शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के कापूस घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

दोन्ही तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी असल्याने सर्वच जिनिंगवर सीसीआयकडून कापूस खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत आहे. पीक कर्ज फेडून नवीन कर्ज घेण्यासाठी बँकांसमोर गर्दी करू लागला. परंतु, लॉकडावूनचा गैरफायदा व्यापारी घेत आहेत.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाच्या आदेशाला ठेंगा : खरेदीअभावी शेतकऱ्यांची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कापूस खरेदीची कोंडी दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात जिनिंग मालक व व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. शेतकऱ्यांची अडवणूक न करता जादा गाड्यातील कापूस खरेदीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, या आदेशाला ठेंगा दाखविल्याने राजुरा, कोरपना, चंद्रपूर, भद्रावती व वरोरा तालुक्यातील ५० टक्के शेतकºयांचा कापूस खरेदीअभावी घरातच पडून असल्याचे चित्र आहे.राजुरा कोरपना तालुक्यात शासनाने केवळ ४ केंद्रावर कापसाची नाममात्र खरेदी सुरू आहे. सीसीआयमार्फत कापूस खरेदी करण्यासाठी राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ८ हजार तर कोरपना बाजार समितीकडे ७ हजार ५०० पेक्षा अधिक कापूस गाड्यांची नोंदणी शेतकऱ्यांनी केली आहे. दोन्ही तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी असल्याने सर्वच जिनिंगवर सीसीआयकडून कापूस खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत आहे. पीक कर्ज फेडून नवीन कर्ज घेण्यासाठी बँकांसमोर गर्दी करू लागला. परंतु, लॉकडावूनचा गैरफायदा व्यापारी घेत आहेत. कापूस खरेदीवर शासनाचे नियंत्रण नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या व्यापाऱ्यांवर चौकशी करून गुन्हे दाखल करावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा चंद्रपुरातील ज्येष्ठ विधीतज्ञ अ‍ॅड. पुरूषोत्तम सातपुते, माजी आमदार सुदर्शन निमकर, सुधाकर गोरे, ज्ञानेश्वर बेरड, काशीनाथ गोरे व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आदींनी मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दिला होता. परंतु, त्यानंतरही जिल्ह्यातील कापूस खरेदीला वेग आला नाही. शेकडो शेतकरी केंद्रासमोर ताटकळत असून वाहनभाडे व अन्य खर्चाचा भुर्दंड बसणार आहे.पैशाअभावी खरीप हंगाम संकटातपाऊस सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांचा कापूस विकला जाणे अत्यावश्यक आहे. खरीप हंगामासाठी बियाणे व खते विकत घेण्याकरिता कापशी पिकाचाच मोठा आधार असतो. परंतु, सीसीआयच्या खरेदीला वेग नाही. कापूस विकला नाही तर हंगाम कसा करणार, याची शेतकऱ्यांना चिंता आहे.सीसीआयची तालुकानिहाय खरेदीराजुरा येथील केंद्रावर ७ हजार ८०० शेतकºयांनी नोंदणी केली. सीसीआयने फक्त २५२ गाड्यांतील कापूस खरेदी केला. कोरपना येथील उत्पन्न बाजार समितीत ७ हजार ६३८ नोंदणी केल्यानंतर ५४५ गाड्या, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३ हजार ९६७ शेतकऱ्यांची नोंदणी व खरेदी १७० गाड्या, भद्रावती कृषी बाजार समितीत २ हजार ८५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर आतापर्यंत ४२० गाड्यांतील कापूस सीसीआयने खरेदी केला आहे.

टॅग्स :cottonकापूस