शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

मत्स्य व्यवसाय सापडला संकटात

By admin | Updated: July 15, 2015 01:19 IST

अपु-या पावसामुळे मत्स्यबीजांना धोका

नीलेश शहाकार / बुलडाणा : पावसाने दडी मारल्यानंतर जिल्ह्यात असलेल्या जलाशयात पुरेसा पाणीसाठा न वाढल्याने मत्स्य व्यवसाय संकटात सापडला आहे. जिल्ह्यात मत्स्य व्यवसायासाठी ४२४ तळे, सरोवरे व जलाशये उपलब्ध आहेत. या अंतर्गत मत्स्य व्यवसायासाठी ७ हजार ७८७.६ हेक्टर जलक्षेत्र आहे; मात्र बर्‍याच जलाशयाला कोरड पडल्याने मत्स्य व्यवसायाला धोका निर्माण झाला आहे. अपुर्‍या पावसामुळे मस्त्यबीज खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विदर्भात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाची मोठी क्षमता आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात तळे, सरोवर व नद्यांतील पाण्यामुळे मत्स्य उत्पादनाचा पारंपरिक व्यवसाय सुरू आहे. पारंपरिक मच्छीमारांना नियमित व योग्य मोबदला मिळावा, यासाठी सहकारी तत्त्वावर जिल्ह्यात १६६ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था स्थापन केल्या. या संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील मत्स्योत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य सरकारने आखले होते. गोड्या पाण्यातील मत्स्योत्पनाचा हा व्यवसाय पुर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास यंत्रणा, यांच्याकडून २४९.६९ लाख मस्त्यबीज वाटप करण्याचे नियोजन मत्स्योत्पादक शेतकर्‍यांना वाटप करण्याचे नियोजन आखण्यात आले; मात्र जुलै महिना आला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे बरेच मत्स्योत्पादक जलाशय कोरडे आहे. त्यामुळे मत्स्यबीज न सोडण्यात आल्याने मत्स्योत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहे. मत्स्यबीज खराब झाल्याने आर्थिक फटका मत्स्य व्यवसाय वाढविणे व त्याची विक्री करणे या माध्यमातून जिल्ह्यात १६६ मत्स्यबीज व्यवसाय सहकारी संस्था कार्य करतात. या संस्थांना इतर राज्यातून मत्स्यबीज बोलवावे लागते; मात्र बर्‍याच ठिकाणचे अंतर अत्यंत दूर असल्याने मत्स्यबीज अनेकवेळा मार्गातच मृतावस्थेत आल्याने मोठा आर्थिक फटका बसतो. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यावर या संस्थांना भाडेपट्टीवर देण्यात आलेल्या धरणात व तलावात मच्छीमार मत्स्यबीज सोडतात. ४ ते ५ महिन्यानंतर त्याची पुरेशी वाढ झाल्यावर त्याची विक्री करण्यात येते; मात्र यावेळी पावसाने दगा दिल्याने अद्याप मत्स्यबीजच बोलावले नसल्याची माहिती आहे.