शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांना कोरड

By admin | Updated: July 7, 2015 00:06 IST

वाढत्या तापमानाचा परिणामामुळे बुलडाणा जिल्ह्यातील ७४ लघुप्रकल्पांमध्ये ९.१३ टक्केच जलसाठा.

बुलडाणा : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र चिंताग्रस्त वातावरण आहे. पावसाळा सुरू होऊन ३५ दिवस झाले असले तरी आतापर्यंत सरासरी एक आठवडा पाऊस झाला. त्यानंतर २0 जूनपासून १५ दिवसांत पावसाचा खंड आहे. त्याच्या परिणामी जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम प्रकल्प व ७४ लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा हा वाढत्या तापमानामुळे कमी होत आहे. जिल्ह्यात मान्सूनचा पहिला पाऊस १३ जून रोजी पडला. त्यानंतर कमी-जास्त प्रमाणात आठवडाभर पाऊस कोसळला. २0 जूननंतर आतापर्यंत पावसाने दडी मारली आहे. १३ जूननंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठय़ात नगण्य वाढ झाली. ही वाढ तेवढय़ाच झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तीन मोठय़ा प्रकल्पांमध्ये एका महिन्यापूर्वी २३.१६ टक्के जलसाठा होता. आता ३२.९९ टक्के जलसाठा आहे. पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पांमध्ये एका महिन्यापूर्वी २0.५२ टक्के जलसाठा होता. आता २४.४४ टक्के जलसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यात ७४ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये एका महिन्यापूर्वी ७.९१ टक्के जलसाठा होता. आता ९.१३ टक्के जलसाठा झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात या पाणीसाठय़ाची जी स्थिती होती, त्यात नगण्य वाढ झाली आहे. तथापि, तापमान कमी झालेले नसल्याने व पावसाचा खंड वाढल्यास या प्रकल्पातील पाणीसाठा तळ गाठण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उपयुक्त ६९.३२ दलघमी साठय़ाच्या तुलनेत १६.२४ दलघमी जलसाठा आहे. ही टक्केवारी २३.४३ आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी साठय़ाच्या तुलनेत १४.0६ दलघमी जलसाठा आहे. ही २३.६0 टक्केवारी आहे. खडकपूर्णा प्रकल्पात ५0.0३ दलघमी जलसाठा आहे. ही ४३.६४ टक्केवारी आहे. पावसाने दडी मारल्याने व तापमानामुळे हा जलसाठा कमी-कमी होत आहे.

*चक्रीवादळामुळे मान्सूनला धोका

       प्रशांत महासागरात निर्माण होणारी चक्रीवादळे मान्सूनला मोठा धोका निर्माण करीत आहेत. सध्या प्रशांत महासागरात मोठय़ा प्रमाणावर उलथापालथ होत आहे. या ठिकाणी टेन नावाचे वादळ आणि चान होम नावाचे चक्रीवादळ सक्रिय आहे. यामुळे भारतीय मान्सून माघारला आहे. ह्यचानहोमच्याच नंतर नांगका हे वादळ सक्रिय आहे. ही वादळे भारतीय उपखंडातील वार्‍याची दिशा व लयबद्धतेमुळे विस्कळीतपणा निर्माण करतात. त्यामुळे नैऋत्य मान्सून कमजोर झाला असल्याचे दिसते.

*जिल्ह्यात पावसाची सद्यस्थिती

         जिल्ह्यात १ जून ते ६ जुलै दरम्यान १८१.0 मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना १६0.0 मि.मी. पाऊस पडला आहे. ही सरासरी ६४.0८ टक्के आहे. मागील वर्षी याच कालावधीत २७.८ मि.मी. पाऊस पडला होता.