शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

खामगाव तालुक्यातील २१ गावांचा नागरिकांचा पाणीप्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 15:46 IST

मन प्रकल्पात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल ५६ टक्के जलसाठा झाला आहे.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील मन प्रकल्पात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल ५६ टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या २१ गावातील नागरिकांचा पाणीप्रश्न मिटला आहे.खामगाव तालुक्यातील शिर्ला परिसतील मन प्रकल्पावरून २१ गाव पाणीपूरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परसिरातील लाखनवाडा, आंबेटाकळी, शिर्ला, कंचनपूर, बोथा, बोरी, अडगाव, आसा, दूधा, चिंचपूर, फतेपूर, गवंढाळा, उमरा, अटाळी, कदमापूर, घारोड, आकोली, जयराम गड, पेडका, शहापूर अशा २१ गावांना पाणीपूरवठा करण्यात येतो. गतवर्षी सुरूवातीपासूनच अतिशय कमी पाऊस झाला. परिणामी नदी-नाल्यांना पूर गेले नाहीत. खरीपाचा हंगाम धोक्यात येण्याबरोबरच पिण्याचे पाण्याचे दर्भिक्ष्यही जाणवले. प्रत्येक गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. मन प्रकल्पाअंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या २१ गावांची पाणी परिस्थिीतीही गतवर्षी अत्यंत बिकट बनली होती. परिसरात दुसरे कोणतेही पाण्याचे मोठे स्त्रोत उपलब्ध नसल्याने या योजनेच्या भरवश्यावरच या परिसरातील नागरीकांची तहान आहे.परंतु यावर्षी सुरूवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने सध्याच ५६ टक्के जलसाठा झाला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी संपुर्ण पावसाळा संपुनही प्रकल्पात केवळ ३० टक्केच जलसाठा झाला होता. त्यामानाने यावर्षी सध्याच दुप्पट जलसाठा उपलब्ध झाला आहे.परिणामी येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती नाही. परिसरातील नागरीकांना यावर्षी भरपूर पाण उपलब्ध राहणार आहे. वास्तविक पाहता, केवळ साडेसहा टक्के जलसाठ्याच्या भरवश्यावरच परिसरातील नागरिकांची तहान भागते. त्यामानाने यावर्षी प्रचंड जलसाठा झाल्याने पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाचा प्रश्नही मिटला आहे.

सिंचनासाठी उपलब्ध होणार पाणी!मन प्रकल्पावर २१ गावांची तहान अवलंबून असल्यामुळे या प्रकल्पातून एरव्ही सिंचनासाठी देण्यात येणारे पाणी गतवर्षी बंद करण्यात आले होते. त्यामुळे रब्बीचे पिक घेणाऱ्यांना शेतकऱ्यांना पिक वाचविताना कसरत करावी लागली होती. परंतु यावर्षी दमदार पाऊस पडल्याने प्रकल्पात भरपूर पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे येणाºया रब्बी हंगामासाठी शेतकºयांना प्रकल्पातून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावर्षी निसर्गाने कृपा केल्याने सध्याच प्रकल्पात ५६ टक्के जलसाठा झाला आहे. आणखी पावसाळा बाकी असल्याने जलसाठयात वाढच होईल. पिण्याच्या पाण्यासोबत सिंचनाचाही प्रश्न मिटणार आहे.-चंद्रशेखर देशमुखशाखा अधिकारी, सिचंन शाखा शिर्ला.

टॅग्स :khamgaonखामगावDamधरण