शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

६०२ नागरिकांना साथरोगांचा विळखा

By admin | Updated: December 26, 2015 01:11 IST

ग्रामीण जनतेच्या सृदृढ आरोग्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र आजही अनेक ग्रामपंचायती स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

तिघांचा मृत्यू : चौकशी झाली मात्र कारवाई कुणावरच नाहीमंगेश भांडेकर चंद्रपूरग्रामीण जनतेच्या सृदृढ आरोग्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र आजही अनेक ग्रामपंचायती स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. याचा फटका नागरिकांना बसत असून २०१५ या वर्षभरात जिल्ह्यातील तब्बल ६०२ नागरिकांना साथरोगाने ग्रासले. यात दोघांना जीव गमवावा लागला. या प्रकरणाची आरोग्य विभागाकडून चौकशी झाली. मात्र कारवाई कुणावरही न झाल्याने दोषी कोण, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.वर्षभरात साथरोग उद्भवल्याच्या जिल्ह्यात ९ घटना घडल्या. यात तब्बल ६०२ नागरिकांना लागण झाली आणि तिघांचा मृृत्यू झाला. साथरोग उद्भवण्याला कारणे काय, दोषी कोण, याबाबत जिल्हास्तरीय अधिकारी व चौकशी पथकाने गावाला भेट देऊन चौकशी केली. मात्र या चौकशीत एकाही ठिकाणी कुणीच दोषी आढळले नाही. मग साथरोग उद्भण्याची कारणे शोधली असता, विहिरीचे दूषित पाणी, हातपंपाचे दूषित पाणी, डास घनतेत वाढ, परिसर अस्वच्छता अशी कारणे उजेडात आली. मात्र ही कारणे असण्याला जबाबदार कोण, हे मात्र तपासण्यातच आले नाही. शासन नागरिकांच्या आरोग्यावर जातीने लक्ष देऊन गावागावात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही यावर उपाय सुरू आहेत. मात्र संबधीत गावातील ग्रामपंचायत प्रशासन व तेथील कार्यरत अधिकारी यांचे जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने समस्या उद्भवत आहेत. मात्र चौकशी अधिकारी यात कुणाचाही दोष नाही, असा शेरा देऊन दोषींना पाठीशी घालतात. गावातील जलस्त्रोत व स्वच्छतेकडे लक्ष देणे हे त्या गावातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यासह कार्यरत प्रशासकीय अधिकाऱ्याचेही तेवढेच आहे. मग दोषी कुणीच कसे नाही, हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो.साथरोग रूग्णसंख्येत एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेत अचानक वाढ झाल्यास साथरोग उद्रेक म्हटले जाते. यात दैनंदिन रुग्णांमध्ये प्रामुख्याने ताप, अतिसार, खोकला इत्यादी लक्षणांचे रूग्ण जास्त प्रमाणात असतात. जलजन्य आजारांचे दैनंदिन स्वरुपातील संनियंत्रणाचे महत्त्वपूर्ण कार्य साथरोग नियंत्रण कार्यक्रमामार्फत केले जाते. मात्र या कार्यक्रमाची फारशी अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने आजार बळावले आहे. अतिसार, व्हायरल फिव्हर, डेंग्युचाही उद्रेकवर्षभरात अतिसार आजाराची १५० रूग्णांना लागण झाली. यात पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलबाधा येथे ३३ व सावली तालुक्यातील पेंढरी येथे ११७ नागरिकांना अतिसारची लागण झाली. तर किटाळी येथे ४६ जणांना व्हायरल फिवर व ब्रह्मपुरी तालुक्यातील चांदगाव येथे १३ जुलैला ७० जणांना तर मुल तालुक्यातील उश्राळा येथे २७ जुलैला १४८ जणांना डेंग्यु आजाराने ग्रासले होते. हिवतापाने दोघांचा गेला जीव १८ फेब्रुवारी २०१५ ला पोंभुर्णा तालुक्यातील घनोटी नं. २ येथे हिवतापाचा उद्रेक झाला होता. यात ५१ नागरिकांना हिवतापाने ग्रासले. यातील एकाचा मृत्यू झाला. तर १४ आॅगस्टला चिमूर तालुक्यातील वहानगाव येथे ८८ नागरिकांना लागण झाली. येथेही एकाचा मृत्यू झाला. गॅस्ट्रोची ४४ जणांना लागण११ एप्रिलला चंद्रपूर तालुक्यातील कारवा येथील आश्रमशाळेच्या ६ विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण झाली. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मात्र त्याचा मृत्यू गॅस्ट्रो आजारामुळेच झाला, हे निश्चीत झाले नाही. तर अमरपुरी येथेही १ सप्टेंबरला ३८ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली.