शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

शाळा, शिक्षक न बघताच २८ हजारावर विद्यार्थी दुसऱ्या वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मार्च २०२० मध्ये लाॅकडाऊन केले. त्यामुळे पहिली ते ...

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मार्च २०२० मध्ये लाॅकडाऊन केले. त्यामुळे पहिली ते नवव्या वर्गापर्यंतचे विद्यार्थी परीक्षा न देताच पास झाले. दरम्यान, पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या २८ हजार ८२४ विद्यार्थ्यांनी तर ना शाळा बघितली, ना शिक्षक एवढेच नाही तर वर्गमित्रही नाही. असे असले तरी ते आता दुसऱ्या वर्गात जाणार आहे. शैक्षणिक वर्षातील पहिली पायरीच यामुळे डगमगली असून त्यांचे शैक्षणिक नुकसान कसे भरून निघणार, याची चिंता आता पालकांना सतावत आहे.

कोरोनामुळे प्रत्येकांच्या आयुष्यात वेगळे वळण आले आहे. परिणामी वेगळ्या अनुभवांनाही सामोरे जावे लागत आहे. कधी नव्हे ते यावर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम करावा लागला. यामध्ये पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना साधी शब्दांची ओळखही नसतानाही ऑनलाईन अभ्यासक्रमांत गुंतावे लागले. शाळा, वर्गमित्र, शिक्षक यातून बाराखडी, अक्षरांची ओळख, शाळेचे वातावरण या सर्वांपासून पहिल्या वर्गातील विद्यार्थी यावर्षी मुकले. एकही दिवस शाळेत न जाता आता ते दुसऱ्या वर्गात जाणार आहे. जिल्ह्यात मागील वर्षी २८ हजार ८२४ विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. यातीच आरटीई अंतर्गत सर्वच्या सर्व विद्यार्थी परीक्षा न देताच पास होणार आहे. मात्र यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, शहरी भागातील काही पालकांनी विद्यार्थ्याचा अभ्यास घेतला असला तरी ग्रामीण विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या वर्गातील शैक्षणिक पाया मजबूत न झाल्यामुळे पुढील वर्गातील अभ्यासक्रम ते पूर्ण कसे करतील, अशी चिंता आता पालकांना लागली आहे.

बाॅक्स

अक्षरओळख नाही

इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांकडून शिक्षकांनी ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना अक्षराची ओळख करून घेतली. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनीही मोठे प्रयत्न केले. मात्र ग्रामीण भागात ऑनलाईन प्रयोग फारसा उपयोगी पडला नाही. परिणामी विद्यार्थ्यांना अक्षरओळखही झाली नाही. अशावेळी ते दुसऱ्या वर्गात जाणार आहे.

बाॅक्स

शिक्षकांना होणार त्रास

अभ्यासक्रम पूर्ण न करताच दुसऱ्या वर्गात विद्यार्थी गेले आहे. त्यामुळे दुसऱ्या वर्गाचा अभ्यासक्रम सुरु झाल्यास या विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवतील कसे हा प्रश्न आहे. या शिक्षकांना प्रथम पहिल्या वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच दुसऱ्या वर्गाचा अभ्यासक्रम सुरु करावा लागणार आहे. यासाठी शिक्षकांना अतिरिक्त त्रास सहन करावा लागणार आहे.

बाॅक्स

पहिल्या वर्गातील मजाच वेगळी

पहिल्या वर्गात विद्यार्थ्यांना टाकल्यानंतर काही विद्यार्थी खुशीखुशीने शाळेत जातात. मात्र काहींना सवयच नसते. शाळेच्या पहिल्या दिवसामध्ये आईवडिलांना घट्ट पकडून असतात. रडतात, एवढेच नाही तर काही जण वर्गातच डुलकीही घेतात. छोट्या-छोड्या गमती-जमती शिक्षकांकडून सांगितल्या जातात. नवीन स्कूल ड्रेस, नवीन पुस्तक, दप्तर या सर्वाना हे विद्यार्थी मुकले आहे.