शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

मत्स्य व्यवसाय सापडला संकटात

By admin | Updated: July 15, 2015 01:19 IST

अपु-या पावसामुळे मत्स्यबीजांना धोका

नीलेश शहाकार / बुलडाणा : पावसाने दडी मारल्यानंतर जिल्ह्यात असलेल्या जलाशयात पुरेसा पाणीसाठा न वाढल्याने मत्स्य व्यवसाय संकटात सापडला आहे. जिल्ह्यात मत्स्य व्यवसायासाठी ४२४ तळे, सरोवरे व जलाशये उपलब्ध आहेत. या अंतर्गत मत्स्य व्यवसायासाठी ७ हजार ७८७.६ हेक्टर जलक्षेत्र आहे; मात्र बर्‍याच जलाशयाला कोरड पडल्याने मत्स्य व्यवसायाला धोका निर्माण झाला आहे. अपुर्‍या पावसामुळे मस्त्यबीज खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विदर्भात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाची मोठी क्षमता आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात तळे, सरोवर व नद्यांतील पाण्यामुळे मत्स्य उत्पादनाचा पारंपरिक व्यवसाय सुरू आहे. पारंपरिक मच्छीमारांना नियमित व योग्य मोबदला मिळावा, यासाठी सहकारी तत्त्वावर जिल्ह्यात १६६ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था स्थापन केल्या. या संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील मत्स्योत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य सरकारने आखले होते. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पनाचा हा व्यवसाय पुर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास यंत्रणा, यांच्याकडून २४९.६९ लाख मस्त्यबीज वाटप करण्याचे नियोजन मत्स्योत्पादक शेतकर्‍यांना वाटप करण्याचे नियोजन आखण्यात आले; मात्र जुलै महिना आला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे बरेच मत्स्योत्पादक जलाशय कोरडे आहे. त्यामुळे मत्स्यबीज न सोडण्यात आल्याने मत्स्योत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहे. मत्स्यबीज खराब झाल्याने आर्थिक फटका मत्स्य व्यवसाय वाढविणे व त्याची विक्री करणे या माध्यमातून जिल्ह्यात १६६ मत्स्यबीज व्यवसाय सहकारी संस्था कार्य करतात. या संस्थांना इतर राज्यातून मत्स्यबीज बोलवावे लागते; मात्र बर्‍याच ठिकाणचे अंतर अत्यंत दूर असल्याने मत्स्यबीज अनेकवेळा मार्गातच मृतावस्थेत आल्याने मोठा आर्थिक फटका बसतो. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यावर या संस्थांना भाडेपट्टीवर देण्यात आलेल्या धरणात व तलावात मच्छीमार मत्स्यबीज सोडतात. ४ ते ५ महिन्यानंतर त्याची पुरेशी वाढ झाल्यावर त्याची विक्री करण्यात येते; मात्र यावेळी पावसाने दगा दिल्याने अद्याप मत्स्यबीजच बोलावले नसल्याची माहिती आहे.