शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मोबाइलने मेमरी घालविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST

मोबाइलमुळे आपल्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला आहे. जे मोबाइल वापरत नाहीत त्यांची मेमरी चांगली आहे. कारण आपण मेंदूला त्रास देत ...

मोबाइलमुळे आपल्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला आहे. जे मोबाइल वापरत नाहीत त्यांची मेमरी चांगली आहे. कारण आपण मेंदूला त्रास देत नाही, स्मरणशक्तीचा वापर करत नाही. त्याचे भविष्यात खूप वाईट परिणाम होऊ शकतात. वेळीच मुलांनी, पाल्यांनी सुधारायला हवं. लॉकडाऊन काळात तर मोबाइलचा वापर खूप वाढला आहे, आबालवृद्ध त्यावर व्यस्त असल्याचे आढळून येते. हे योग्य नसून याचे गंभीर पडसाद नजीकच्या काळात दिसतील, अशी भीती मानसोपचार तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

हे टाळण्यासाठी

-एक दिवस संपूर्ण कुटुंबाने मोबाइल, टीव्ही, संगणक, टॅब अशी कोणतीही स्क्रीन पाहणे टाळायचे. त्याला मोबाइल फास्ट असे नाव द्यायचे.

-झोपण्याच्या ठिकाणी मोबाइल घेऊन जाऊ नये. पुरेशी झोप घ्यायलाच हवी.

-मेमरी गेम म्हणजे बुद्धिबळ, कॅरम, स्मरणशक्तीचे खेळ प्रत्यक्ष खेळणे. मोबाइलवरील गेम नव्हे.

-पाठांतर करणे, स्तोत्र, मंत्र म्हणणे, कविता, भाषण, संवाद कला जोपासणे.

-चिंतन, मनन करणे, प्राणायाम, योग, व्यायाम करणे.

मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळे घरातील संवाद कमी झाला असून हे धोकादायक आहे. त्यात ऑनलाइन संस्कृती अधिक वाट लावत आहे. वेळीच कुटुंबाने मोबाइल फास्ट ही संकल्पना राबवावी. एक दिवस कोणतीही स्क्रीन बघायची नाही. केवळ बुद्धीचा वापर करून कार्यरत राहायचे, जेणेकरून त्या सगळ्या यंत्रणावर (ॲडिक्ट) अवलंबून राहणे कमी होईल. बुद्धिकौशल्य पणाला लावणाऱ्या खेळांना प्राधान्य देणे, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बुद्धीचा वापर करणे. योग्य झोप, व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.

- डॉ. विश्वास खर्चे, मानसोपचारतज्ज्ञ

असे का होते?

विचार करण्याची प्रक्रिया न करणे

आठवणी, स्मरणशक्ती याकडे दुर्लक्ष

पाढे पाठ न करता कॅल्क्युलेटर वापरणे.

कोणत्याही गोष्टीत थेट सोपी पद्धत वापरणे.

बुद्धीचा वापर न करता शॉर्टकटकडे कल

अस्थिरता, अस्वस्थता वाढणे.