शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

पाणी, वनसंपदा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:59 IST

राज्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत. जल व वनांबद्दलची आत्मीयता प्राथमिक स्तरापासून निर्माण व्हावी, याकरिता शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात हे दोनही विषय समाविष्ठ करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपुरातून राज्यव्यापी जलसंवाद यात्रेला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत. जल व वनांबद्दलची आत्मीयता प्राथमिक स्तरापासून निर्माण व्हावी, याकरिता शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात हे दोनही विषय समाविष्ठ करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली.वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधीनी, विभागीय जलसाक्षरता केंद्राच्या कार्यशाळेत उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग, साक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे, देवाजी तोफा, मोहन हिराबाई हिरालाल, वन प्रशासन प्रबोधिनीचे संचालक अशोक खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, अधीक्षक अभियंता वेमलकुंडा, आनंद पुसावळे, कौस्तुभ आमटे, प्रशांत खाडे आदींसह महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले जलप्रेमी उपस्थित होते. महाराष्ट्राततील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल व्यवस्थापन करणे काळाची गरज बनली आहे. या अनुषंगाने नागपूर विभागात जलसंवर्धन, संरक्षण, जनजागृती याचबरोबर जल व्यवस्थापन करण्यासाठी जलयोध्दा, जलनायक, जलदूत, जनकर्मीसाठी घेतलेली कार्यशाळा प्रेरणादायी ठरणार आहे. चंद्रपुरातून जलसाक्षरतेचा संदेश देणाºया जलसंवाद यात्रेच्या जलकुंभाचे विधीवत पूजन करण्यात आले.ना. मुनगंटीवार म्हणाले, शिक्षण विभाग माझ्याकडे नसला तरी महाराष्ट्र शासनाकडून जल आणि जंगल याबाबतीत जागरूकपणे कामे केली जात आहेत. जलसमस्या निर्माण होऊ नये, याकरिता शासन कटीबद्ध असून नागरिकांची मानसिकता तयार केली जात आहे. डॉ. राजेंद्र सिंग यांनी पाणी प्रश्नासाठी दीर्घकालिन उपाययोजना सुचविल्या, याची हमखास दखल घेतल्या. जाईल. पाणी व्यवस्थापन, जलसंधारण, शाश्वत जलसाठे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस व संपूर्ण मंत्रिमंडळ अतिशय सकारात्मक आहे. जलसंवाद यात्रेतून संकटांवर मात केल्या जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. साक्षरता केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ.पांडे यांनी जलसंवाद यात्रेच्या स्वरूपाची माहिती दिली. अन्य तज्ज्ञांनीही विविध पैलुंवर प्रकाश टाकला. संचालन हेमंत शेंडे यांनी केले. अप्पर संचालक प्रशांत खाडे यांनी आभार मानले.वृक्षाच्छादन वाढल्यास बरसेल पाऊस-राजेंद्र सिंगविविध पिकांचे चक्र पावसाच्या चक्राशी एकरूप करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची गरज आहे. या राज्यात वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे पावसाचे प्रमाण घटले. वृक्षाच्छादन वाढले तर पाऊस बरसेल. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती व सामाजिक संस्थांनी वृक्ष लागवडीकडे लक्ष द्यावे. महाराष्ट्रातील वृक्ष लागवड मोहिमेला सहकार्य करावे, असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केले.