शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

पीक कर्जाच्या नावावर हडप केलेली रक्कम वसूल करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:31 IST

चिखली : अनुराधा नागरी सहकारी बँकेने, पीक कर्जाच्या नावावर राज्य व केंद्र शासनाकडून कर्ज माफीची कोट्यवधी रुपयांची रक्कम घेतली; ...

चिखली : अनुराधा नागरी सहकारी बँकेने, पीक कर्जाच्या नावावर राज्य व केंद्र शासनाकडून कर्ज माफीची कोट्यवधी रुपयांची रक्कम घेतली; परंतु मिळालेली रक्कम शेतकऱ्यांना न देता स्वत:च हडप केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत महिला व बाल विकास मंत्री ना.यशोमती ठाकूर यांना चिखली येथे निवेदन देऊन हडप केलेली रक्कम वसूल करावी व या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

ना.यशोमती ठाकूर २३ जानेवारी रोजी चिखली दौऱ्यावर असताना काही शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात चिखली पंचक्रोशीतील अनेक शेतकऱ्यांनी अनुराधा नागरी सहकारी बँकेकडून २००६ ते २००८ दरम्यान कर्ज घेतले आहे. कर्जाची नियमित परतफेडदेखील शेतकऱ्यांनी केली होती; परंतु शेतकऱ्यांचे कर्ज थकीत नसताना अनुराधा नागरी सहकारी बँकेने खोटे रेकॉर्ड दाखवून केंद्र शासन, राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपये कर्जमाफीचे मिळवले. ही रक्कम शेतकऱ्यांच्या नावावर मिळाली असल्याने, ती शेतकऱ्यांना परत देणे गरजेचे होते; मात्र अनुराधा बँकेच्या व्यवस्थापनाने रक्कम परस्पर लाटली व शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप करण्यात आला आहे. ना.ठाकूर सद्यस्थितीत काँगेसच्या कार्याध्यक्ष आहेत. बुलडाणा जिल्ह्याच्या संपर्कमंत्री असल्याने अनुराधा नागरी सहकारी बँकेचे सर्वेसर्वा राहुल बोंद्रे यांनी कर्जमाफीचे पैसे न दिल्यामुळे शेतकरी बांधवावर अन्याय होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी ना.ठाकूर यांच्याकडे केली. निवेदनावर रमेश अकाळ, अनमोल ढोरे, पांडुरंग मुरकुटे, प्रकाश ढोरे, अशोक अकाळ, राजू अकाळ, विष्णू मुरकुटे, दत्तात्रय ढोरे, अशोक ढोरे, देवीदास मुरकुटे, हरिभाऊ गवई, भगवान ढोरे, पंढरी गोंधळे, अनिल अकाळ या शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.