शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
3
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
4
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
5
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
6
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
7
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
8
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
9
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
10
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
11
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
12
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
13
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
14
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
15
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
16
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
17
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
18
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
19
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
20
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!

सहा वर्षांत ६१९ जणांचा बळी

By admin | Updated: June 10, 2017 00:28 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते प्रदूषण आज केवळ चिंतनाचाच विषय ठरलेले नाही. या विषयावर चिंतन करण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे.

रवी जवळे । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते प्रदूषण आज केवळ चिंतनाचाच विषय ठरलेले नाही. या विषयावर चिंतन करण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे. आता प्रदूषणविरोधातील कायद्याची कडक अंमलबजावणी करून प्रदूषण हद्दपार करण्याची वेळ आली आहे. या प्रदूषणाने केवळ जिल्हावासीयांचे आयुष्य काळेकुट्टच केलेले नाही तर अनेकांच्या आयुष्यालाच संपविले आहे. एप्रिल २०१० पासून आॅक्टोबर २०१६ पर्यंत तब्बल ६१९ जणांचा मृत्यू श्वसन संस्थेचे आजार, टीबी आणि त्वचा रोगामुळे झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, मागील सहा वर्षात अशा आजारांमुळे जिल्ह्यातील ६१९ जणांचा बळी गेला असला तरी अजूनही हजारोंच्या संख्येत रुग्ण अशाच आजारामुळे बाधित आहेत. चंद्रपूरचे वाढते प्रदूषण आता अगदी टोकापर्यत गेले आहे. मर्यादा केव्हाचीच ओलांडली आहे. त्यामुळे या प्रदूषणावर आळा बसविण्यात आला नाही तर जिल्ह्यातील पुढची पिढी प्रदूषणाचे दुष्परिणाम घेऊनच जन्माला येईल, हे वास्तव कुणीही नाकारू शकणार नाही. प्रदूषणामुळे श्वसन संस्थेचे आजार, टीबी, ह्दयरोग, त्वचा रोग आदींची लागण होते, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. लोकमतने या संदर्भात माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता अशा आजाराचे किती रुग्ण आहे आणि किती जणांचा मृत्यू या आजाराने झाला आहे, याची आकडेवारी हाती आली. ही आकडेवारी धक्कादायक आहे. जिल्ह्यात एप्रिल २०१० ते २०१५ पर्यंत तब्बल ४२० जणांचा मृत्यू श्वसन संस्थेचे आजार व टीबीमुळे झाला आहे. जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१५ पर्यंत १०१ जणांना या आजाराने मृत्यूच्या दाढेत ओढले. जानेवारी १०१६ ते आॅक्टोबर २०१६ पर्यंत ८७ जणांचा याच आजाराने मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रदूषणाशी निगडित आजाराने बळी जात असतानाही संबंधित शासकीय यंत्रणा अद्याप पाहिजे तशी या विषयात काही करू शकली नाही, हे जिल्हावासीयांचे दुर्दैवच.प्रदूषणामुळे श्वसन संस्थेचे अनेक आजार जडतात. दमा, ब्रायकॉयटीस, यू.आर. आय., ए.आर.आय., निमोनिया, टीबी या आजारांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यात नागरिकांना जडलेल्या या आजाराची आरोग्य विभागाची २०१३ ते आॅगस्ट २०१६ पर्यंतची आकडेवारी बघितली तर अनेकांना धक्का बसेल, अशी आहे. राजुरा तालुक्यात ६,०२९ जणांना श्वसन संस्थेशी निगडित आजाराची लागण झाली आहे. मूल तालुक्यात २५, २३५ जणांना, कोरपना तालुक्यात १,२२५ जणांना, चिमूर तालुक्यात ४४,१८७ जणांना, चंद्रपूर तालुक्यात ३४, ६२५ जणांना, बल्लारपूर तालुक्यात १४, २०३ जणांना, भद्रावती तालुक्यात १०,०५८, वरोरा तालुक्यात १८,५३४ जणांना श्वसनाशी संबंधित रोगाची लागण झाली आहे.