शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

तारेचे कुंपण उठले प्राण्यांच्या जीवावर!

By admin | Updated: August 2, 2016 01:32 IST

वन्यजीव धोक्यात; दोन बिबटांच्या मृत्यूने उडाली खळबळ.

ब्रह्मनंद जाधव / बुलडाणावन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी शेताला असलेल्या तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडत आहेत; परंतु शेतातील तारेच्या कुंपणात सोडलेला विद्युत प्रवाह वन्य प्राण्यांच्या जीवावर उठल्याचे वास्तव शेकापूर वनपरिक्षेत्रातील जामठी बिटमध्ये तेलीखोरे जंगलात दोन बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर उघडकीस आला. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्वात मोठय़ा असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील १ हजार १६३ वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात सापडला आहे.नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन महत्त्वाचे आहे. वने नैसर्गिक स्रोतांचा अविभाज्य भाग असून, त्यास अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व त्यावरील आधुनिक उपाययोजना म्हणून कार्बन करणे यात वनांचा मोलाचा वाटा आहे. राज्यातील विपुल आणि संपन्न जैवविविधता व तिचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने वन विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून वन्य जीवांचे शास्वत व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. यावर्षी चांगल्या पावसामुळे पिकंही चांगली बहरली आहेत; परंतु या पिकांच्या संरक्षणासाठी जिल्ह्यातील अनेक शेतकरी तारेचे कुंपण करीत असून, त्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडत आहेत; परंतु शेतातील तारेच्या कुंपणात सोडलेला विद्युत प्रवाह वन्य प्राण्यांच्या जीवावर बेतत आहे. हा प्रकार बुलडाणा तालुक्यातील धाडपासून ३ किमी अंतरावर शेकापूर वन परिक्षेत्रातील जामठी बिटमध्ये तेलीखोरे जंगलात ३१ जुलै रोजी पहाटे ५ वाजता मादी असलेले दोन बिबट्याचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याने समोर आला आहे. दोन्ही बिबट्यांचा मृत्यू शेतातील कुंपणाचा विद्युत शॉक लागल्याने झाला असून त्यानंतर अज्ञात व्यक्तीकडून त्यांना नाल्यात जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे वन विभागाने सांगितले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात इतर शेतकर्‍यांनाही शिकवण मिळाली आहे. बिबट मृत्यू प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडीबुलडाणा तालुक्यातील धाड वन परिक्षेत्राच्या तेलीखोरे जंगलात नर-मादी जोडप्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती वन विभागाला मिळताच, पथकाने मध्यरात्री जामठी बीटमध्ये पाहणी केली. यात वनपरिक्षेत्रात असलेल्या गट नं.१९ मधील शेतात संरक्षणासाठी लावलेल्या कुंपनाच्या तारेत विद्युत प्रवाह सोडण्यात आल्याचे दिसले. वनक्षेत्रात फिरताना या कुंपणाच्या विद्युत तारेचा धक्का या बिबट्यांना लागताच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अज्ञात व्यक्तीकडून त्यांना नाल्यात जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी संशयीत म्हणून जामठी येथील साहेबराव शंकर थोरात (५६) व रमेश रामा रावळकर (४३) या दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांना बुलडाणा येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.