शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या १३ जागा रिक्त

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

बाल्यावस्था हा मुलांच्या वाढीच्या व विकासाच्या टप्प्यातील अत्यंत महत्वाचा कालावधी आहे.

बालकांचा सर्वांगीण विकास साधणार कसा : महिला व बाल विकास विभागाकडून शासनाच्या उद्देशाला हरताळनितीन मुसळे सास्तीबाल्यावस्था हा मुलांच्या वाढीच्या व विकासाच्या टप्प्यातील अत्यंत महत्वाचा कालावधी आहे. जन्माला येण्यापूर्वी तसेच जन्मल्यानंतर बालकांना पुरेशा सेवा देण्याचे राष्ट्रीय धोरण आपल्या देशाने स्विकारले आहे. या धोरणानुसारच एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राबविला जात असून त्याअंतर्गत बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी आरोग्य, आहार व शिक्षण देण्याचे काम केले जाते. परंतु हा प्रकल्प चालविण्यासाठी जिल्ह्यात असलेल्या १५ बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांपैकी १३ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील बालकांचा सर्वांगिण विकास नेमका कसा साधला जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.बाल्यावस्था हा मुलांच्या वाढीच्या व विकासाच्या टप्प्यातील अत्यंत महत्वाचा कालावधी आहे. जन्माला येण्यापूर्वी तसेच जन्मल्यानंतर बालकांना पुरेशा सेवा देण्याचे राष्ट्रीय धोरण आपल्या देशाने स्विकारले आहे. या धोरणानुसारच २ आॅक्टोबर १९७५ साली प्रायोगिक तत्वावर एकात्मिक बाल विकास सेवा योजना मुलांचे सर्वांगिण विकासासाठी म्हणून आरोग्य, आहार व शिक्षण एकत्रितपणे देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली. गरीब कुटुंबातील महिला आणि मुले यांच्यासाठीचा आणि तळागळापर्यंत पोहचलेल्या राज्यभरातील जवळपास ८८ हजार २७२ अंगणवाडी केंद्र असणाऱ्या ग्रामीण भागात ३६४ प्रकल्प, ८५ आदिवासी प्रकल्प व १०४ शहरी प्रकल्प असणारा सर्वात मोठा कार्यक्रम आहे. महिला व बालकांच्या सक्षमिकरणासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सामान्य प्रशासन विभागाच्या २४ जून १९९३ च्या शासन निर्णयाप्रमाणे महिला व बाल कल्याण विभाग निर्माण करण्यात आला. त्याअंतर्गत या प्रकल्पाचे कार्य सुरू करण्यात आले.या कार्यक्रमाअंतर्गत पूरक पोषण आहार, लसिकरण, आरोग्य तपासणी, आरोग्य आणि सकस आहाराविषयी शिक्षण, अनौपचारीक शालेय पूर्व शिक्षण या महत्त्वाच्या सेवा दिल्या जातात. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या उद्देशामध्ये प्रामुख्याने ० ते ६ वयोगटातील मुलांच्या पोषण व आरोग्याचा दर्जा सुधारणे, बालमृत्यू, बालआरोग्य, कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, बालकांना लसिकरण, गरोदर माता व स्तनदा मातांची तपासणी व आहार विषयक शिक्षण देणे यासारखे अनेक उद्देश पुढे ठेवून शासनाने कार्य सुरू केले आहे. परंतु प्रकल्पातील रिक्त पदांमुळे मात्र शासनाच्या उद्देशावर विरजण पडत असल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यातील १५ पैकी १३ बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या रिक्त पदावरून दिसून येत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत एकूण १५ एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालये आहेत. या १५ प्रकल्पाअंतर्गत एकूण २ हजार ५६५ आंगणवाड्या व ११९ मिनी आंगणवाड्या मंजूर असून कार्यरत आहेत फक्त २ मिनी अंगणवाड्या कार्यरत नाहीत. या संपूर्ण आंगणवाड्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी १५ बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे पदे मंजूर आहेत. परंतु जिल्ह्यातील केवळ चिमूर व ब्रह्मपुरी प्रकल्प वगळता इतर सर्व १३ प्रकल्पात बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. या सर्व अधिकाऱ्यांचा कार्यभार मात्र प्रकल्पातील काही पर्यवेक्षिकांवर दिल्या गेला आहे. यातही अनेक पर्यवेक्षिकेचेही पद रिक्त आहेत. त्यामुळे पर्यवेक्षिकाकडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील व इतर क्षेत्रातीलही अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य असून प्रकल्प कार्यालयाचेही काम आल्याने आवश्यक त्या पद्धतीने अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे बालकांच्या सर्वांगिण विकासाचे उद्देश ठेवून सुरू केलेले शासनाच्या कार्यावर मात्र विरजन पडत असल्याचे दिसून येत आहे. या बालकांचा सर्वांगिण विकास नेमका कसा साधणार, असा सवाल केला जात आहे. शासन मोठ-मोठी उद्दीष्टे डोळ्यासमोर ठेवून कार्य सुरू करते. परंतू त्यांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने मात्र या उद्दीष्टांवर मात्र नेहमीच विरजन पडत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महत्त्वाच्या योजनांची योग्य अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.