शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य व्यवसाय सापडला संकटात

By admin | Updated: July 15, 2015 01:19 IST

अपु-या पावसामुळे मत्स्यबीजांना धोका

नीलेश शहाकार / बुलडाणा : पावसाने दडी मारल्यानंतर जिल्ह्यात असलेल्या जलाशयात पुरेसा पाणीसाठा न वाढल्याने मत्स्य व्यवसाय संकटात सापडला आहे. जिल्ह्यात मत्स्य व्यवसायासाठी ४२४ तळे, सरोवरे व जलाशये उपलब्ध आहेत. या अंतर्गत मत्स्य व्यवसायासाठी ७ हजार ७८७.६ हेक्टर जलक्षेत्र आहे; मात्र बर्‍याच जलाशयाला कोरड पडल्याने मत्स्य व्यवसायाला धोका निर्माण झाला आहे. अपुर्‍या पावसामुळे मस्त्यबीज खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विदर्भात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाची मोठी क्षमता आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात तळे, सरोवर व नद्यांतील पाण्यामुळे मत्स्य उत्पादनाचा पारंपरिक व्यवसाय सुरू आहे. पारंपरिक मच्छीमारांना नियमित व योग्य मोबदला मिळावा, यासाठी सहकारी तत्त्वावर जिल्ह्यात १६६ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था स्थापन केल्या. या संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील मत्स्योत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य सरकारने आखले होते. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पनाचा हा व्यवसाय पुर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास यंत्रणा, यांच्याकडून २४९.६९ लाख मस्त्यबीज वाटप करण्याचे नियोजन मत्स्योत्पादक शेतकर्‍यांना वाटप करण्याचे नियोजन आखण्यात आले; मात्र जुलै महिना आला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे बरेच मत्स्योत्पादक जलाशय कोरडे आहे. त्यामुळे मत्स्यबीज न सोडण्यात आल्याने मत्स्योत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहे. मत्स्यबीज खराब झाल्याने आर्थिक फटका मत्स्य व्यवसाय वाढविणे व त्याची विक्री करणे या माध्यमातून जिल्ह्यात १६६ मत्स्यबीज व्यवसाय सहकारी संस्था कार्य करतात. या संस्थांना इतर राज्यातून मत्स्यबीज बोलवावे लागते; मात्र बर्‍याच ठिकाणचे अंतर अत्यंत दूर असल्याने मत्स्यबीज अनेकवेळा मार्गातच मृतावस्थेत आल्याने मोठा आर्थिक फटका बसतो. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यावर या संस्थांना भाडेपट्टीवर देण्यात आलेल्या धरणात व तलावात मच्छीमार मत्स्यबीज सोडतात. ४ ते ५ महिन्यानंतर त्याची पुरेशी वाढ झाल्यावर त्याची विक्री करण्यात येते; मात्र यावेळी पावसाने दगा दिल्याने अद्याप मत्स्यबीजच बोलावले नसल्याची माहिती आहे.