शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

योजनांबाबत ग्रा. प. पदाधिकारी अनभिज्ञ

By admin | Updated: October 31, 2015 02:04 IST

नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. निकालही लागले, सरपंच पदावर सरपंच आरुढही झाले.

प्रोत्साहन देणे आवश्यक : पदाधिकाऱ्यांना दिले जावे प्रशिक्षणतळोधी(बा): नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. निकालही लागले, सरपंच पदावर सरपंच आरुढही झाले. यावेळच्या निवडणुकीत बहुतांश ग्रामपंचायती मध्ये जुने व नियमितपणे ग्रा.पं.मध्ये दिसणाऱ्या व्यक्तींना मतदारांनी बाजूला करीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. पण नवीन सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना शासकीय योजनांबाबत माहिती नसल्याने शासनाची ध्येय धोरणे, योजना काय, त्या कशा राबवायच्या याबाबत ते अनभिज्ञ आहेत. त्यांना सर्व गोष्टींची माहिती नसल्याने ते गावाचा विकासासाठी काहीच करू शकणार नाही. यासाठी ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.शासनाच्या विविध योजना खेड्यापर्यंत पोहचविण्याकरिता व राबविण्याकरिता प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येते. पण या प्रशिक्षणाला गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शासनाच्या विविध योजना गावागावात पोहचविणे, त्यात सहभागी होणे, शासनाच्या योजनेत उत्कृष्ठ काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी लाखो रुपयाचे पुरस्कारही दिले जातात. या सर्व बाबींचा वापर करून घेतल्यास गावाच्या विकासासह लाखो रुपयाचे पुरस्कार प्राप्त करता येवू शकतात. ते कसे मिळवायचे याचे नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंचांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. शासनाच्या योजना ग्रामसेवकाला लेखी स्वरूपात पंचायत समितीकडून देण्यात येतात. या योजनांची माहिती अनेक गावात ग्रामसभेतून दिलीच जात नसल्याचे दिसते. सरपंच, ग्राम पंचायतीनाही ही माहिती पुरविली जात नाही, मोजक्या लोकांना ही माहिती देवून हे अधिकारी मोकळे होतात, अशी अनेक उदाहरणे ग्रामीण भागात दिसून येतात. यामुळे संपूर्ण गावाचे नुकसान होते.प्रशिक्षण माहिती, जनजागृती आदी कामे कृषी कार्यालय, वनविभाग, राजस्व विभाग कागदोपत्रीच राबवित असल्याचे दिसते. यामुळे गाव विकासाबाबत सरपंचासह, सदस्य व ग्रामस्थ अनभिज्ञच असतात. परिणामी गावाचा विकास होत नाही, यासाठी ग्रामपंचायत सदस्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. याबाबत काही गावातील सरपंचासोबत संपर्क साधला असता त्यांनी प्रशिक्षणाची गरज व्यक्त केल्याने ही बाब गंभीरतेने घेणे गरजेचे झाले आहे, यावर जिल्हा प्रशासनाने विचार विनीमय करावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)गावाचा विकास साधण्यासाठी कोणत्या योजना उपयोगी पडू शकतात, कोणती धोरणे राबविली गेली पाहिजे, याबाबत नियमित प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. यामुळे गावाचा विकास करता येईल, असे मत काही सरपंचानी व्यक्त केले. ग्रामविकासात चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यातील गावांचा दौरा सरपंच, सदस्यांसाठी काढावा, अशा अभ्यास दौऱ्यांचा गावाच्या विकासासाठी लाभ होवू शकेल, अशीही काही जाणकार व्यक्तींची मते आहेत.शासनाच्या योजना लोकोपयोगी असतात, पण त्या पहिल्यांदा निवडून आलेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना माहितच नसतात. परिणामी त्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अडचणी येतात. यामुळे शासनाने अधिकाऱ्यांना सुचना देवून ग्रामीण भागात मार्गदर्शन शिबिरे घेतली तर त्याचा उपयोग ग्रामस्थांसाठी करता येवू शकेल,- होमदेव मेश्राम, माजी सरपंच, ग्रामपंचायत वनली