शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
3
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
4
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
5
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
6
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
7
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
8
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
9
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
10
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
11
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
12
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
13
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
14
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
15
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
16
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
17
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
18
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
19
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
20
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...

६०२ नागरिकांना साथरोगांचा विळखा

By admin | Updated: December 26, 2015 01:11 IST

ग्रामीण जनतेच्या सृदृढ आरोग्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र आजही अनेक ग्रामपंचायती स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

तिघांचा मृत्यू : चौकशी झाली मात्र कारवाई कुणावरच नाहीमंगेश भांडेकर चंद्रपूरग्रामीण जनतेच्या सृदृढ आरोग्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र आजही अनेक ग्रामपंचायती स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. याचा फटका नागरिकांना बसत असून २०१५ या वर्षभरात जिल्ह्यातील तब्बल ६०२ नागरिकांना साथरोगाने ग्रासले. यात दोघांना जीव गमवावा लागला. या प्रकरणाची आरोग्य विभागाकडून चौकशी झाली. मात्र कारवाई कुणावरही न झाल्याने दोषी कोण, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.वर्षभरात साथरोग उद्भवल्याच्या जिल्ह्यात ९ घटना घडल्या. यात तब्बल ६०२ नागरिकांना लागण झाली आणि तिघांचा मृृत्यू झाला. साथरोग उद्भवण्याला कारणे काय, दोषी कोण, याबाबत जिल्हास्तरीय अधिकारी व चौकशी पथकाने गावाला भेट देऊन चौकशी केली. मात्र या चौकशीत एकाही ठिकाणी कुणीच दोषी आढळले नाही. मग साथरोग उद्भण्याची कारणे शोधली असता, विहिरीचे दूषित पाणी, हातपंपाचे दूषित पाणी, डास घनतेत वाढ, परिसर अस्वच्छता अशी कारणे उजेडात आली. मात्र ही कारणे असण्याला जबाबदार कोण, हे मात्र तपासण्यातच आले नाही. शासन नागरिकांच्या आरोग्यावर जातीने लक्ष देऊन गावागावात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही यावर उपाय सुरू आहेत. मात्र संबधीत गावातील ग्रामपंचायत प्रशासन व तेथील कार्यरत अधिकारी यांचे जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने समस्या उद्भवत आहेत. मात्र चौकशी अधिकारी यात कुणाचाही दोष नाही, असा शेरा देऊन दोषींना पाठीशी घालतात. गावातील जलस्त्रोत व स्वच्छतेकडे लक्ष देणे हे त्या गावातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यासह कार्यरत प्रशासकीय अधिकाऱ्याचेही तेवढेच आहे. मग दोषी कुणीच कसे नाही, हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो.साथरोग रूग्णसंख्येत एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेत अचानक वाढ झाल्यास साथरोग उद्रेक म्हटले जाते. यात दैनंदिन रुग्णांमध्ये प्रामुख्याने ताप, अतिसार, खोकला इत्यादी लक्षणांचे रूग्ण जास्त प्रमाणात असतात. जलजन्य आजारांचे दैनंदिन स्वरुपातील संनियंत्रणाचे महत्त्वपूर्ण कार्य साथरोग नियंत्रण कार्यक्रमामार्फत केले जाते. मात्र या कार्यक्रमाची फारशी अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने आजार बळावले आहे. अतिसार, व्हायरल फिव्हर, डेंग्युचाही उद्रेकवर्षभरात अतिसार आजाराची १५० रूग्णांना लागण झाली. यात पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलबाधा येथे ३३ व सावली तालुक्यातील पेंढरी येथे ११७ नागरिकांना अतिसारची लागण झाली. तर किटाळी येथे ४६ जणांना व्हायरल फिवर व ब्रह्मपुरी तालुक्यातील चांदगाव येथे १३ जुलैला ७० जणांना तर मुल तालुक्यातील उश्राळा येथे २७ जुलैला १४८ जणांना डेंग्यु आजाराने ग्रासले होते. हिवतापाने दोघांचा गेला जीव १८ फेब्रुवारी २०१५ ला पोंभुर्णा तालुक्यातील घनोटी नं. २ येथे हिवतापाचा उद्रेक झाला होता. यात ५१ नागरिकांना हिवतापाने ग्रासले. यातील एकाचा मृत्यू झाला. तर १४ आॅगस्टला चिमूर तालुक्यातील वहानगाव येथे ८८ नागरिकांना लागण झाली. येथेही एकाचा मृत्यू झाला. गॅस्ट्रोची ४४ जणांना लागण११ एप्रिलला चंद्रपूर तालुक्यातील कारवा येथील आश्रमशाळेच्या ६ विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोची लागण झाली. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मात्र त्याचा मृत्यू गॅस्ट्रो आजारामुळेच झाला, हे निश्चीत झाले नाही. तर अमरपुरी येथेही १ सप्टेंबरला ३८ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली.