शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

ज्वारीचा पेरा घटला

By admin | Updated: June 12, 2014 22:43 IST

दैनंदिन आहारातील महत्वपूर्ण घटक असलेली भाकरी आजच्या बदललेल्या पीक पध्दतीमुळे व वातावरणातील बदलामुळे मिळेनाशी झाली आहे.

वडगाव वाण : शेतकरी व शेतमजुरांच्या दैनंदिन आहारातील महत्वपूर्ण घटक असलेली भाकरी आजच्या बदललेल्या पीक पध्दतीमुळे व वातावरणातील बदलामुळे मिळेनाशी झाली आहे. गहू, तांदुळ, मुबलक मिळतील. परंतु ज्वारीची मात्र वाणवा असल्यामुळे भाकरी मात्र मिळत नाही, असे चित्र आहे. तर यावर्षीही ज्वारीचा पेरा कमी होणार असल्याचे शेतकर्‍यांच्या चर्चेतून समजते.दहा वर्षापूर्वीच्या काळात सणासुदीला व लग्न प्रसंगात मिळणारी गव्हाच्या पोळीचे नावीण्य होते. कारण तेव्हा परिसरात गव्हाचे पीक मोजकेच घेतले जायचे तर ज्वारीचा पेरा प्रत्येक शेतकरी करायचा. ह्या पिकाचा दुहेरी फायदा शेतकर्‍याला होता घरचा अन्नाचा प्रश्न सुटायचा व कडब्यापासून जनावरांना वैरण उपलब्ध व्हायचे आणि शेतकर्‍यांकडे कामाला असणार्‍या मजुरांना सुध्दा ज्वारीच्या रूपात मजुरी दिली जात असल्याने शेतकर्‍याला रोखीचा व्यवहार सुध्दा कमी करावा लागत होता. परंतु काळ बदलला पिक पध्दती वातावरणातील लहरीपणामुळे बदलावी लागल्याने ज्वारीचे पिक कोणीही पेरत नसल्याने आज पुरणपोळीचे नव्हे तर ज्वारीच्या भाकरीचे नावीण्य आहे. अन्न सुरक्षा कायद्यामुळे २ रूपये किलोप्रमाणे मिळणारा गहू, ३ रूपये किलोप्रमाणे मिळणारा तांदुळ घराघरात उपलब्ध आहे व खुल्या बाजारात सुध्दा गव्हाचा भाव १५ ते १८ रूपये किलोप्रमाणेच आहे. परंतु ज्वारी मात्र आज २0 रूपये ते ३0 रूपये किलोप्रमाणे मिळत असल्याने भाकर खाताना खिशाचाच विचार घ्यावा लागतो. शेतमजूर मात्र पचायला सोपी व आरोग्य वर्धक असणारी ज्वारी बेभाव झाल्याने खावू शकत नाही म्हणून खंत व्यक्त करतात.