शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांत ६१९ जणांचा बळी

By admin | Updated: June 10, 2017 00:28 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते प्रदूषण आज केवळ चिंतनाचाच विषय ठरलेले नाही. या विषयावर चिंतन करण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे.

रवी जवळे । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते प्रदूषण आज केवळ चिंतनाचाच विषय ठरलेले नाही. या विषयावर चिंतन करण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे. आता प्रदूषणविरोधातील कायद्याची कडक अंमलबजावणी करून प्रदूषण हद्दपार करण्याची वेळ आली आहे. या प्रदूषणाने केवळ जिल्हावासीयांचे आयुष्य काळेकुट्टच केलेले नाही तर अनेकांच्या आयुष्यालाच संपविले आहे. एप्रिल २०१० पासून आॅक्टोबर २०१६ पर्यंत तब्बल ६१९ जणांचा मृत्यू श्वसन संस्थेचे आजार, टीबी आणि त्वचा रोगामुळे झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, मागील सहा वर्षात अशा आजारांमुळे जिल्ह्यातील ६१९ जणांचा बळी गेला असला तरी अजूनही हजारोंच्या संख्येत रुग्ण अशाच आजारामुळे बाधित आहेत. चंद्रपूरचे वाढते प्रदूषण आता अगदी टोकापर्यत गेले आहे. मर्यादा केव्हाचीच ओलांडली आहे. त्यामुळे या प्रदूषणावर आळा बसविण्यात आला नाही तर जिल्ह्यातील पुढची पिढी प्रदूषणाचे दुष्परिणाम घेऊनच जन्माला येईल, हे वास्तव कुणीही नाकारू शकणार नाही. प्रदूषणामुळे श्वसन संस्थेचे आजार, टीबी, ह्दयरोग, त्वचा रोग आदींची लागण होते, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. लोकमतने या संदर्भात माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता अशा आजाराचे किती रुग्ण आहे आणि किती जणांचा मृत्यू या आजाराने झाला आहे, याची आकडेवारी हाती आली. ही आकडेवारी धक्कादायक आहे. जिल्ह्यात एप्रिल २०१० ते २०१५ पर्यंत तब्बल ४२० जणांचा मृत्यू श्वसन संस्थेचे आजार व टीबीमुळे झाला आहे. जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१५ पर्यंत १०१ जणांना या आजाराने मृत्यूच्या दाढेत ओढले. जानेवारी १०१६ ते आॅक्टोबर २०१६ पर्यंत ८७ जणांचा याच आजाराने मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रदूषणाशी निगडित आजाराने बळी जात असतानाही संबंधित शासकीय यंत्रणा अद्याप पाहिजे तशी या विषयात काही करू शकली नाही, हे जिल्हावासीयांचे दुर्दैवच.प्रदूषणामुळे श्वसन संस्थेचे अनेक आजार जडतात. दमा, ब्रायकॉयटीस, यू.आर. आय., ए.आर.आय., निमोनिया, टीबी या आजारांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यात नागरिकांना जडलेल्या या आजाराची आरोग्य विभागाची २०१३ ते आॅगस्ट २०१६ पर्यंतची आकडेवारी बघितली तर अनेकांना धक्का बसेल, अशी आहे. राजुरा तालुक्यात ६,०२९ जणांना श्वसन संस्थेशी निगडित आजाराची लागण झाली आहे. मूल तालुक्यात २५, २३५ जणांना, कोरपना तालुक्यात १,२२५ जणांना, चिमूर तालुक्यात ४४,१८७ जणांना, चंद्रपूर तालुक्यात ३४, ६२५ जणांना, बल्लारपूर तालुक्यात १४, २०३ जणांना, भद्रावती तालुक्यात १०,०५८, वरोरा तालुक्यात १८,५३४ जणांना श्वसनाशी संबंधित रोगाची लागण झाली आहे.