शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ग्राम बाल केंद्रांमुळे ५५४ बालके कुपोषणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:49 IST

शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालके कुपोषणापासून मुक्त व्हावेत, यासाठी राष्ट्रीय पोषण आहार अभियान अंतर्गत जिल्ह्यात ३१३ ग्राम बाल विकास केंद्रे (व्हीसीडीसी- व्हीलेज चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटर) स्थापन करण्यात आली. या केंद्रांमध्ये २०१८-१९ या वर्षातील जुन २०१८ प्रथम टप्यात ४६१ व आॅक्टोबर २०१८ च्या दुसऱ्या २५८ अशा एकून ७१९ तीव्र कुपोषीत बालकांची नोंद झाली.

ठळक मुद्दे७१९ कुपोषित बालकांची नोंद : कुपोषितांना दिल्या जात आहे ‘इएनडीएफ’ आहार व आरोग्यसेवा

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालके कुपोषणापासून मुक्त व्हावेत, यासाठी राष्ट्रीय पोषण आहार अभियान अंतर्गत जिल्ह्यात ३१३ ग्राम बाल विकास केंद्रे (व्हीसीडीसी- व्हीलेज चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटर) स्थापन करण्यात आली. या केंद्रांमध्ये २०१८-१९ या वर्षातील जुन २०१८ प्रथम टप्यात ४६१ व आॅक्टोबर २०१८ च्या दुसऱ्या २५८ अशा एकून ७१९ तीव्र कुपोषीत बालकांची नोंद झाली.महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून त्यातील ५५४ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. उर्वरित सर्वच बालकांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य व अंगणवाडी केंद्रांकडून इएनडीएफ (एनर्जी डेन्स न्युट्रीशियस फुड) हा शास्त्रीय पद्धतीने तयार केलेला विशेष आहार सुरू असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे.शून्य ते सहा वयोगटाच्या बालंकामधील खुजे, बुटकेपणा व कुपोषण कमी करणे, सहा ते ५९ महिने वयोगटातील बालक तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली व महिला रक्ताल्पतेचे प्रमाण कमी करण्यासोबतच जन्मत: कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत आयसीटी व आरटीएम (रिअल टाईम मानिटरींग) या मोहिमेची अंमलबजावणी सुरू आहे. याकरिता जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत अंगणवाडीसेविका, मदतनिस कार्यरत आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ३१३ ग्राम बाल विकास केंद्रांची भूमिका महत्त्वाची आहे.शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य विभागाकडून तपासणी केल्यानंतर सर्व आजारी नसलेल्या कुपोषित बालकांना ग्राम बाल विकास केंद्रांत भरती केल्या जाते.या बालकांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी, उपचार व संदर्भसेवा दिल्यानंतर अंगणवाडीसेविका व मदतनीसकडून देखभाल केली जाते. जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये झालेल्या तपासणीत ७१९ बालके कुपोषित आढळली.यातील दुर्धर व गंभीर आजारी ३० बालकांना व्हीसीडीसीमधून वगळून ६८९ बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात ठेवण्यात आले होते.शास्त्रीय आहार व वैद्यकीय उपचारानंतर ५५४ बालके कुपोषणमुक्त झाली. कुपोषणमुक्त न झालेल्या उर्वरित सर्व बालकांवर सीटीसी व एनआरसीमध्ये दाखल करून आहार व उपचार सुरू आहे. बाल विकास केंद्रांकडून विशेष लक्ष दिल्या जात आहेत. त्यामुळे या ही बालकेही लवकरच कुपोषणमुक्त श्रेणीवर्धन होणार आहेत.कसे ओळखावे कुपोषण ?बालकाचे वजन व वयानुसार मॅम (मॉडेरटली अंडर वेट) व सॅम (सेव्हरल अ‍ॅक्युट मॅलीन्युट्रशन) अशा दोन गटात वर्गीकरण केल्या जाते. मॅममध्ये कमी वजन व वय असणारी बालके येतात. संबंधित बालकाचे वजन वयानुसार सामान्य बालकापेक्षा कमी असल्यास चिंताजनक समजल्या जाते. ज्या बालकांचे वजन सामान्य बालकापेक्षा वय व उंचीच्या तुलनेत कमी असतात अशांना तीव्र कुपोषित गटातील बालके (सॅम) म्हटले जाते.असा असतो आहारकुपोषित बालकांना वैद्यकीय सल्ल्यानुसार अँटी बायोटीक, मायक्रोन्युट्रीएन्ट सप्लीमेंट ज्यामध्ये व्हिटॉमीन ए व झिंकचा समावेश असतो. जंतुनाशक गोळ्या व आयर्न सिरपचा नियमित पुरवठा आरोग्य केंद्रांकडून केला जातो. अंगणवाडी केंद्रातील सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील अतितीव्र कुपोषित बालकांना एएनजी डेन्स न्युट्रीशियस फुड हा आहार देण्यात येते. अंगणवाडीसेविकांना हा आहार तयार करण्याचे खास प्रशिक्षण मिळाले आहे.आदिवासी गावांमध्येच कुपोषण का?कुपोषणाची सर्वाधिक समस्या आदिवासी भागातच असल्याचे जुन व आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या तपासणीतून पुढे आले. यामध्ये राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, चिमूर, ब्रह्मपुरी, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना व जिवती तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांच्या तुलनेत भद्रावती, नागभीड, सिंदेवाही, मूल व सावली तालुक्यांची स्थिती बरी आहे. मात्र, आदिवासी गावांमध्येच कुपोषणाची समस्या का निर्माण होते, याचा जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.राष्ट्रीय पोषण आहार अभियान अंतर्गत स्थापन केलेल्या ग्राम बाल विकास केंद्रांमधून कुपोषित बालकांच्या हितासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. उत्तम उपचार व शास्त्रीय आहार देणे सुरू असल्याने जिल्ह्यातील बाल कुपोषणाची समस्या संपुष्ठात येणार आहे.-संजय जोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,महिला व बाल विकास जि. प.