शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, वनसंपदा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:59 IST

राज्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत. जल व वनांबद्दलची आत्मीयता प्राथमिक स्तरापासून निर्माण व्हावी, याकरिता शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात हे दोनही विषय समाविष्ठ करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपुरातून राज्यव्यापी जलसंवाद यात्रेला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत. जल व वनांबद्दलची आत्मीयता प्राथमिक स्तरापासून निर्माण व्हावी, याकरिता शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात हे दोनही विषय समाविष्ठ करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली.वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधीनी, विभागीय जलसाक्षरता केंद्राच्या कार्यशाळेत उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग, साक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे, देवाजी तोफा, मोहन हिराबाई हिरालाल, वन प्रशासन प्रबोधिनीचे संचालक अशोक खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, अधीक्षक अभियंता वेमलकुंडा, आनंद पुसावळे, कौस्तुभ आमटे, प्रशांत खाडे आदींसह महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले जलप्रेमी उपस्थित होते. महाराष्ट्राततील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल व्यवस्थापन करणे काळाची गरज बनली आहे. या अनुषंगाने नागपूर विभागात जलसंवर्धन, संरक्षण, जनजागृती याचबरोबर जल व्यवस्थापन करण्यासाठी जलयोध्दा, जलनायक, जलदूत, जनकर्मीसाठी घेतलेली कार्यशाळा प्रेरणादायी ठरणार आहे. चंद्रपुरातून जलसाक्षरतेचा संदेश देणाºया जलसंवाद यात्रेच्या जलकुंभाचे विधीवत पूजन करण्यात आले.ना. मुनगंटीवार म्हणाले, शिक्षण विभाग माझ्याकडे नसला तरी महाराष्ट्र शासनाकडून जल आणि जंगल याबाबतीत जागरूकपणे कामे केली जात आहेत. जलसमस्या निर्माण होऊ नये, याकरिता शासन कटीबद्ध असून नागरिकांची मानसिकता तयार केली जात आहे. डॉ. राजेंद्र सिंग यांनी पाणी प्रश्नासाठी दीर्घकालिन उपाययोजना सुचविल्या, याची हमखास दखल घेतल्या. जाईल. पाणी व्यवस्थापन, जलसंधारण, शाश्वत जलसाठे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस व संपूर्ण मंत्रिमंडळ अतिशय सकारात्मक आहे. जलसंवाद यात्रेतून संकटांवर मात केल्या जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. साक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ.पांडे यांनी जलसंवाद यात्रेच्या स्वरूपाची माहिती दिली. अन्य तज्ज्ञांनीही विविध पैलुंवर प्रकाश टाकला. संचालन हेमंत शेंडे यांनी केले. अप्पर संचालक प्रशांत खाडे यांनी आभार मानले.वृक्षाच्छादन वाढल्यास बरसेल पाऊस-राजेंद्र सिंगविविध पिकांचे चक्र पावसाच्या चक्राशी एकरूप करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची गरज आहे. या राज्यात वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे पावसाचे प्रमाण घटले. वृक्षाच्छादन वाढले तर पाऊस बरसेल. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती व सामाजिक संस्थांनी वृक्ष लागवडीकडे लक्ष द्यावे. महाराष्ट्रातील वृक्ष लागवड मोहिमेला सहकार्य करावे, असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केले.