शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
2
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
3
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
4
Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
5
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
6
Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
7
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
8
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
9
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."
10
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
11
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
12
Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
13
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
14
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
15
"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला
16
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
18
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
19
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
20
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी

गटविकास अधिका:यांना घेराव

By admin | Updated: March 7, 2017 00:22 IST

कन्साई ग्रा.पं.च्या सात पाडय़ांमध्ये पाणीटंचाई : 15 दिवसात करणार उपाययोजना

शहादा : तालुक्यातील कन्साई ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या सात पाडय़ांवरील पाणीटंचाई दूर करण्यात यावी याबाबत निवेदन देऊनही पंचायत समितीमार्फत कुठलीही ठोस उपाययोजना होत नसल्याने सोमवारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकत्र्यानी घेराव आंदोलन केले. दरम्यान, 15 दिवसात पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.कन्साई, ता.शहादा ग्रामपंचायतअंतर्गत डेमच्यापाडा येथे 75 कुटुंबे वास्तव्यास असून पाण्यासाठी केवळ एक हातपंप आहे. तोही नादुरुस्त आहे. परिणामी ग्रामस्थांना एक ते दीड किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. मेंढय़ावळ येथे 25 कुटुंबे वास्तव्यास असून या पाडय़ावरील एकमेव हातपंप वनविकास महामंडळाच्या अधिका:यांनी बंद केला असल्याने ग्रामस्थांना रतनपूर येथून पाणी आणावे लागत आहे. केवडीपाणी येथे 90 कुटुंबे वास्तव्यास आहेत. पाण्याची कुठलीही सुविधा नसल्याने ग्रामस्थ नदीच्या पाण्याचा वापर करतात. या दूषित पाण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. धजापाणी येथे 40 कुटुंबे असून विहिरीतील पाणी पुरेसे नाही. अंबापाणी येथे 80 कुटुंबे असून विहिरीच्या पाण्यावरच त्यांना अवलंबून रहावे लागत आहे. सातपिंप्री येथे 30, तर मिठापूर येथे 35 कुटुंबे असून दोन्ही पाडय़ांवर प्रत्येकी एक हातपंप आहे. मात्र ते नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हे सातही पाडे 100 टक्के आदिवासीबहुल असून येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे डिसेंबर 2015 व 30 जानेवारी 2017 रोजी लेखी निवेदनाद्वारे करून पाणीटंचाई दूर झाली नाही तर शहादा तहसील कार्यालय अथवा पंचायत           समिती कार्यालय येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला  होता.या निवेदनाची दखल जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेने गांभीर्याने घेतली नसल्याने मंगळवारी सकाळी मनसेचे जिल्हा सचिव मनलेश जायस्वाल यांच्यासह कार्यकत्र्यानी 11 वाजेच्या सुमारास गटविकास अधिकारी श्रीराम कागणे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून घेराव घातला. दिवसभर आंदोलन सुरू होते. जोर्पयत मागणी पूर्ण होत नाही तोर्पयत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या वेळी कार्यकत्र्यानी केला.पंचायत समितीचे सभापती दरबारसिंग पवार, गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एल.ए. बोरदे, एम.पी. बिबळे, ओ.एच. गिरासे, प्रशासन अधिकारी पी.आर. वळवी, हरी लिमजी पाटील यांनी पदाधिका:यांशी चर्चा केली. त्यात या पाडय़ांच्या पाणीटंचाईच्या समस्येबाबत जिल्हा परिषदेच्या सव्रेक्षण विभागाकडून नवीन विंधन विहिरी घेण्याबाबत मंजूर कृती आराखडय़ात विषयाचा समावेश करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्रपत्र ब भरून मंजुरीसाठी जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तत्काळ मंजुरीस पाठविण्यात येऊन या पाडय़ांची पाणीटंचाई येत्या 15 दिवसात दूर केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले. या वेळी फत्तेसिंग भिल, ग्रा.पं. सदस्य संभीबाई भिल, ज्योतीबाई तडवी, राज्या भिल, दारासिंग भिल, दिलीप पवार, किरण खर्डे, गण्या पटले, सामसिंग पाडवी, कुवरसिंग वळवी यांनी आंदोलनात सहभाग घेतला.दरम्यान, गटविकास अधिकारी कागणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.