शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पाणी पुरवठा योजना आठ वर्षानंतरही अपूर्णच

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

प्रशासनाची लालफीतशाही आणि लोकांची उदासिनता या चक्रव्युहात सापडलेल्या नागभीड तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजना ...

प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता : कोट्यवधींचा खर्च व्यर्थघनश्याम नवघडे  नागभीड प्रशासनाची लालफीतशाही आणि लोकांची उदासिनता या चक्रव्युहात सापडलेल्या नागभीड तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजना गेल्या सात-आठ वर्षानंतरही अपूर्णच आहेत. या योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असला तरी या योजना अद्याप स्वत:चीच तहान भागवू शकल्या नाही, हे वास्तव आहे.नागभीड तालुक्यात मोहाळी, ब्राम्हणी, कोर्धा, मिंथूर, नवेगाव पांडव, चिंधी माल, गिरगाव, चिंधी चक, जनकापूर, मिंडाळा, कोटगाव आदी अनेक गावात या पाणी पूरवठा योजनांना शासनाकडून मंजुरी देण्यात आली. सर्वाना शुध्द आणि मुबलक पाणी मिळावे, कोणीही पाण्यापासून वंचित राहू नये, हा यामागचा उद्देश. शासनाचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असला तरी ज्यांच्या खांद्यायावर योजनेची धुरा होती, त्यांनी योजनेसंदर्भात योग्य नियोजन न केल्याने या योजना अर्धवट स्थितीत पडून आहेत.योजनेसंदर्भात उल्लेखनीय बाब अशी की, या सर्व योजनांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याच्या रुपात अर्र्धी किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम प्राप्त झाली आहे. मिळालेल्या या रकमेतून या योजनाच्या विहिरीचे, काही ठिकाणी जलकुंभाचे तर काही ठिकाणी पाईप लाईनचे काम करण्यात आले आहे. यापलिकडे हे काम पुढे सरकलेच नाही. यात उल्लेखनीय बाब अशी की या प्रत्येक योजना २५ ते ५० लाखादरम्यान आहेत. गावातील पाणीपुरवठा समितीकडे या योजनेचे काम सोपविण्यात आले होते आणि यावर देखरेख जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची होती. यात अडचणीची गोष्ट अशी की गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम सांभाळणाऱ्या समितीची निवड जरी ग्रामसभेतून होत असली तरी योजनेचे महत्व न कळणाऱ्या व योजनेसंदर्भात पुरेसे प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तीकडे ही योजना सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या योजनांवर असे दिवस आल्याचे यासंदर्भात बोलले जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)या समितीत ग्रामसभेतून निवडलेल्या व्यक्तीसोबत गावातील ग्रामपंचायतीत कार्यरत ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांचा या समितीत सचिव म्हणून समावेश करण्यात आला असता तर या अधिकाऱ्यांनी आपल्या शासकीय नोकरीची भीड राखून योजनेचे काम चोख केले असते. परिणामी आज ज्या संख्येत योजना अपूर्ण दिसत आहेत त्याची संख्या निश्चित कमी दिसली असती.यातील अनेक योजना निर्मल ग्राम योजनेच्या बळी ठरल्या आहेत. योजनेला मंजुरी देताना निर्मल ग्राम योजनेची कोणतीही अट लादण्यात येत नव्हती. मात्र योजनेचे काम सुरु झाल्यानंतर तिसऱ्या हप्त्यासाठी अर्ज केल्यानंतर आपले गाव १०० टक्के निर्मल झाले का, अशी विचारणा करुन पुढचे हप्ते नाकारण्यात येत होते. जे गाव निर्मल आहे त्याच गावांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले असते तर शासनाच्या निधीचा असा चुराळा झाला नसता.