शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, वनसंपदा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:59 IST

राज्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत. जल व वनांबद्दलची आत्मीयता प्राथमिक स्तरापासून निर्माण व्हावी, याकरिता शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात हे दोनही विषय समाविष्ठ करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपुरातून राज्यव्यापी जलसंवाद यात्रेला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत. जल व वनांबद्दलची आत्मीयता प्राथमिक स्तरापासून निर्माण व्हावी, याकरिता शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात हे दोनही विषय समाविष्ठ करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली.वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधीनी, विभागीय जलसाक्षरता केंद्राच्या कार्यशाळेत उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग, साक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे, देवाजी तोफा, मोहन हिराबाई हिरालाल, वन प्रशासन प्रबोधिनीचे संचालक अशोक खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, अधीक्षक अभियंता वेमलकुंडा, आनंद पुसावळे, कौस्तुभ आमटे, प्रशांत खाडे आदींसह महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले जलप्रेमी उपस्थित होते. महाराष्ट्राततील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल व्यवस्थापन करणे काळाची गरज बनली आहे. या अनुषंगाने नागपूर विभागात जलसंवर्धन, संरक्षण, जनजागृती याचबरोबर जल व्यवस्थापन करण्यासाठी जलयोध्दा, जलनायक, जलदूत, जनकर्मीसाठी घेतलेली कार्यशाळा प्रेरणादायी ठरणार आहे. चंद्रपुरातून जलसाक्षरतेचा संदेश देणाºया जलसंवाद यात्रेच्या जलकुंभाचे विधीवत पूजन करण्यात आले.ना. मुनगंटीवार म्हणाले, शिक्षण विभाग माझ्याकडे नसला तरी महाराष्ट्र शासनाकडून जल आणि जंगल याबाबतीत जागरूकपणे कामे केली जात आहेत. जलसमस्या निर्माण होऊ नये, याकरिता शासन कटीबद्ध असून नागरिकांची मानसिकता तयार केली जात आहे. डॉ. राजेंद्र सिंग यांनी पाणी प्रश्नासाठी दीर्घकालिन उपाययोजना सुचविल्या, याची हमखास दखल घेतल्या. जाईल. पाणी व्यवस्थापन, जलसंधारण, शाश्वत जलसाठे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस व संपूर्ण मंत्रिमंडळ अतिशय सकारात्मक आहे. जलसंवाद यात्रेतून संकटांवर मात केल्या जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. साक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ.पांडे यांनी जलसंवाद यात्रेच्या स्वरूपाची माहिती दिली. अन्य तज्ज्ञांनीही विविध पैलुंवर प्रकाश टाकला. संचालन हेमंत शेंडे यांनी केले. अप्पर संचालक प्रशांत खाडे यांनी आभार मानले.वृक्षाच्छादन वाढल्यास बरसेल पाऊस-राजेंद्र सिंगविविध पिकांचे चक्र पावसाच्या चक्राशी एकरूप करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची गरज आहे. या राज्यात वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे पावसाचे प्रमाण घटले. वृक्षाच्छादन वाढले तर पाऊस बरसेल. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती व सामाजिक संस्थांनी वृक्ष लागवडीकडे लक्ष द्यावे. महाराष्ट्रातील वृक्ष लागवड मोहिमेला सहकार्य करावे, असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केले.