शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

ग्राम बाल केंद्रांमुळे ५५४ बालके कुपोषणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:49 IST

शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालके कुपोषणापासून मुक्त व्हावेत, यासाठी राष्ट्रीय पोषण आहार अभियान अंतर्गत जिल्ह्यात ३१३ ग्राम बाल विकास केंद्रे (व्हीसीडीसी- व्हीलेज चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटर) स्थापन करण्यात आली. या केंद्रांमध्ये २०१८-१९ या वर्षातील जुन २०१८ प्रथम टप्यात ४६१ व आॅक्टोबर २०१८ च्या दुसऱ्या २५८ अशा एकून ७१९ तीव्र कुपोषीत बालकांची नोंद झाली.

ठळक मुद्दे७१९ कुपोषित बालकांची नोंद : कुपोषितांना दिल्या जात आहे ‘इएनडीएफ’ आहार व आरोग्यसेवा

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालके कुपोषणापासून मुक्त व्हावेत, यासाठी राष्ट्रीय पोषण आहार अभियान अंतर्गत जिल्ह्यात ३१३ ग्राम बाल विकास केंद्रे (व्हीसीडीसी- व्हीलेज चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटर) स्थापन करण्यात आली. या केंद्रांमध्ये २०१८-१९ या वर्षातील जुन २०१८ प्रथम टप्यात ४६१ व आॅक्टोबर २०१८ च्या दुसऱ्या २५८ अशा एकून ७१९ तीव्र कुपोषीत बालकांची नोंद झाली.महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून त्यातील ५५४ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. उर्वरित सर्वच बालकांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य व अंगणवाडी केंद्रांकडून इएनडीएफ (एनर्जी डेन्स न्युट्रीशियस फुड) हा शास्त्रीय पद्धतीने तयार केलेला विशेष आहार सुरू असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे.शून्य ते सहा वयोगटाच्या बालंकामधील खुजे, बुटकेपणा व कुपोषण कमी करणे, सहा ते ५९ महिने वयोगटातील बालक तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली व महिला रक्ताल्पतेचे प्रमाण कमी करण्यासोबतच जन्मत: कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत आयसीटी व आरटीएम (रिअल टाईम मानिटरींग) या मोहिमेची अंमलबजावणी सुरू आहे. याकरिता जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत अंगणवाडीसेविका, मदतनिस कार्यरत आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ३१३ ग्राम बाल विकास केंद्रांची भूमिका महत्त्वाची आहे.शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य विभागाकडून तपासणी केल्यानंतर सर्व आजारी नसलेल्या कुपोषित बालकांना ग्राम बाल विकास केंद्रांत भरती केल्या जाते.या बालकांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी, उपचार व संदर्भसेवा दिल्यानंतर अंगणवाडीसेविका व मदतनीसकडून देखभाल केली जाते. जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये झालेल्या तपासणीत ७१९ बालके कुपोषित आढळली.यातील दुर्धर व गंभीर आजारी ३० बालकांना व्हीसीडीसीमधून वगळून ६८९ बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात ठेवण्यात आले होते.शास्त्रीय आहार व वैद्यकीय उपचारानंतर ५५४ बालके कुपोषणमुक्त झाली. कुपोषणमुक्त न झालेल्या उर्वरित सर्व बालकांवर सीटीसी व एनआरसीमध्ये दाखल करून आहार व उपचार सुरू आहे. बाल विकास केंद्रांकडून विशेष लक्ष दिल्या जात आहेत. त्यामुळे या ही बालकेही लवकरच कुपोषणमुक्त श्रेणीवर्धन होणार आहेत.कसे ओळखावे कुपोषण ?बालकाचे वजन व वयानुसार मॅम (मॉडेरटली अंडर वेट) व सॅम (सेव्हरल अ‍ॅक्युट मॅलीन्युट्रशन) अशा दोन गटात वर्गीकरण केल्या जाते. मॅममध्ये कमी वजन व वय असणारी बालके येतात. संबंधित बालकाचे वजन वयानुसार सामान्य बालकापेक्षा कमी असल्यास चिंताजनक समजल्या जाते. ज्या बालकांचे वजन सामान्य बालकापेक्षा वय व उंचीच्या तुलनेत कमी असतात अशांना तीव्र कुपोषित गटातील बालके (सॅम) म्हटले जाते.असा असतो आहारकुपोषित बालकांना वैद्यकीय सल्ल्यानुसार अँटी बायोटीक, मायक्रोन्युट्रीएन्ट सप्लीमेंट ज्यामध्ये व्हिटॉमीन ए व झिंकचा समावेश असतो. जंतुनाशक गोळ्या व आयर्न सिरपचा नियमित पुरवठा आरोग्य केंद्रांकडून केला जातो. अंगणवाडी केंद्रातील सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील अतितीव्र कुपोषित बालकांना एएनजी डेन्स न्युट्रीशियस फुड हा आहार देण्यात येते. अंगणवाडीसेविकांना हा आहार तयार करण्याचे खास प्रशिक्षण मिळाले आहे.आदिवासी गावांमध्येच कुपोषण का?कुपोषणाची सर्वाधिक समस्या आदिवासी भागातच असल्याचे जुन व आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या तपासणीतून पुढे आले. यामध्ये राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, चिमूर, ब्रह्मपुरी, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना व जिवती तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांच्या तुलनेत भद्रावती, नागभीड, सिंदेवाही, मूल व सावली तालुक्यांची स्थिती बरी आहे. मात्र, आदिवासी गावांमध्येच कुपोषणाची समस्या का निर्माण होते, याचा जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.राष्ट्रीय पोषण आहार अभियान अंतर्गत स्थापन केलेल्या ग्राम बाल विकास केंद्रांमधून कुपोषित बालकांच्या हितासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. उत्तम उपचार व शास्त्रीय आहार देणे सुरू असल्याने जिल्ह्यातील बाल कुपोषणाची समस्या संपुष्ठात येणार आहे.-संजय जोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,महिला व बाल विकास जि. प.