजीपाला पीक उत्पादन केला जातो. दुध, पशुपालन, मत्स पालन आदी केल्याने दुधाची निर्मीती होत आहे. तसेच माशांचे सुद्धा उत्पादन होऊन आर्थिक भर पडल्याचे दिसून येते. आज बाबा आमटे नसले तरी डॉ. विकास आमटे यांची वेळोवेळी सोमनाथ येथे भेट होऊन संपुर्ण १ हजार २१९ एकर शेतीचा परिसर हुडकून काढतात. त्यांच्या सोबतीला सोमनाथ येथील अरुण कदम, हरिभाऊ बढे हे विशेष लक्ष घालत असल्याने सोमनाथ येथे ‘हरितक्रांती’ झाल्याचा भास होताना दिसतो. शासनाने जलयुक्त शिवार योजना या वर्षात सुरू केली असली तरी बाबा आमटे यांच्या ‘सोमनाथ’ येथे २५ वर्षापूर्वीच मुहुर्तमेढ रोवली गेली होती.