शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

पालकमंत्र्यांविना ‘डीपीसी’ अधांतरी!

By admin | Updated: July 18, 2016 23:47 IST

बुलडाणा जिल्ह्यात गत सहा महिने जिल्हा नियोजन समितीची सभा न झाल्याने विकास निधी वितरणात खोळंबा झाला आहे.

विवेक चांदूरकर / बुलडाणाजिल्ह्याला पालकमंत्रीच नसल्यामुळे जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) सभा लांबली आहे. दर तीन महिन्यांनी सभा आयोजित करणे आवश्यक असताना सहा महिने झाले तरी डीपीसीची सभा झाली नाही. दुसरीकडे आगामी फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विविध विकास कामे मार्गी लागण्यासाठी जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्य धडपड करीत आहेत. दर तीन महिन्यांनी जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) सभा व्हायला हवी. जिल्ह्यात २३ जानेवारी २0१६ रोजी यापूर्वी डीपीसीची सभा झाली होती. त्यानंतर मात्र जिल्ह्याचे माजी पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून कुणाचीही निवड करण्यात आली नाही. डीपीसीचे पालकमंत्री अध्यक्ष असतात. त्यामुळे या सभेच्या आयोजनाकरिता पालकमंत्र्यांची उपस्थिती आवश्यक असते. गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात पालकमंत्रीच नाहीत. त्यामुळे डीपीसीचे आयोजन करण्यात आले नाही. जिल्हयात २0१६ - १७ या आर्थिक वर्षासाठी २८८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सध्या विविध कार्यालयांच्यावतीने निधी खर्च करण्यात येत आहे. डीपीसी अंतर्गत निधी मंजूर झाला, तरी कामांचा प्रारंभ होण्याकरिता अंदाजपत्रक तयार करणे, तांत्रिक मान्यता मिळणे तसेच प्रशासकीय मान्यता मिळणे गरजेचे असते. तसेच जिल्ह्यात किती विकास कामे मार्गी लागली, याचा आढावाही या सभेत घेण्यात येतो. मात्र, सभाच झाली नसल्यामुळे आढावा घेण्यात आला नाही. डीपीसीची २८८ कोटींची तरतूद जिल्हा नियोजन समितीने सन २0१६ - १७ साठी जलयुक्त शिवारचा निधी अंतभरूत करून २८८ कोटींचे नियोजन केले आहे. यामध्ये जलयुक्त शिवारसाठी ४२.९३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच १0९.८४ कोटी अनुसूचित जाती, जमातीसाठी तसेच जिल्ह्यात आदिवासी भाग असल्यामुळे २३ कोटी रूपये आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेसाठी देण्यात आले आहेत. फुंडकरांना पालकमंत्री पद मिळण्याची अपेक्षा जिल्ह्यातील नागरिकांना कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळेल, अशी अपेक्षा आहे. एकनाथ खडसे यांच्याकडील कृषी खाते त्यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यासोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांच्याकडेच सोपविण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. या अधिवेशनात ही घोषणा होण्याची शक्यता आहे.उन्हाळ्यातील कामांचा आढावा केव्हा?डीपीसी अंतर्गत मंजूर झालेली काही कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी उन्हाळ्यात करणे आवश्यक होते. मात्र, अनेकदा अधिकार्‍यांच्या दप्तर दिरंगाईमुळे ही कामे करण्यात येत नाहीत. या कामांचा आढावा डीपीसीच्या सभेत घेण्यात येतो. मात्र जिल्ह्यात डीपीसीची सभाच झाली नसून, पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा आढावा केव्हा घेण्यात येईल, याकडे लक्ष लागले आहे.