शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

५० टक्के कापूस घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

दोन्ही तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी असल्याने सर्वच जिनिंगवर सीसीआयकडून कापूस खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत आहे. पीक कर्ज फेडून नवीन कर्ज घेण्यासाठी बँकांसमोर गर्दी करू लागला. परंतु, लॉकडावूनचा गैरफायदा व्यापारी घेत आहेत.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाच्या आदेशाला ठेंगा : खरेदीअभावी शेतकऱ्यांची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कापूस खरेदीची कोंडी दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात जिनिंग मालक व व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. शेतकऱ्यांची अडवणूक न करता जादा गाड्यातील कापूस खरेदीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, या आदेशाला ठेंगा दाखविल्याने राजुरा, कोरपना, चंद्रपूर, भद्रावती व वरोरा तालुक्यातील ५० टक्के शेतकºयांचा कापूस खरेदीअभावी घरातच पडून असल्याचे चित्र आहे.राजुरा कोरपना तालुक्यात शासनाने केवळ ४ केंद्रावर कापसाची नाममात्र खरेदी सुरू आहे. सीसीआयमार्फत कापूस खरेदी करण्यासाठी राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ८ हजार तर कोरपना बाजार समितीकडे ७ हजार ५०० पेक्षा अधिक कापूस गाड्यांची नोंदणी शेतकऱ्यांनी केली आहे. दोन्ही तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी असल्याने सर्वच जिनिंगवर सीसीआयकडून कापूस खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत आहे. पीक कर्ज फेडून नवीन कर्ज घेण्यासाठी बँकांसमोर गर्दी करू लागला. परंतु, लॉकडावूनचा गैरफायदा व्यापारी घेत आहेत. कापूस खरेदीवर शासनाचे नियंत्रण नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या व्यापाऱ्यांवर चौकशी करून गुन्हे दाखल करावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा चंद्रपुरातील ज्येष्ठ विधीतज्ञ अ‍ॅड. पुरूषोत्तम सातपुते, माजी आमदार सुदर्शन निमकर, सुधाकर गोरे, ज्ञानेश्वर बेरड, काशीनाथ गोरे व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आदींनी मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दिला होता. परंतु, त्यानंतरही जिल्ह्यातील कापूस खरेदीला वेग आला नाही. शेकडो शेतकरी केंद्रासमोर ताटकळत असून वाहनभाडे व अन्य खर्चाचा भुर्दंड बसणार आहे.पैशाअभावी खरीप हंगाम संकटातपाऊस सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांचा कापूस विकला जाणे अत्यावश्यक आहे. खरीप हंगामासाठी बियाणे व खते विकत घेण्याकरिता कापशी पिकाचाच मोठा आधार असतो. परंतु, सीसीआयच्या खरेदीला वेग नाही. कापूस विकला नाही तर हंगाम कसा करणार, याची शेतकऱ्यांना चिंता आहे.सीसीआयची तालुकानिहाय खरेदीराजुरा येथील केंद्रावर ७ हजार ८०० शेतकºयांनी नोंदणी केली. सीसीआयने फक्त २५२ गाड्यांतील कापूस खरेदी केला. कोरपना येथील उत्पन्न बाजार समितीत ७ हजार ६३८ नोंदणी केल्यानंतर ५४५ गाड्या, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३ हजार ९६७ शेतकऱ्यांची नोंदणी व खरेदी १७० गाड्या, भद्रावती कृषी बाजार समितीत २ हजार ८५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर आतापर्यंत ४२० गाड्यांतील कापूस सीसीआयने खरेदी केला आहे.

टॅग्स :cottonकापूस